माझे एक मन असे म्हणू इच्छिते की, ‘धन्यवाद मिस्टरट्रम्प, तुम्ही भारतासोबत व्यापार करार करणे सातत्यानेटाळाटाळ करत आहात!’ कारण तुम्ही तसे केले नसते,तर १९९१ नंतर आतापर्यंत झाल्या नव्हत्या अशामहत्त्वाच्या आर्थिक सुधारणा इतक्या वेगाने झाल्यानसत्या. उदाहरण म्हणून नवीन कामगार कायदेच घ्या. सरकारने यापूर्वी नवीन भूसंपादन विधेयक, कृषीकायदे हे मागे घेतले होते आणि जोखीम टाळण्यासाठीकामगार कायदे बासनात गुंडाळून ठेवले होते. आर्थिकप्रशासनाच्या बाबतीत, उदाहरणार्थ सरकारी बँकांच्याताळेबंदाची स्वच्छता, त्यांचे सक्षमीकरण आणिदिवाळखोरी कायदा इत्यादी बाबतीत काही सुधारणानक्कीच झाल्या. परंतु यादरम्यान ‘सरकारच माय-बाप’असणारा संरक्षणवाद पुन्हा परतला. आयात शुल्कात वाढझाली आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या रूपाने एकमोठी नॉन-टेरिफची सुरक्षा भिंत उभी केली गेली. भारतीयउद्योगातील गटांनी यासाठी लाॅबिंग केले व ते प्राप्तही केले. अत्यंत हुशार भारतीय सनदी सेवांच्या अंतर्गत गटानेचहे तयार केले असावे. ट्रम्प बहुधा भारताच्या याच नॉनटेरिफ अडथळ्यांचा उल्लेख करत होते. वास्तविक,त्यांची वेळ आता संपली आहे. आता हे अडथळे घाईनेनसले तरी सावधपणे दूर केले जात आहेत. अनुभवीआणि विश्वासू अधिकारी या परतीच्या प्रकल्पाला पुढे नेतआहेत. देव त्यांना अधिक शक्ती देवो! पण, ट्रम्पसाहेब तुमचे पुन्हा एकदा आभार. आभार मृदुभावासाठीनाही, तर असा अहंकार दाखवण्यासाठी की तुम्ही एकाअत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक संबंध केवळ एकाहट्टासाठी खराब करून घेतले. कुणी तुम्हाला फोन केलाहोता की नाही! ट्रम्प नसते, तर व्यापारापासून तोंडफिरवणाऱ्या आपल्या सत्तायंत्रणेला व्यापार कराराची जादू समजली नसती. आता तर ब्रिटन आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचा व्यापार करार आपल्या खिशातआहे. युरोपियन युनियनसोबतही करार होणार आहे. चीन वगळता प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीचाजवळपास प्रत्येक सदस्य देश आता सोबत आला आहे. यानंतर व्यापाराबाबत भारताचा विचारही बदलला आहे. म्हणूनच मिस्टर ट्रम्प, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद! ७% आर्थिक विकास दरासोबत नगण्य महागाई दर,त्याला हिंदुत्ववादी राष्ट्रवाद व लोककल्याणकारीयोजनांच्या कार्यक्षम वितरणाची जोड, यामुळे एकजबरदस्त निवडणूक फॉर्म्युला तयार होतोच. मग आपली नौका जोखमीत कशाला टाकायची? पण ट्रम्प यांनी आपल्याला आठवण करून दिली की सावधपणे खेळणेहा आता पर्याय उरलेला नाही. त्यामुळे स्कोअर वाढवा,मग जोखीम काहीही असो! ट्रम्प व्यापाराला आपल्या धोरणाचे हत्यार बनवतीलअशी अपेक्षा होतीच. पण भारत असा अंदाज लावूशकला नाही की ते आयात शुल्काचा वापर एखाद्याशस्त्रासारखा करतील. खरं सांगायचं तर, बाकी जगालाहीयाचा अंदाज आला नव्हता. भारत व्यापाराबाबत सर्वातजास्त समाधानी आणि उदासीन होता. आपला असासमज झाला होता, की ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातदोन्ही देशांचे संबंध धोरणात्मक हितांनी सुरळीत सुरूराहतील. परंतु याउलट ही धोरणात्मक बाजू आपल्यासाठीतेव्हा उलटली, जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानपुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या जवळ पोहोचला. मोदीआणि ट्रम्प यांच्यातील सौहार्दाचे जे काही थोडे पाणीउरले होते, ते ‘माझा नोबेल पुरस्कार कुठे आहे?’ याउष्णतेत वाफ होऊन उडून गेले. भारत त्यांच्या नावाचीशिफारस तर करूच शकत नव्हता, पण आपण पाकलाधडा शिकवण्यापूर्वीच त्यांना भानावर आणण्यासाठीआणि युद्धविरामाचा मार्ग सुकर करण्यासाठी ट्रम्प यांचेआभार मानण्याचा विचार नक्कीच करता आला असता.हे नाकारणे ही धोरणात्मक चूक होती. माझे दुसरे मन ही गोष्ट मान्य करते की, हे जे संकट सुरूआहे, ते कशा प्रकारे कमी पगाराच्या लाखो नोकऱ्यासंपवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्यामत्स्यपालन, कपडा उद्योग, हिरे आणि दागिने यांसारख्याक्षेत्रांचे नुकसान करत आहे. आतापर्यंत ही क्षेत्रे काहीप्रमाणात सरकारच्या मदतीने आणि काही अंशी आपल्याआजवरच्या गतीने तग धरून आहेत. परंतु आणखी तीनमहिने उलटल्यानंतर या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कपातहोऊ शकते. त्यामुळे भारत हे जास्त काळ सहन करूशकत नाही. यावर उपाय शोधावेच लागतील. याचा अर्थ असा नाही की भारताने ट्रम्प यांची गयावयाकरावी, ज्याची अपेक्षा ते जिनपिंग आणि पुतीन सोडूनजगातील प्रत्येक नेत्याकडून ठेवतात. पण भारत त्याअनेक प्रकरणांत लवचिक भूमिका घेऊ शकतो. जे विषयट्रम्प यांच्यासाठी संवेदनशील आहेत. उदाहरणार्थ, त्यांचीशेती क्षेत्रातील लॉबी. मला माहीत आहे की भारतात याचानैसर्गिक विरोध या भीतीमुळे होतोय की, यामुळे भारतीयशेती उद्ध्वस्त होईल किंवा येथे जनुकीय बदल केलेल्याउत्पादनांचा महापूर येईल, ज्यावर भारताने बंदी घातलीआहे (जी मी पूर्वीपासूनच अयोग्य मानत आलो आहे). आक्रमक न होताही मार्ग काढला जाऊ शकतो. जरापाहा, ढाका येथील अमेरिकन दूतावास तिथे केवळ५८,००० टन मक्याच्या आयातीवर किती आनंदी आहे. हाकोंबड्यांचा चारा आहे. भारत प्रामुख्याने कोंबड्यांसाठीएकूण चाऱ्याची आयात करतो. केवळ इथेनॉलबनवण्यासाठी किंवा चाऱ्यासाठी मका आयात करण्यातकाय अडचण आहे? आता असे म्हणू नका की, आम्हीआमच्या कोंबड्यांना जनुकीय बदल केलेला चारा खाऊघालू शकत नाही. अशा कापसाची सरकी आपल्याजनावरांचा मुख्य चारा आहे. आणि त्यापासून काढलेजाणारे तेल आपल्या अन्नसाखळीत गेल्या २३ वर्षांपासूनअस्तित्वात आहे. संपूर्ण जग ट्रम्प यांना हाताळण्याचे उपाय शोधत आहे.आतापर्यंत तुम्हाला त्यांच्या पद्धती आणि शैलीसमजलीच असेल. कोणताही गाजावाजा न करता त्यांनाकाही बिनधोक विजयांचे श्रेय घेऊ दिले जाऊ शकते.थोडा आवाज होऊ शकतो आणि संघर्षही होऊ शकतो,जसा इंदिरा गांधी आणि निक्सन यांच्यात झाला होता. पणतो काळ वेगळा होता. तेव्हा शीतयुद्ध शिगेला पोहोचलेहोते. आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अमेरिकाआणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणावर जोडलागेला आहे. अशा परिस्थितीत ठोस आर्थिक सुधारणा पुढेन्या, कारण असे संकट पिढ्यांवर एखाद्या वेळीच येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अशी संधी क्वचितच येते...आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्याअमेरिका आणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्याप्रमाणावर जोडला गेला आहे. अशा परिस्थितीतठोस आर्थिक सुधारणा पुढे न्या, कारण असे संकटपिढ्यांमध्ये एखाद्या वेळीच येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



