प्रत्येक तांत्रिक क्रांती आपल्यासोबत या शंका घेऊन येते की नवोपक्रमाचा फटका नोकऱ्यांना बसेल. इतिहासात आतापर्यंत या शंका कधीही खऱ्या ठरल्या नाहीत, पण एआयची गोष्ट वेगळी आहे. यामध्ये खरोखरच इतकी क्षमता आहे की, ते अनेक कार्ये मनुष्यांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षा कुठेही चांगल्या प्रकारे करू शकते, तर मग यावेळी मानवी श्रमासाठी असलेला धोका वास्तवात वेगळा आणि अधिक गंभीर आहे का? पण एआयबाबत आज दिसत असलेल्या वेडामध्ये एका तथ्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या चार दशकांमध्ये ज्या देशांमध्ये कामकरी वर्गाची लोकसंख्या घटत आहे, अशा देशांची संख्या शून्यावरून वाढून 55 झाली आहे. यामध्ये बहुतांश प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. ही घट आता अधिक वेगवान होत आहे, कारण कुटुंबे अपेक्षेपेक्षा कमी मुले जन्माला घालत आहेत. गेल्या वर्षी चीनमध्ये जन्मलेल्या बालकांची संख्या 1949 मध्ये या पीपल्स रिपब्लिकच्या स्थापनेनंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे. जपानमध्ये तर ही संख्या आता 1899 नंतर सर्वात कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या अंदाजांच्या तुलनेत जागतिक प्रजनन दर आता अंदाजापेक्षा 25 वर्षे आधीच लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा खाली जाण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, जगातील कामकरी वयोगटातील लोकसंख्येचा उच्चांक देखील अंदाजापेक्षा 30 वर्षे आधी येऊ शकतो. असे संकेत मिळत आहेत की, एआय आधीच प्रति कामगार उत्पादन वाढवत आहे, ज्यामुळे मानवी श्रमाची एकूण मागणी घटू शकते. पण वेगाने घटणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, एआय मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण करण्याऐवजी येणाऱ्या लेबर-शॉर्टेजच्या समस्येला कमी करण्यात अधिक मदतनीस ठरू शकतो. हे लक्षात ठेवा की, भूतकाळातील तांत्रिक क्रांतींनी नोकऱ्या नव्हे, तर उद्योग संपवले होते. 19 व्या शतकात मशीनच्या उदयाने श्रमिकांना शेतातून कारखान्यांकडे आणि नंतर कारखान्यांतून सेवा क्षेत्राकडे ढकलले होते. 1910 च्या दशकात जेव्हा कारने घोडागाड्यांची जागा घेतली, तेव्हा टांगा चालवणाऱ्यांच्या जागी ऑटो, ट्रकचालक आणि टॅक्सी ड्रायव्हर आले. 1970 च्या दशकात एटीएम मशीनने बँकांना आपला खर्च कमी करण्यास आणि अधिक शाखा उघडण्यास मदत केली. 1990 च्या दशकापासून आतापर्यंत इंटरनेटने जर अमेरिकेत सुमारे 35 लाख नोकऱ्या संपवल्या असतील, तर 1.9 कोटी नवीन नोकऱ्या देखील निर्माण केल्या होत्या. निश्चितपणे, एआय या सर्वांपेक्षा जास्त उलथापालथ करू शकते. एका अंदाजानुसार, एआय आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानासाठी- जसे की ह्युमनॉइड रोबोट्ससाठी जागतिक स्तरावर कमाल श्रम-बाजार सुमारे 400 कोटी नोकऱ्यांपर्यंतचा असू शकतो, पण सध्या तरी एआय तसे करू शकत नाही. जागतिक स्तरावर आणि अमेरिकेसारख्या एआय क्षेत्रात अग्रणी असलेल्या देशांमध्ये बेरोजगारीचा दर अनेक दशकांच्या पातळीच्या आसपासच कायम आहे. जपानमध्येही रोबोट्सची संख्या वेगाने वाढूनही वर्षानुवर्षे बेरोजगारीचा दर घटत आहे आणि श्रम-बलातील सहभाग वाढत आहे. वास्तवत: आपण हे तर पाहू शकतो की, सध्या कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत, पण भविष्यात कोणत्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत, त्यांची कल्पना इतक्या सहजपणे करू शकत नाही. अमेरिकेत आज निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांपैकी सुमारे एक-तृतीयांश अशा श्रेणीतील आहेत, ज्या 25 वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हत्या. एआय कंटेंट क्रिएटर्स, प्रॉडक्ट मॅनेजर्स, इंजिनिअर्स आणि सिस्टम डिझाइनर्स यांसारखी नवीन जॉब टायटल्स वेगाने वाढत आहेत आणि ती पारंपरिक श्रेणींमध्ये झालेल्या नोकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई मोठ्या सहजतेने करताना दिसत आहेत. एआयने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण केली तरीही माणसे शांत बसतील का? 2000 च्या दशकात ‘चायना-शॉक’ने अमेरिकेच्या जुन्या औद्योगिक क्षेत्रांतील सुमारे 60 लाख फॅक्टरी कामगारांना विस्थापित केले होते आणि हे जनक्षोभ भडकवण्यासाठी पुरेसे ठरले होते. एआयमुळे जितक्या जास्त नोकऱ्या धोक्यात येतील, तितकी जास्त शक्यता मतदार सरकारांकडे त्याचा प्रसार धिमा करण्याची मागणी करतील. कोणतीही अर्थव्यवस्था श्रमशक्ती वाढवल्याशिवाय वेगाने पुढे जाऊ शकलेली नाही. एआय उलट लेबर-शॉर्टेजच्या कमतरतेशी झुंजणाऱ्या जगाला दिलासा देऊ शकते. यामुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमी आहे- किमान अनिर्बंधपणे तरी नाही. एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वाचा राहील. कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
एआयमुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमीच आहे. किमान अनिर्बंधपणे तरी नाही. वास्तवत: एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वपूर्ण राहतील- कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




