
Mumbai : मुंबईत आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. IIT Bombay मध्ये शिकणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचललं आहे. हॉस्टेल 4 च्या गच्चीवरून उडी मारून विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पवई येथील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारल्यानंतर 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये घडली असून, नमन अग्रवाल यांनी वसतिगृहाच्या टेरेसवरून उडी मारली. नमन हा दुसऱ्या वर्षाचे B-Tech अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून तो राजस्थानमधील पिलाणी येथील रहिवासी होता. प्राथमिक माहितीनुसार, तो आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक 4 मध्ये राहत होता.
|
|
स्थानिक पवई पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नमनच्या खोलीत किंवा घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नसल्यामुळे आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पवई पोलिस या संबंधात तपास करत आहेत. या घटनेबाबत आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.गेल्या काही वर्षांत समुपदेशन केंद्रे आणि विद्यार्थ्यांसाठी सहाय्य व्यवस्था उभारण्यात आल्या असतानाही, आयआयटींसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येत असल्याचे दिसून येते.
उपलब्ध सरकारी आणि संस्थात्मक आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत विविध आयआयटींमध्ये 35 हून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. जानेवारीमध्ये IIT Kanpur मधील एका 25 वर्षीय पदवीधार विद्यार्थ्याने कॅम्पसमधील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. रामस्वरूप इश्राम असे या व्यक्तीचं नाव असून, तो कॅम्पसमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून काम करत होता. तो त्याच्या पत्नी आणि तीन वर्षीय मुलीसह तेथे राहत होता. सध्या पोलिस या संदर्भात तपास करत असून, वसतीगृहातील रहिवासी, त्याचे मित्र आणि इतर शिक्षकांशी बोलून घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





1 thought on “Mumbai : पहाटे 1 वाजता गच्चीवर गेला, सकाळी कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह; IIT मुंबईतील विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल का उचललं?”