कोल्हापूर: 'टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्यूशन्स' या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन ते पाच टक्के परतावा देण्याचे, तसेच १२ महिन्यांनंतर मूळ गुंतवणूक परत करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
समीर सुभाष नार्वेकर (वय ३६), नेहा समीर नार्वेकर (वय ३६, रा. दोघेही, गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि अमित विश्वनाथ बालम (वय ३८, रा. कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी सांगितले की, वीणा नितीन लकडे (वय ४१, रा. पुईखडी, राधानगरी रोड, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला फिर्यादीसह अन्य नऊ गुंतवणूकदारांची मिळून ६४ लाख ९८ हजार ८९७ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या अन्य गुंतवणूकदारांनीही पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
त्यानंतर आणखी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्याने या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती वाढल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण ३ कोटी ९२ लाख ६० हजार रुपये गुंतविल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ७२ हजार ६६१ रुपये परतावा देण्यात आला. मात्र २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपये परत न केल्याने एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पाच टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष
कोल्हापुरातील कावळा नाका, 'टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्यूशन्स' होते. येथे गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. नऊ लाख रुपये गुंतविल्यास तीन टक्के परतावा, दहा लाख रुपये गुंतविल्यास चार टक्के आणि २५ लाख रुपये गुंतविल्यास पाच टक्के परतावा, तसेच १२ महिन्यांनंतर गुंतविलेली मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. गुंतवणुकीच्या हमीसाठी नोटरी करून देण्याचेही सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सतरा लाख भरले पण...
फिर्यादी वीणा लकडे यांनी एप्रिल २०२३ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेमार्फत कंपनीत १७ लाख रुपये गुंतवले. आश्वासनानुसार परतावा तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर मूळ रक्कम परत करण्यात आली नाही. मार्च २०२५ पासून परतावा बंद करून आर्थिक फसवणूक केली. यामुळे लकडे यांनी पोलिसांत धाव घेतली.
सहापैकी तिघांना अटक
लकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण सहा संशयित आरोपी आहेत. यातील तिघांना अटक झाली आहे. उर्वरित चिन्मय पालकर, विजय पताडे, निखिल सुर्वे हे अजून फरार आहेत, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहर
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
महाराष्ट्र
- सातारा: पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर अखेर साताऱ्यातील त्या अभागी मातेचा वृद्धाश्रमात निवारा; मन हेलावून टाकणारी घटना
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



