नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथच्या पवित्र भूमीवरसोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्याची सुसंधीमिळाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्याकानाकोपऱ्यातून लोक सोमनाथला पोहोचले होते. याकार्यक्रमादरम्यान माझी काही अशा लोकांशीही भेटझाली, जे यापूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगममच्या वेळीसोमनाथला आले होते आणि त्याही आधी काशी-तामिळसंगममच्या वेळी काशीलाही गेले होते. अशाव्यासपीठांबाबतचा त्यांचा सकारात्मक विचार पाहून मीखूप प्रभावित झालो. म्हणूनच मी ठरवले की, याविषयावर मी माझे काही विचार मांडावेत.
‘मन की बात’च्या एका भागामध्ये मी म्हटले होते की,माझ्या आयुष्यात मला तामिळ भाषा शिकता आली नाहीयाचे मला खूप दुःख आहे. हे आपले सौभाग्य आहे कीगेल्या काही वर्षांपासून आपले सरकार तामिळ संस्कृतीदेशात अधिक लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्नशीलआहे. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिकसशक्त करणारे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘संगम’संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या दृष्टीनेही काशी-तामिळसंगमम हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. यामध्येभारताच्या विविध परंपरांमधील अद्भूत ताळमेळ तरदिसतोच, पण आपण एकमेकांच्या परंपरांचा सन्मानकसा करतो, हे देखील समजते. काशी-तमिळ संगममच्याआयोजनासाठी काशी हे सर्वात योग्य ठिकाण म्हणतायेईल. काशीचा तामिळ समाज आणि संस्कृतीशी अत्यंतजवळचा संबंध राहिला आहे. काशी हे बाबा विश्वनाथांचेशहर आहे तर तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तीर्थ आहे. तामिळनाडूतील ‘तेनकासी’ला दक्षिण काशी असे म्हटले जाते. तामिळनाडूचे महान सुपुत्र महाकवी सुब्रमण्यमभारती यांनाही काशीमध्ये बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक जागृतीची अद्भुत संधी मिळाली. येथेचत्यांचा राष्ट्रवाद अधिक प्रबळ झाला आणि त्यांच्याकवितांना नवी धार मिळाली. अशी अनेक उदाहरणेआहेत. वर्ष २०२२ मध्ये वाराणसीच्या भूमीवरकाशी-तामिळ संगममची सुरुवात झाली होती. त्याच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते. तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या लेखक, विद्यार्थी, कलाकार, विद्वान, शेतकरी आणि पाहुण्यांनीकाशीसोबतच प्रयागराज आणि अयोध्येचे दर्शनही घेतले होते. संगमममध्ये नवीन विषय जोडले जावेत. नवीन - कल्पक पद्धतींचा अवलंब केला जावा आणि लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा हा यामागचा उद्देश होता.हा उपक्रम आपल्या मूळ भावनेशी जोडलेला राहूनहीनिरंतर पुढे जात राहावा असा प्रयत्न होता. वर्ष २०२३ च्या दुसऱ्या आयोजनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, जेणेकरून भाषा हा त्यामध्ये अडथळाठरू नये. याच्या तिसऱ्या आवृत्तीत भारतीय ज्ञानप्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याचबरोबरशैक्षणिक संवाद, सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणिचर्चासत्रांमध्ये लोकांचा मोठा सहभाग पाहायलामिळाला. काशी-तामिळ संगममची चौथी आवृत्ती २डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. या वेळची संकल्पनाअत्यंत रंजक होती. मला ‘तामिळ करकलम’ म्हणजेच‘तामिळ शिका’. यात काशी आणि इतर ठिकाणच्यालोकांना तामिळ शिकण्याची एक अपूर्व संधी मिळाली.तामिळनाडूहून आलेल्या शिक्षकांनी काशीच्याविद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला! प्राचीनतामिळ साहित्य ग्रंथ ‘तोलकाप्पियम’चा चार भारतीयआणि सहा परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.या अभियानात सांस्कृतिक एकतेचा संदेश पसरवणारेपांड्य वंशाचे महान राजा ‘आदि वीर पराक्रम पांडियन’यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण आयोजनादरम्याननमो घाटावर प्रदर्शने भरवण्यात आली. बनारस हिंदूविद्यापीठामध्ये शैक्षणिक सत्र, विविध सांस्कृतिककार्यक्रमही पार पडले. काशी-तामिळ संगमममध्ये यावेळी ज्या गोष्टीने मला सर्वाधिक आनंद दिला.त्यांच्यासाठी हे एक असे अद्भुत व्यासपीठ आहे, यातूनते आपली प्रतिभा दाखवू शकतात. संगममव्यतिरिक्तकाशीची यात्राही संस्मरणीय ठरावी, यासाठी विशेषप्रयत्न करण्यात आले. भारतीय रेल्वेने लोकांनातामिळनाडूहून उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विशेष गाड्याचालवल्या. या प्रवासादरम्यान अनेक रेल्वेस्थानकांवर,विशेषतः तामिळनाडूमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यातआला. सुंदर गाणी आणि आपापसांतील चर्चेमुळे हाप्रवास अधिक आनंददायी झाला. येथे मी काशी आणिउत्तर प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींचे कौतुक करूइच्छितो, ज्यांनी काशी-तामिळ संगमम विशेष बनवण्यातमोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पाहुण्यांच्यास्वागत आणि आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडलीनाही. अनेक लोकांनी तामिळनाडूहून आलेल्यापाहुण्यांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडे ठेवले.पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिकप्रशासनही चोवीस तास कार्यरत होते. वाराणसीचाखासदार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची आणिसमाधानाची गोष्ट आहे. या वेळी काशी-तामिळसंगममचा समारोप समारंभ रामेश्वरममध्ये झाला. त्याततामिळनाडूचे सुपुत्र आणि उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्याविचारांनी कार्यक्रमाची समृद्धी वाढवली. भारताच्याआध्यात्मिक समृद्धीवर भर देताना त्यांनी सांगितले की,कशा प्रकारे अशी व्यासपीठे राष्ट्रीय एकात्मता अधिकबळकट करतात. शैक्षणिक चर्चा . जनसंवादालाही मोठावावा मिळाला.आपल्या संस्कृतींमधील संबंध अधिकदृढ झाले आहेत. वर्षाचा हा काळ प्रत्येकदेशवासीयासाठी अत्यंत पावन मानला जातो. लोकमोठ्या उत्साहाने मकरसंक्रांती, उत्तरायण, पोंगल, माघबिहू यांसारखे अनेक सण साजरे करत आहेत. हे सर्वउत्सव मुख्यत्वे सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीला समर्पितआहेत. हे सण लोकांना एकमेकांशी जोडतात, ज्यामुळेसमाजात सद्भाव आणि एकजुटीची भावना अधिकप्रबळ होते. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

काशी-तामिळ संगममचा खोलवर प्रभावपाहायला मिळाला आहे.याद्वारे सांस्कृतिकचेतनेला बळकटी मिळालीच, पणशैक्षणिक चर्चा, जनसंवादालाही चालनामिळाली. यामुळे आपल्या संस्कृतींमधीलसंबंध अधिक दृढ झाले आहेत.

This post was originally published on this site.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




