प्रत्येक तांत्रिक क्रांती आपल्यासोबत या शंका घेऊन येते की नवोपक्रमाचा फटका नोकऱ्यांना बसेल. इतिहासात आतापर्यंत या शंका कधीही खऱ्या ठरल्या नाहीत, पण एआयची गोष्ट वेगळी आहे. यामध्ये खरोखरच इतकी क्षमता आहे की, ते अनेक कार्ये मनुष्यांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षा कुठेही चांगल्या प्रकारे करू शकते, तर मग यावेळी मानवी श्रमासाठी असलेला धोका वास्तवात वेगळा आणि अधिक गंभीर आहे का? पण एआयबाबत आज दिसत असलेल्या वेडामध्ये एका तथ्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या चार दशकांमध्ये ज्या देशांमध्ये कामकरी वर्गाची लोकसंख्या घटत आहे, अशा देशांची संख्या शून्यावरून वाढून 55 झाली आहे. यामध्ये बहुतांश प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. ही घट आता अधिक वेगवान होत आहे, कारण कुटुंबे अपेक्षेपेक्षा कमी मुले जन्माला घालत आहेत. गेल्या वर्षी चीनमध्ये जन्मलेल्या बालकांची संख्या 1949 मध्ये या पीपल्स रिपब्लिकच्या स्थापनेनंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे. जपानमध्ये तर ही संख्या आता 1899 नंतर सर्वात कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या अंदाजांच्या तुलनेत जागतिक प्रजनन दर आता अंदाजापेक्षा 25 वर्षे आधीच लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा खाली जाण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, जगातील कामकरी वयोगटातील लोकसंख्येचा उच्चांक देखील अंदाजापेक्षा 30 वर्षे आधी येऊ शकतो. असे संकेत मिळत आहेत की, एआय आधीच प्रति कामगार उत्पादन वाढवत आहे, ज्यामुळे मानवी श्रमाची एकूण मागणी घटू शकते. पण वेगाने घटणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, एआय मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण करण्याऐवजी येणाऱ्या लेबर-शॉर्टेजच्या समस्येला कमी करण्यात अधिक मदतनीस ठरू शकतो. हे लक्षात ठेवा की, भूतकाळातील तांत्रिक क्रांतींनी नोकऱ्या नव्हे, तर उद्योग संपवले होते. 19 व्या शतकात मशीनच्या उदयाने श्रमिकांना शेतातून कारखान्यांकडे आणि नंतर कारखान्यांतून सेवा क्षेत्राकडे ढकलले होते. 1910 च्या दशकात जेव्हा कारने घोडागाड्यांची जागा घेतली, तेव्हा टांगा चालवणाऱ्यांच्या जागी ऑटो, ट्रकचालक आणि टॅक्सी ड्रायव्हर आले. 1970 च्या दशकात एटीएम मशीनने बँकांना आपला खर्च कमी करण्यास आणि अधिक शाखा उघडण्यास मदत केली. 1990 च्या दशकापासून आतापर्यंत इंटरनेटने जर अमेरिकेत सुमारे 35 लाख नोकऱ्या संपवल्या असतील, तर 1.9 कोटी नवीन नोकऱ्या देखील निर्माण केल्या होत्या. निश्चितपणे, एआय या सर्वांपेक्षा जास्त उलथापालथ करू शकते. एका अंदाजानुसार, एआय आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानासाठी- जसे की ह्युमनॉइड रोबोट्ससाठी जागतिक स्तरावर कमाल श्रम-बाजार सुमारे 400 कोटी नोकऱ्यांपर्यंतचा असू शकतो, पण सध्या तरी एआय तसे करू शकत नाही. जागतिक स्तरावर आणि अमेरिकेसारख्या एआय क्षेत्रात अग्रणी असलेल्या देशांमध्ये बेरोजगारीचा दर अनेक दशकांच्या पातळीच्या आसपासच कायम आहे. जपानमध्येही रोबोट्सची संख्या वेगाने वाढूनही वर्षानुवर्षे बेरोजगारीचा दर घटत आहे आणि श्रम-बलातील सहभाग वाढत आहे. वास्तवत: आपण हे तर पाहू शकतो की, सध्या कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत, पण भविष्यात कोणत्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत, त्यांची कल्पना इतक्या सहजपणे करू शकत नाही. अमेरिकेत आज निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांपैकी सुमारे एक-तृतीयांश अशा श्रेणीतील आहेत, ज्या 25 वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हत्या. एआय कंटेंट क्रिएटर्स, प्रॉडक्ट मॅनेजर्स, इंजिनिअर्स आणि सिस्टम डिझाइनर्स यांसारखी नवीन जॉब टायटल्स वेगाने वाढत आहेत आणि ती पारंपरिक श्रेणींमध्ये झालेल्या नोकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई मोठ्या सहजतेने करताना दिसत आहेत. एआयने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण केली तरीही माणसे शांत बसतील का? 2000 च्या दशकात ‘चायना-शॉक’ने अमेरिकेच्या जुन्या औद्योगिक क्षेत्रांतील सुमारे 60 लाख फॅक्टरी कामगारांना विस्थापित केले होते आणि हे जनक्षोभ भडकवण्यासाठी पुरेसे ठरले होते. एआयमुळे जितक्या जास्त नोकऱ्या धोक्यात येतील, तितकी जास्त शक्यता मतदार सरकारांकडे त्याचा प्रसार धिमा करण्याची मागणी करतील. कोणतीही अर्थव्यवस्था श्रमशक्ती वाढवल्याशिवाय वेगाने पुढे जाऊ शकलेली नाही. एआय उलट लेबर-शॉर्टेजच्या कमतरतेशी झुंजणाऱ्या जगाला दिलासा देऊ शकते. यामुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमी आहे- किमान अनिर्बंधपणे तरी नाही. एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वाचा राहील. कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
एआयमुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमीच आहे. किमान अनिर्बंधपणे तरी नाही. वास्तवत: एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वपूर्ण राहतील- कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

