नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथच्या पवित्र भूमीवरसोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्याची सुसंधीमिळाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्याकानाकोपऱ्यातून लोक सोमनाथला पोहोचले होते. याकार्यक्रमादरम्यान माझी काही अशा लोकांशीही भेटझाली, जे यापूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगममच्या वेळीसोमनाथला आले होते आणि त्याही आधी काशी-तामिळसंगममच्या वेळी काशीलाही गेले होते. अशाव्यासपीठांबाबतचा त्यांचा सकारात्मक विचार पाहून मीखूप प्रभावित झालो. म्हणूनच मी ठरवले की, याविषयावर मी माझे काही विचार मांडावेत.
‘मन की बात’च्या एका भागामध्ये मी म्हटले होते की,माझ्या आयुष्यात मला तामिळ भाषा शिकता आली नाहीयाचे मला खूप दुःख आहे. हे आपले सौभाग्य आहे कीगेल्या काही वर्षांपासून आपले सरकार तामिळ संस्कृतीदेशात अधिक लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्नशीलआहे. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिकसशक्त करणारे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘संगम’संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या दृष्टीनेही काशी-तामिळसंगमम हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. यामध्येभारताच्या विविध परंपरांमधील अद्भूत ताळमेळ तरदिसतोच, पण आपण एकमेकांच्या परंपरांचा सन्मानकसा करतो, हे देखील समजते. काशी-तमिळ संगममच्याआयोजनासाठी काशी हे सर्वात योग्य ठिकाण म्हणतायेईल. काशीचा तामिळ समाज आणि संस्कृतीशी अत्यंतजवळचा संबंध राहिला आहे. काशी हे बाबा विश्वनाथांचेशहर आहे तर तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तीर्थ आहे. तामिळनाडूतील ‘तेनकासी’ला दक्षिण काशी असे म्हटले जाते. तामिळनाडूचे महान सुपुत्र महाकवी सुब्रमण्यमभारती यांनाही काशीमध्ये बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक जागृतीची अद्भुत संधी मिळाली. येथेचत्यांचा राष्ट्रवाद अधिक प्रबळ झाला आणि त्यांच्याकवितांना नवी धार मिळाली. अशी अनेक उदाहरणेआहेत. वर्ष २०२२ मध्ये वाराणसीच्या भूमीवरकाशी-तामिळ संगममची सुरुवात झाली होती. त्याच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते. तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या लेखक, विद्यार्थी, कलाकार, विद्वान, शेतकरी आणि पाहुण्यांनीकाशीसोबतच प्रयागराज आणि अयोध्येचे दर्शनही घेतले होते. संगमममध्ये नवीन विषय जोडले जावेत. नवीन - कल्पक पद्धतींचा अवलंब केला जावा आणि लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा हा यामागचा उद्देश होता.हा उपक्रम आपल्या मूळ भावनेशी जोडलेला राहूनहीनिरंतर पुढे जात राहावा असा प्रयत्न होता. वर्ष २०२३ च्या दुसऱ्या आयोजनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, जेणेकरून भाषा हा त्यामध्ये अडथळाठरू नये. याच्या तिसऱ्या आवृत्तीत भारतीय ज्ञानप्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याचबरोबरशैक्षणिक संवाद, सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणिचर्चासत्रांमध्ये लोकांचा मोठा सहभाग पाहायलामिळाला. काशी-तामिळ संगममची चौथी आवृत्ती २डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. या वेळची संकल्पनाअत्यंत रंजक होती. मला ‘तामिळ करकलम’ म्हणजेच‘तामिळ शिका’. यात काशी आणि इतर ठिकाणच्यालोकांना तामिळ शिकण्याची एक अपूर्व संधी मिळाली.तामिळनाडूहून आलेल्या शिक्षकांनी काशीच्याविद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला! प्राचीनतामिळ साहित्य ग्रंथ ‘तोलकाप्पियम’चा चार भारतीयआणि सहा परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.या अभियानात सांस्कृतिक एकतेचा संदेश पसरवणारेपांड्य वंशाचे महान राजा ‘आदि वीर पराक्रम पांडियन’यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण आयोजनादरम्याननमो घाटावर प्रदर्शने भरवण्यात आली. बनारस हिंदूविद्यापीठामध्ये शैक्षणिक सत्र, विविध सांस्कृतिककार्यक्रमही पार पडले. काशी-तामिळ संगमममध्ये यावेळी ज्या गोष्टीने मला सर्वाधिक आनंद दिला.त्यांच्यासाठी हे एक असे अद्भुत व्यासपीठ आहे, यातूनते आपली प्रतिभा दाखवू शकतात. संगममव्यतिरिक्तकाशीची यात्राही संस्मरणीय ठरावी, यासाठी विशेषप्रयत्न करण्यात आले. भारतीय रेल्वेने लोकांनातामिळनाडूहून उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विशेष गाड्याचालवल्या. या प्रवासादरम्यान अनेक रेल्वेस्थानकांवर,विशेषतः तामिळनाडूमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यातआला. सुंदर गाणी आणि आपापसांतील चर्चेमुळे हाप्रवास अधिक आनंददायी झाला. येथे मी काशी आणिउत्तर प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींचे कौतुक करूइच्छितो, ज्यांनी काशी-तामिळ संगमम विशेष बनवण्यातमोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पाहुण्यांच्यास्वागत आणि आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडलीनाही. अनेक लोकांनी तामिळनाडूहून आलेल्यापाहुण्यांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडे ठेवले.पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिकप्रशासनही चोवीस तास कार्यरत होते. वाराणसीचाखासदार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची आणिसमाधानाची गोष्ट आहे. या वेळी काशी-तामिळसंगममचा समारोप समारंभ रामेश्वरममध्ये झाला. त्याततामिळनाडूचे सुपुत्र आणि उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्याविचारांनी कार्यक्रमाची समृद्धी वाढवली. भारताच्याआध्यात्मिक समृद्धीवर भर देताना त्यांनी सांगितले की,कशा प्रकारे अशी व्यासपीठे राष्ट्रीय एकात्मता अधिकबळकट करतात. शैक्षणिक चर्चा . जनसंवादालाही मोठावावा मिळाला.आपल्या संस्कृतींमधील संबंध अधिकदृढ झाले आहेत. वर्षाचा हा काळ प्रत्येकदेशवासीयासाठी अत्यंत पावन मानला जातो. लोकमोठ्या उत्साहाने मकरसंक्रांती, उत्तरायण, पोंगल, माघबिहू यांसारखे अनेक सण साजरे करत आहेत. हे सर्वउत्सव मुख्यत्वे सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीला समर्पितआहेत. हे सण लोकांना एकमेकांशी जोडतात, ज्यामुळेसमाजात सद्भाव आणि एकजुटीची भावना अधिकप्रबळ होते. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

काशी-तामिळ संगममचा खोलवर प्रभावपाहायला मिळाला आहे.याद्वारे सांस्कृतिकचेतनेला बळकटी मिळालीच, पणशैक्षणिक चर्चा, जनसंवादालाही चालनामिळाली. यामुळे आपल्या संस्कृतींमधीलसंबंध अधिक दृढ झाले आहेत.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




