माझे एक मन असे म्हणू इच्छिते की, ‘धन्यवाद मिस्टरट्रम्प, तुम्ही भारतासोबत व्यापार करार करणे सातत्यानेटाळाटाळ करत आहात!’ कारण तुम्ही तसे केले नसते,तर १९९१ नंतर आतापर्यंत झाल्या नव्हत्या अशामहत्त्वाच्या आर्थिक सुधारणा इतक्या वेगाने झाल्यानसत्या. उदाहरण म्हणून नवीन कामगार कायदेच घ्या. सरकारने यापूर्वी नवीन भूसंपादन विधेयक, कृषीकायदे हे मागे घेतले होते आणि जोखीम टाळण्यासाठीकामगार कायदे बासनात गुंडाळून ठेवले होते. आर्थिकप्रशासनाच्या बाबतीत, उदाहरणार्थ सरकारी बँकांच्याताळेबंदाची स्वच्छता, त्यांचे सक्षमीकरण आणिदिवाळखोरी कायदा इत्यादी बाबतीत काही सुधारणानक्कीच झाल्या. परंतु यादरम्यान ‘सरकारच माय-बाप’असणारा संरक्षणवाद पुन्हा परतला. आयात शुल्कात वाढझाली आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या रूपाने एकमोठी नॉन-टेरिफची सुरक्षा भिंत उभी केली गेली. भारतीयउद्योगातील गटांनी यासाठी लाॅबिंग केले व ते प्राप्तही केले. अत्यंत हुशार भारतीय सनदी सेवांच्या अंतर्गत गटानेचहे तयार केले असावे. ट्रम्प बहुधा भारताच्या याच नॉनटेरिफ अडथळ्यांचा उल्लेख करत होते. वास्तविक,त्यांची वेळ आता संपली आहे. आता हे अडथळे घाईनेनसले तरी सावधपणे दूर केले जात आहेत. अनुभवीआणि विश्वासू अधिकारी या परतीच्या प्रकल्पाला पुढे नेतआहेत. देव त्यांना अधिक शक्ती देवो! पण, ट्रम्पसाहेब तुमचे पुन्हा एकदा आभार. आभार मृदुभावासाठीनाही, तर असा अहंकार दाखवण्यासाठी की तुम्ही एकाअत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक संबंध केवळ एकाहट्टासाठी खराब करून घेतले. कुणी तुम्हाला फोन केलाहोता की नाही! ट्रम्प नसते, तर व्यापारापासून तोंडफिरवणाऱ्या आपल्या सत्तायंत्रणेला व्यापार कराराची जादू समजली नसती. आता तर ब्रिटन आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचा व्यापार करार आपल्या खिशातआहे. युरोपियन युनियनसोबतही करार होणार आहे. चीन वगळता प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीचाजवळपास प्रत्येक सदस्य देश आता सोबत आला आहे. यानंतर व्यापाराबाबत भारताचा विचारही बदलला आहे. म्हणूनच मिस्टर ट्रम्प, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद! ७% आर्थिक विकास दरासोबत नगण्य महागाई दर,त्याला हिंदुत्ववादी राष्ट्रवाद व लोककल्याणकारीयोजनांच्या कार्यक्षम वितरणाची जोड, यामुळे एकजबरदस्त निवडणूक फॉर्म्युला तयार होतोच. मग आपली नौका जोखमीत कशाला टाकायची? पण ट्रम्प यांनी आपल्याला आठवण करून दिली की सावधपणे खेळणेहा आता पर्याय उरलेला नाही. त्यामुळे स्कोअर वाढवा,मग जोखीम काहीही असो! ट्रम्प व्यापाराला आपल्या धोरणाचे हत्यार बनवतीलअशी अपेक्षा होतीच. पण भारत असा अंदाज लावूशकला नाही की ते आयात शुल्काचा वापर एखाद्याशस्त्रासारखा करतील. खरं सांगायचं तर, बाकी जगालाहीयाचा अंदाज आला नव्हता. भारत व्यापाराबाबत सर्वातजास्त समाधानी आणि उदासीन होता. आपला असासमज झाला होता, की ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातदोन्ही देशांचे संबंध धोरणात्मक हितांनी सुरळीत सुरूराहतील. परंतु याउलट ही धोरणात्मक बाजू आपल्यासाठीतेव्हा उलटली, जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानपुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या जवळ पोहोचला. मोदीआणि ट्रम्प यांच्यातील सौहार्दाचे जे काही थोडे पाणीउरले होते, ते ‘माझा नोबेल पुरस्कार कुठे आहे?’ याउष्णतेत वाफ होऊन उडून गेले. भारत त्यांच्या नावाचीशिफारस तर करूच शकत नव्हता, पण आपण पाकलाधडा शिकवण्यापूर्वीच त्यांना भानावर आणण्यासाठीआणि युद्धविरामाचा मार्ग सुकर करण्यासाठी ट्रम्प यांचेआभार मानण्याचा विचार नक्कीच करता आला असता.हे नाकारणे ही धोरणात्मक चूक होती. माझे दुसरे मन ही गोष्ट मान्य करते की, हे जे संकट सुरूआहे, ते कशा प्रकारे कमी पगाराच्या लाखो नोकऱ्यासंपवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्यामत्स्यपालन, कपडा उद्योग, हिरे आणि दागिने यांसारख्याक्षेत्रांचे नुकसान करत आहे. आतापर्यंत ही क्षेत्रे काहीप्रमाणात सरकारच्या मदतीने आणि काही अंशी आपल्याआजवरच्या गतीने तग धरून आहेत. परंतु आणखी तीनमहिने उलटल्यानंतर या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कपातहोऊ शकते. त्यामुळे भारत हे जास्त काळ सहन करूशकत नाही. यावर उपाय शोधावेच लागतील. याचा अर्थ असा नाही की भारताने ट्रम्प यांची गयावयाकरावी, ज्याची अपेक्षा ते जिनपिंग आणि पुतीन सोडूनजगातील प्रत्येक नेत्याकडून ठेवतात. पण भारत त्याअनेक प्रकरणांत लवचिक भूमिका घेऊ शकतो. जे विषयट्रम्प यांच्यासाठी संवेदनशील आहेत. उदाहरणार्थ, त्यांचीशेती क्षेत्रातील लॉबी. मला माहीत आहे की भारतात याचानैसर्गिक विरोध या भीतीमुळे होतोय की, यामुळे भारतीयशेती उद्ध्वस्त होईल किंवा येथे जनुकीय बदल केलेल्याउत्पादनांचा महापूर येईल, ज्यावर भारताने बंदी घातलीआहे (जी मी पूर्वीपासूनच अयोग्य मानत आलो आहे). आक्रमक न होताही मार्ग काढला जाऊ शकतो. जरापाहा, ढाका येथील अमेरिकन दूतावास तिथे केवळ५८,००० टन मक्याच्या आयातीवर किती आनंदी आहे. हाकोंबड्यांचा चारा आहे. भारत प्रामुख्याने कोंबड्यांसाठीएकूण चाऱ्याची आयात करतो. केवळ इथेनॉलबनवण्यासाठी किंवा चाऱ्यासाठी मका आयात करण्यातकाय अडचण आहे? आता असे म्हणू नका की, आम्हीआमच्या कोंबड्यांना जनुकीय बदल केलेला चारा खाऊघालू शकत नाही. अशा कापसाची सरकी आपल्याजनावरांचा मुख्य चारा आहे. आणि त्यापासून काढलेजाणारे तेल आपल्या अन्नसाखळीत गेल्या २३ वर्षांपासूनअस्तित्वात आहे. संपूर्ण जग ट्रम्प यांना हाताळण्याचे उपाय शोधत आहे.आतापर्यंत तुम्हाला त्यांच्या पद्धती आणि शैलीसमजलीच असेल. कोणताही गाजावाजा न करता त्यांनाकाही बिनधोक विजयांचे श्रेय घेऊ दिले जाऊ शकते.थोडा आवाज होऊ शकतो आणि संघर्षही होऊ शकतो,जसा इंदिरा गांधी आणि निक्सन यांच्यात झाला होता. पणतो काळ वेगळा होता. तेव्हा शीतयुद्ध शिगेला पोहोचलेहोते. आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अमेरिकाआणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणावर जोडलागेला आहे. अशा परिस्थितीत ठोस आर्थिक सुधारणा पुढेन्या, कारण असे संकट पिढ्यांवर एखाद्या वेळीच येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अशी संधी क्वचितच येते...आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्याअमेरिका आणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्याप्रमाणावर जोडला गेला आहे. अशा परिस्थितीतठोस आर्थिक सुधारणा पुढे न्या, कारण असे संकटपिढ्यांमध्ये एखाद्या वेळीच येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




