भारतासोबत पाकिस्तानच्या युद्धांचा इतिहास कसा राहिलाआहे? सामरिकदृष्ट्या ठीक, पण रणनीतिकदृष्ट्या नुकसानदायी. त्यामुळेच पूर्ण शक्तीने सुरुवात करूनही तोप्रत्येक युद्ध हरतो. मात्र 1971 आणि कारगिल युद्ध वगळतापाकिस्तानने बहुतांश युद्धांत विजयाचा दावा केला आहे. गतवर्षी झालेल्या 87 तासांच्या चकमकीकडेच पाहा.मुनीरपासून पाकिस्तानच्या राजकारणातीलतळागाळापर्यंत सर्वांनाच वाटते की यावेळी विजयत्यांचाच झाला. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानलाजवळ केले. त्यालाच त्यांच्या स्वयंघोषित ‘विजया’लामान्यता मानले. प्रत्यक्षात मात्र पहलगाम हत्याकांडाच्याफक्त चार दिवस आधी आणि ऑपरेशन सिंदूरच्या सुमारेदोन आठवडे आधी स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा जॅकयाचा दौरा आणि क्रिप्टो करार पूर्ण झाला होता. भारतपहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे मुनीर यांना माहितीहोते. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाच्या लोभाचा फायदा घेण्याचीचाल त्यांनी आधीच आखली होती. जगातील अनेकलोकांपेक्षा आधी ही बाब समजून घेतल्याबद्दल मुनीर यांचेकौतुक करता येईल किंवा कदाचित सौदी अरेबियानेत्यांना आधीच सावध केले असेल. लढाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ट्रम्प यांच्या ‘सिस्टम’लाआपल्या बाजूने वळवले होते. 16 एप्रिल 2025 रोजीपरदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींना दिलेल्या त्यांच्याभाषणातून त्याचे संकेत मिळाले होते. ते हत्याकांडभारताची प्रतिक्रिया पाहण्याच्या त्यांच्या योजनेचाच भागहोता. ट्रम्प यांना आपल्या बाजूने करून काश्मीर मुद्दा पुढेआणणे, हे त्यांचे रणनीतिक उद्दिष्ट होते. पहिली चालयशस्वी झाली. पण दुसरी पूर्णपणे अपयशी ठरली. भारत लष्करी कारवाई करेल, हे माहीत असूनच पाकिस्तानने भारताला चिथावणी दिली होती. त्यामुळे कोणत्याठिकाणांना लक्ष्य केले जाईल, याचाही त्यांना अंदाजअसावा. भारत कोणती शस्त्रे वापरेल, हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे 7 मे रोजी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनीभारतीय वायुदलाने उड्डाण केले, तेव्हा पाकिस्तान सज्जहोता. आतील भागांतील लक्ष्यांवरील हल्ले ते रोखू शकले नाहीत. पण तो त्यांचा उद्देशही नव्हता. ते प्रत्युत्तर केवळहवाई संघर्षापुरते मर्यादित ठेवू इच्छित होते. एईडब्ल्यूविमाने आणि जे-10सी, जेएफ-17सह पीएल-15 क्षेपणास्त्रांच्या मदतीने या कारवाईचा आधीच सरावकरण्यात आला होता. त्यांना काही प्रमाणात यशहीमिळाले आणि त्याचाच ते उत्सव साजरा करत आहेत. भारतामध्ये उच्च पातळीवर काही विमानांच्या नुकसानीची बाब मान्य करण्यात आली आहे. माजी सीडीएस यांनीत्याला ‘सामरिक चूक’ म्हटले, पण भारतीय हवाई दलाने हिशेब चुकता करण्याची योजना आखली. सर्वप्रथम पाकिस्तानच्या हवाई दलावर दबाव आणण्यासाठी अँटी-रेडिएशन ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. त्यानंतर पीएएफच्या सर्वाधिक सुरक्षित हवाई तळांवर सलग हवाई हल्ले झाले. पीएएफ प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली. तेव्हा फक्त एकाबाजूकडेच दुसऱ्या बाजूचे नुकसान किती झाले, याचेपुरावे होते. व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रांतूनपीएएफचे किमान 13 हवाई तळ आणि 3 रडार उद्ध्वस्तझाल्याचे दिसत होते. तरीही पाकिस्तान विजयाचा