
Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 89 जण सुरक्षित आहेत. १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सरकारला तर काहींनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'जिल्हा प्रशासनाला अंदाज का आला नाही?', असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी इर्शाळवाडीच्या दुर्घटनाप्रकरणी फेसबुक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा.
|
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का, नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवारांना जाहीर केला पाठिंबा |
'या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, 'जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.' तसचं, 'खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती. पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन?,' असा सवाल त्यांनी केला आहे.
'पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा', असे सांगत राज ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेविषयी नंतर सविस्तर बोलेल असे सांगितले आहे. दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणावर जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. पण मुसळधार पाऊस, अरुंद रस्ते, दुर्गंम भाग असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री घटनास्थळावर उपस्थित असून ते मृतांचे नातेवाईक आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांना धीर देत आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




