नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथच्या पवित्र भूमीवरसोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्याची सुसंधीमिळाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्याकानाकोपऱ्यातून लोक सोमनाथला पोहोचले होते. याकार्यक्रमादरम्यान माझी काही अशा लोकांशीही भेटझाली, जे यापूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगममच्या वेळीसोमनाथला आले होते आणि त्याही आधी काशी-तामिळसंगममच्या वेळी काशीलाही गेले होते. अशाव्यासपीठांबाबतचा त्यांचा सकारात्मक विचार पाहून मीखूप प्रभावित झालो. म्हणूनच मी ठरवले की, याविषयावर मी माझे काही विचार मांडावेत.
‘मन की बात’च्या एका भागामध्ये मी म्हटले होते की,माझ्या आयुष्यात मला तामिळ भाषा शिकता आली नाहीयाचे मला खूप दुःख आहे. हे आपले सौभाग्य आहे कीगेल्या काही वर्षांपासून आपले सरकार तामिळ संस्कृतीदेशात अधिक लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्नशीलआहे. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिकसशक्त करणारे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘संगम’संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या दृष्टीनेही काशी-तामिळसंगमम हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. यामध्येभारताच्या विविध परंपरांमधील अद्भूत ताळमेळ तरदिसतोच, पण आपण एकमेकांच्या परंपरांचा सन्मानकसा करतो, हे देखील समजते. काशी-तमिळ संगममच्याआयोजनासाठी काशी हे सर्वात योग्य ठिकाण म्हणतायेईल. काशीचा तामिळ समाज आणि संस्कृतीशी अत्यंतजवळचा संबंध राहिला आहे. काशी हे बाबा विश्वनाथांचेशहर आहे तर तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तीर्थ आहे. तामिळनाडूतील ‘तेनकासी’ला दक्षिण काशी असे म्हटले जाते. तामिळनाडूचे महान सुपुत्र महाकवी सुब्रमण्यमभारती यांनाही काशीमध्ये बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक जागृतीची अद्भुत संधी मिळाली. येथेचत्यांचा राष्ट्रवाद अधिक प्रबळ झाला आणि त्यांच्याकवितांना नवी धार मिळाली. अशी अनेक उदाहरणेआहेत. वर्ष २०२२ मध्ये वाराणसीच्या भूमीवरकाशी-तामिळ संगममची सुरुवात झाली होती. त्याच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते. तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या लेखक, विद्यार्थी, कलाकार, विद्वान, शेतकरी आणि पाहुण्यांनीकाशीसोबतच प्रयागराज आणि अयोध्येचे दर्शनही घेतले होते. संगमममध्ये नवीन विषय जोडले जावेत. नवीन - कल्पक पद्धतींचा अवलंब केला जावा आणि लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा हा यामागचा उद्देश होता.हा उपक्रम आपल्या मूळ भावनेशी जोडलेला राहूनहीनिरंतर पुढे जात राहावा असा प्रयत्न होता. वर्ष २०२३ च्या दुसऱ्या आयोजनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, जेणेकरून भाषा हा त्यामध्ये अडथळाठरू नये. याच्या तिसऱ्या आवृत्तीत भारतीय ज्ञानप्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याचबरोबरशैक्षणिक संवाद, सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणिचर्चासत्रांमध्ये लोकांचा मोठा सहभाग पाहायलामिळाला. काशी-तामिळ संगममची चौथी आवृत्ती २डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. या वेळची संकल्पनाअत्यंत रंजक होती. मला ‘तामिळ करकलम’ म्हणजेच‘तामिळ शिका’. यात काशी आणि इतर ठिकाणच्यालोकांना तामिळ शिकण्याची एक अपूर्व संधी मिळाली.तामिळनाडूहून आलेल्या शिक्षकांनी काशीच्याविद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला! प्राचीनतामिळ साहित्य ग्रंथ ‘तोलकाप्पियम’चा चार भारतीयआणि सहा परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.या अभियानात सांस्कृतिक एकतेचा संदेश पसरवणारेपांड्य वंशाचे महान राजा ‘आदि वीर पराक्रम पांडियन’यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण आयोजनादरम्याननमो घाटावर प्रदर्शने भरवण्यात आली. बनारस हिंदूविद्यापीठामध्ये शैक्षणिक सत्र, विविध सांस्कृतिककार्यक्रमही पार पडले. काशी-तामिळ संगमममध्ये यावेळी ज्या गोष्टीने मला सर्वाधिक आनंद दिला.त्यांच्यासाठी हे एक असे अद्भुत व्यासपीठ आहे, यातूनते आपली प्रतिभा दाखवू शकतात. संगममव्यतिरिक्तकाशीची यात्राही संस्मरणीय ठरावी, यासाठी विशेषप्रयत्न करण्यात आले. भारतीय रेल्वेने लोकांनातामिळनाडूहून उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विशेष गाड्याचालवल्या. या प्रवासादरम्यान अनेक रेल्वेस्थानकांवर,विशेषतः तामिळनाडूमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यातआला. सुंदर गाणी आणि आपापसांतील चर्चेमुळे हाप्रवास अधिक आनंददायी झाला. येथे मी काशी आणिउत्तर प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींचे कौतुक करूइच्छितो, ज्यांनी काशी-तामिळ संगमम विशेष बनवण्यातमोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पाहुण्यांच्यास्वागत आणि आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडलीनाही. अनेक लोकांनी तामिळनाडूहून आलेल्यापाहुण्यांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडे ठेवले.पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिकप्रशासनही चोवीस तास कार्यरत होते. वाराणसीचाखासदार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची आणिसमाधानाची गोष्ट आहे. या वेळी काशी-तामिळसंगममचा समारोप समारंभ रामेश्वरममध्ये झाला. त्याततामिळनाडूचे सुपुत्र आणि उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्याविचारांनी कार्यक्रमाची समृद्धी वाढवली. भारताच्याआध्यात्मिक समृद्धीवर भर देताना त्यांनी सांगितले की,कशा प्रकारे अशी व्यासपीठे राष्ट्रीय एकात्मता अधिकबळकट करतात. शैक्षणिक चर्चा . जनसंवादालाही मोठावावा मिळाला.आपल्या संस्कृतींमधील संबंध अधिकदृढ झाले आहेत. वर्षाचा हा काळ प्रत्येकदेशवासीयासाठी अत्यंत पावन मानला जातो. लोकमोठ्या उत्साहाने मकरसंक्रांती, उत्तरायण, पोंगल, माघबिहू यांसारखे अनेक सण साजरे करत आहेत. हे सर्वउत्सव मुख्यत्वे सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीला समर्पितआहेत. हे सण लोकांना एकमेकांशी जोडतात, ज्यामुळेसमाजात सद्भाव आणि एकजुटीची भावना अधिकप्रबळ होते. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

काशी-तामिळ संगममचा खोलवर प्रभावपाहायला मिळाला आहे.याद्वारे सांस्कृतिकचेतनेला बळकटी मिळालीच, पणशैक्षणिक चर्चा, जनसंवादालाही चालनामिळाली. यामुळे आपल्या संस्कृतींमधीलसंबंध अधिक दृढ झाले आहेत.

This post was originally published on this site.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