जल्लोषकरत आहे. एका भारतीय कमांडरने म्हटले की, हे अगदीहॉकी सामन्यासारखे होते. भारताने पाकिस्तानला 3-1 नेहरवले. पण त्यांचा सेंटर फॉरवर्ड एक गोल करण्यातयशस्वी झाला आणि आपल्या खेळाडूंनी तीन पेनल्टीचेगोलमध्ये रूपांतर केले. भारताला नुकसानपोहोचवल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचा कोणताही पुरावानाही. भारतातील सर्व हवाई तळांच्या आसपास शहरेआहेत. काहीही लपलेले नाही, तरी कोणतीही उपग्रहछायाचित्रे समोर आलेली नाहीत. पाकिस्तानचे सर्व दावेनिरर्थक आहेत. मात्र, येथे मी अलीकडचा इतिहास पुन्हासांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर एका मुख्य मुद्द्यावरभर देत आहे. तो म्हणजे पाकिस्तानी लष्करी विचारसरणीचांगला विचार करते, पण केवळ सामरिक डावपेचांच्यापातळीवर. भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, याचा अंदाजती बांधू शकत नाही. ही अंतर्गत कमजोरी, भारतीयलष्कराबद्दलचा अनादर किंवा दोन्हींचा मिलाफ असूशकतो. हा विचार आपल्याला पाकिस्तानी लेखक शुजानवाज यांच्या ‘क्रॉस्ड स्वॉर्ड्स’ या पुस्तकातूनही मिळतो. कारगिल युद्धाबाबत त्यांनी लिहिले आहे की, भारताविरुद्ध‘वॉर गेम’ खेळणाऱ्या पाकिस्तानी पथकाने वाजपेयीसरकार कसे प्रत्युत्तर देईल, याचा अचूक अंदाज बांधलाहोता. तो गंभीरतेने घेतला असता तर पाकिस्तान पराभव,माघार आणि अपमान टाळू शकला असता. मात्र, त्याचीखिल्ली उडवण्यात आली. सामरिकदृष्ट्या कारगिल युद्धअत्यंत प्रभावी होते. भारताने प्रतिकार केला तर कायहोईल, याचा कोणी विचारच केला नाही. त्यासाठीरणनीतिक विचार गरजेचा असतो. पाकिस्तानमध्ये त्याचीकमतरता आहे. कारगिल रणनीतिक पराभव ठरला. कारणत्यामुळे नियंत्रण रेषेची जागतिक मान्यता अधिक मजबूतझाली. इस्लामाबाद विमानतळावर थोडा वेळ थांबून बिलक्लिंटन यांनी पाकिस्तानला कॅमेऱ्यासमोर सांगितले होतेकी, या उपखंडाच्या नकाशावरील सीमा आता रक्तसांडून बदलता येणार नाहीत. ही कथा यापूर्वीच्या युद्धांतहीदिसून आली. 1965 मध्ये छंब ताब्यात घेण्यासाठीऑपरेशन जिब्राल्टर आणि त्यानंतर अखनूर ताब्यातघेण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम राबवण्यात आले.जेणेकरून काश्मीर भारतापासून वेगळे करता येईल. पाकिस्तानी लष्कराने गृहित धरले होते की, भारत काश्मीरसोडून देईल. भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराचा त्यांनी योग्यविचारच केला नाही. त्याच युद्धात खेमकरण येथेरणगाड्यांद्वारे करण्यात आलेला अनपेक्षित हल्लाउपखंडातील सर्वांत धाडसी हल्ल्यांपैकी एक मानलाजातो. त्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई म्हणजेपाकिस्तानचा पराभव आणि त्याच्या सर्वोत्तमरणगाड्यांचा नाश. त्या युद्धातही पाकिस्तानने विजयाचादावा केला होता. दुर्देव हे आहे की पाक 6 सप्टेंबरला‘डिफेन्स ऑफ पाकिस्तान डे’ म्हणून साजरा करतो! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) इतिहासाचा धडा आहे...ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने चुकीचाधडा घेतला आहे. अशा परिस्थितीतपाकिस्तान पुढे कोणती चिथावणीखोरकारवाई करू शकतो, याचा अंदाजआधीच घ्यावा लागेल. इतिहास सांगतोकी, पाकिस्तानी सत्ता सर्वात वाईटस्थितीत पोहोचते तेव्हा ती स्वतःचेचनुकसान करणारे रणनीतिक निर्णय घेते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"


























Subscribe to my channel


