पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कोणतेही दुर्भाग्य इतके मोठे नसते की ते सौभाग्याला गिळेल

काही लोकांच्या चुकीच्या कृत्यांमुळे एक मोठी परीक्षा रद्द झाली. आता यामुळे मुले काही चुकीचे पाऊल उचलणार नाहीत ना, हीच मोठी भीती आहे. अशा स्थितीत मनात संताप, घुसमट आणि निराशा येणे साहजिक आहे. या घटनेमुळे परीक्षेची विश्वासार्हता तर पणाला लागलीच आहे, पण आता मुलांचे आयुष्य पणाला लागू नये, याची काळजी घ्यावी लागेल. आता सर्वात मोठी जबाबदारी त्या कुटुंबांची आहे, ज्यांची मुले या घटनेने आतून पूर्णपणे तुटली आहेत. माता-पिता व घरातील मोठ्या मंडळींनी मुलांना एक गोष्ट आवर्जून समजावायला हवी की, जीवनात हा काही एकमेव पर्याय नाही. कोणतेही दुर्भाग्य कधीच इतके मोठे असत नाही, की जे तुमचे संपूर्ण सौभाग्यच गिळून टाकेल. या जगात वाईट प्रवृत्तीचे लोक कधीच पूर्णपणे संपणार नाहीत. त्यांनी साक्षात प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनाही फसवले होते. म्हणूनच मुलांना समजावले पाहिजे की, अपयशाच्या भावनेत वाहून जाऊन मनातील सकारात्मकता कधीही संपवू नका. मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना हनुमान चालिसाशी जोडावे, कारण हनुमान चालिसा हे हनुमानजींचे शब्दरूप अवतारच आहे.

This post was originally published on this site.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *