माझे एक मन असे म्हणू इच्छिते की, ‘धन्यवाद मिस्टरट्रम्प, तुम्ही भारतासोबत व्यापार करार करणे सातत्यानेटाळाटाळ करत आहात!’ कारण तुम्ही तसे केले नसते,तर १९९१ नंतर आतापर्यंत झाल्या नव्हत्या अशामहत्त्वाच्या आर्थिक सुधारणा इतक्या वेगाने झाल्यानसत्या. उदाहरण म्हणून नवीन कामगार कायदेच घ्या. सरकारने यापूर्वी नवीन भूसंपादन विधेयक, कृषीकायदे हे मागे घेतले होते आणि जोखीम टाळण्यासाठीकामगार कायदे बासनात गुंडाळून ठेवले होते. आर्थिकप्रशासनाच्या बाबतीत, उदाहरणार्थ सरकारी बँकांच्याताळेबंदाची स्वच्छता, त्यांचे सक्षमीकरण आणिदिवाळखोरी कायदा इत्यादी बाबतीत काही सुधारणानक्कीच झाल्या. परंतु यादरम्यान ‘सरकारच माय-बाप’असणारा संरक्षणवाद पुन्हा परतला. आयात शुल्कात वाढझाली आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या रूपाने एकमोठी नॉन-टेरिफची सुरक्षा भिंत उभी केली गेली. भारतीयउद्योगातील गटांनी यासाठी लाॅबिंग केले व ते प्राप्तही केले. अत्यंत हुशार भारतीय सनदी सेवांच्या अंतर्गत गटानेचहे तयार केले असावे. ट्रम्प बहुधा भारताच्या याच नॉनटेरिफ अडथळ्यांचा उल्लेख करत होते. वास्तविक,त्यांची वेळ आता संपली आहे. आता हे अडथळे घाईनेनसले तरी सावधपणे दूर केले जात आहेत. अनुभवीआणि विश्वासू अधिकारी या परतीच्या प्रकल्पाला पुढे नेतआहेत. देव त्यांना अधिक शक्ती देवो! पण, ट्रम्पसाहेब तुमचे पुन्हा एकदा आभार. आभार मृदुभावासाठीनाही, तर असा अहंकार दाखवण्यासाठी की तुम्ही एकाअत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक संबंध केवळ एकाहट्टासाठी खराब करून घेतले. कुणी तुम्हाला फोन केलाहोता की नाही! ट्रम्प नसते, तर व्यापारापासून तोंडफिरवणाऱ्या आपल्या सत्तायंत्रणेला व्यापार कराराची जादू समजली नसती. आता तर ब्रिटन आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचा व्यापार करार आपल्या खिशातआहे. युरोपियन युनियनसोबतही करार होणार आहे. चीन वगळता प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीचाजवळपास प्रत्येक सदस्य देश आता सोबत आला आहे. यानंतर व्यापाराबाबत भारताचा विचारही बदलला आहे. म्हणूनच मिस्टर ट्रम्प, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद! ७% आर्थिक विकास दरासोबत नगण्य महागाई दर,त्याला हिंदुत्ववादी राष्ट्रवाद व लोककल्याणकारीयोजनांच्या कार्यक्षम वितरणाची जोड, यामुळे एकजबरदस्त निवडणूक फॉर्म्युला तयार होतोच. मग आपली नौका जोखमीत कशाला टाकायची? पण ट्रम्प यांनी आपल्याला आठवण करून दिली की सावधपणे खेळणेहा आता पर्याय उरलेला नाही. त्यामुळे स्कोअर वाढवा,मग जोखीम काहीही असो! ट्रम्प व्यापाराला आपल्या धोरणाचे हत्यार बनवतीलअशी अपेक्षा होतीच. पण भारत असा अंदाज लावूशकला नाही की ते आयात शुल्काचा वापर एखाद्याशस्त्रासारखा करतील. खरं सांगायचं तर, बाकी जगालाहीयाचा अंदाज आला नव्हता. भारत व्यापाराबाबत सर्वातजास्त समाधानी आणि उदासीन होता. आपला असासमज झाला होता, की ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातदोन्ही देशांचे संबंध धोरणात्मक हितांनी सुरळीत सुरूराहतील. परंतु याउलट ही धोरणात्मक बाजू आपल्यासाठीतेव्हा उलटली, जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानपुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या जवळ पोहोचला. मोदीआणि ट्रम्प यांच्यातील सौहार्दाचे जे काही थोडे पाणीउरले होते, ते ‘माझा नोबेल पुरस्कार कुठे आहे?’ याउष्णतेत वाफ होऊन उडून गेले. भारत त्यांच्या नावाचीशिफारस तर करूच शकत नव्हता, पण आपण पाकलाधडा शिकवण्यापूर्वीच त्यांना भानावर आणण्यासाठीआणि युद्धविरामाचा मार्ग सुकर करण्यासाठी ट्रम्प यांचेआभार मानण्याचा विचार नक्कीच करता आला असता.हे नाकारणे ही धोरणात्मक चूक होती. माझे दुसरे मन ही गोष्ट मान्य करते की, हे जे संकट सुरूआहे, ते कशा प्रकारे कमी पगाराच्या लाखो नोकऱ्यासंपवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्यामत्स्यपालन, कपडा उद्योग, हिरे आणि दागिने यांसारख्याक्षेत्रांचे नुकसान करत आहे. आतापर्यंत ही क्षेत्रे काहीप्रमाणात सरकारच्या मदतीने आणि काही अंशी आपल्याआजवरच्या गतीने तग धरून आहेत. परंतु आणखी तीनमहिने उलटल्यानंतर या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कपातहोऊ शकते. त्यामुळे भारत हे जास्त काळ सहन करूशकत नाही. यावर उपाय शोधावेच लागतील. याचा अर्थ असा नाही की भारताने ट्रम्प यांची गयावयाकरावी, ज्याची अपेक्षा ते जिनपिंग आणि पुतीन सोडूनजगातील प्रत्येक नेत्याकडून ठेवतात. पण भारत त्याअनेक प्रकरणांत लवचिक भूमिका घेऊ शकतो. जे विषयट्रम्प यांच्यासाठी संवेदनशील आहेत. उदाहरणार्थ, त्यांचीशेती क्षेत्रातील लॉबी. मला माहीत आहे की भारतात याचानैसर्गिक विरोध या भीतीमुळे होतोय की, यामुळे भारतीयशेती उद्ध्वस्त होईल किंवा येथे जनुकीय बदल केलेल्याउत्पादनांचा महापूर येईल, ज्यावर भारताने बंदी घातलीआहे (जी मी पूर्वीपासूनच अयोग्य मानत आलो आहे). आक्रमक न होताही मार्ग काढला जाऊ शकतो. जरापाहा, ढाका येथील अमेरिकन दूतावास तिथे केवळ५८,००० टन मक्याच्या आयातीवर किती आनंदी आहे. हाकोंबड्यांचा चारा आहे. भारत प्रामुख्याने कोंबड्यांसाठीएकूण चाऱ्याची आयात करतो. केवळ इथेनॉलबनवण्यासाठी किंवा चाऱ्यासाठी मका आयात करण्यातकाय अडचण आहे? आता असे म्हणू नका की, आम्हीआमच्या कोंबड्यांना जनुकीय बदल केलेला चारा खाऊघालू शकत नाही. अशा कापसाची सरकी आपल्याजनावरांचा मुख्य चारा आहे. आणि त्यापासून काढलेजाणारे तेल आपल्या अन्नसाखळीत गेल्या २३ वर्षांपासूनअस्तित्वात आहे. संपूर्ण जग ट्रम्प यांना हाताळण्याचे उपाय शोधत आहे.आतापर्यंत तुम्हाला त्यांच्या पद्धती आणि शैलीसमजलीच असेल. कोणताही गाजावाजा न करता त्यांनाकाही बिनधोक विजयांचे श्रेय घेऊ दिले जाऊ शकते.थोडा आवाज होऊ शकतो आणि संघर्षही होऊ शकतो,जसा इंदिरा गांधी आणि निक्सन यांच्यात झाला होता. पणतो काळ वेगळा होता. तेव्हा शीतयुद्ध शिगेला पोहोचलेहोते. आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अमेरिकाआणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणावर जोडलागेला आहे. अशा परिस्थितीत ठोस आर्थिक सुधारणा पुढेन्या, कारण असे संकट पिढ्यांवर एखाद्या वेळीच येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अशी संधी क्वचितच येते...आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्याअमेरिका आणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्याप्रमाणावर जोडला गेला आहे. अशा परिस्थितीतठोस आर्थिक सुधारणा पुढे न्या, कारण असे संकटपिढ्यांमध्ये एखाद्या वेळीच येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




