राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारोहानिमित्त देशातील विविध शहरांमध्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या कामाबद्दल वक्तव्य केलं. शिवाय संघाचा मूळ हेतू काय आणि विरोध होत असताना संघाचं कामकाज कसं चालतं… याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, मुस्लिम समाजात संघाचं काम कसं चालतं… याबद्द मोहन भागवत नेमकं काय म्हणाले जाणून घेवू…
संघाचे विचार सांगत मोहन भागवत म्हणाले, ‘जेव्हा कोणतीही गोष्ट दोन्हीकडून होते तेव्हाच त्याला यश येतं. तुम्ही विरोध केला मीही विरोध केला तर विरोधच निर्माण होतो. तथागत बुद्धावर एका व्यक्तीने टीका केली. बुद्ध काहीच बोलले नाही. शांत होते. तो म्हणाला, मी तुमच्यावर एवढा रागावतो तरीही तुम्हाला राग येत नाही? त्यावर बुद्ध म्हणाले, मी तुला एखादी गोष्ट दिली. तुम्ही नाही घेतली तर ती गोष्ट कुणाच्या जवळ राहील? तो म्हणाला, तुमच्याजवळ राहील. त्यावर बुद्ध म्हणाले, तू एवढ्या शिव्या दिल्या, त्या मी घेतल्याच नाही. त्यामुळे राग येण्याचं कारण काय? त्यामुळे कोण काय बोलत आहे, त्यावर लक्ष न देता फक्त आपव्या हेतूकडे लक्ष द्यायचं… असं मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं…
पुढे मोहन भागवत म्हणाले, ‘त्यामुळे स्वयंसेवक काम करायला जातात तेव्हा या गोष्टींचा विचार करूनच जातात. विरोध करणारे आपलेच आहेत, हे त्यांना माहीत आहे. पूर्वी अन्याय झाले. तेव्हा प्रतिबंध हटवल्यानंतर गुरुजी म्हणाले, चुकूनही दातांना जीभ फुटते. कापली जाते. त्यामुळे कोणी आपले दात नाही तोडत. त्यामुळे जे झालं ते झालं. आपलाच समाज आहे. आणीबाणीनंतर बाळासाहेब देवरस म्हणाले, ‘फर्गेट अँड फॉरगिव्ह…’ कारण समाज आपलाच आहे. त्यामुळे या गोष्टीची आम्ही चिंता करत नाही.’
आधी विरोध होतो. पण जेव्हा प्रतिक्रियाच देत नाही, तेव्हा असं लक्षात येतं, तेव्हा विरोध करणारे ऐकू लागतात. ऐकल्यावर त्याची पडताळणी करतात. त्यानंतर त्यांना त्यात तथ्य वाटतं. त्यानंतर ते आमचे होतात. हीच आमची प्रक्रिया आहे. स्वयंसेवक मुस्लिमांमध्ये देखील काम करत आहेत. विरोधानंतरही मुस्लिम समाजात संघाचं काम असंच चालतं… असं देखील भागवत म्हणाले.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



