
Raigad : जुळे बाळ घरी आल्याच्या आनंदात न्हालेल्या कुटुंबावर काही तासांतच दु:खाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यात घडली. अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत असलेले वनरक्षक सुरज सारंगे यांचा शुक्रवारी (दि. ६) रात्री उशिरा रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला. रेवस–रेड्डी मार्गावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वनविभागात शोककळा पसरली आहे.
अपघात कसा घडला?
मुरूड तालुक्यातील सर्वे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे हे अलिबाग वनविभागाच्या तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदून ठेवलेल्या मोरीत त्यांची मोटारसायकल अचानक कोसळली. खड्डा खोल असल्याने दुचाकीचा तोल जाऊन सारंगे खाली पडले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही तासांत आनंदाचे रूपांतर शोकात
या घटनेतील सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुरज सारंगे यांना जुळे अपत्य झाले होते. शुक्रवारीच ही दोन्ही बाळे हॉस्पिटलमधून घरी आली होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. या आनंदाचा क्षण त्यांनी आपल्या मोबाईल स्टेटसवरही व्यक्त केला होता. मात्र काही तासांतच नियतीने क्रूर घाला घातल्याने आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले. जुळ्या अपत्याच्या स्वागताची तयारी करणाऱ्या कुटुंबाला त्यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला आहे.
रस्त्यावरील निष्काळजीपणाचा आरोप
दरम्यान, रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेला खड्डा तसेच उघडी मोरी योग्य प्रकारे सुरक्षित करण्यात आली नव्हती. त्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट्स, सूचना फलक, रेडियम पट्ट्या किंवा रात्री वाहनचालकांना दिसण्यासाठी लाल दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा अपघात निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकाराबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे.
कारवाईची मागणी
या घटनेनंतर महाराष्ट्र वनरक्षक–वनपाल संघटना, शाखा अलिबागचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षाव्यवस्था न ठेवल्यामुळे एका कर्तव्यदक्ष वनरक्षकाला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्राधिकरण आणि कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
वनविभागात शोककळा
सुरज सारंगे हे कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने वनविभागातील सहकारी तसेच मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. जुळ्या अपत्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्याआधीच कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



