
Jharkhand News : लग्न म्हटलं की प्रत्येक तरुण-तरुणींच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. पण बऱ्याचदा काही कारणास्तव लग्न मोडल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. लग्न मोडण्यामागं अनेक कारणं असतील पण थंडीमुळे लग्न मोडलं असं कारण तुम्ही कधी ऐकले नसेल. तर झारखंडमध्ये एका तरुण-तरुणीचं लग्न थंडीमुळे मोडल्याची घटना समोर आली आहे. लग्न मंडपातून नवरीला न घेता नवरदेव तसाच घरी परत गेला. लग्नाच्या वेळी नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत...
तरुण-तरुणीचे कुटुंब लग्नाच्या ठिकाणी पोहचले. दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विधीला देखील सुरूवात झाली. गार्डनमध्ये लग्न असल्यामुळे स्टेज गार्डनच्या मध्यभागी बांधण्यात आला होता. तरुण-तरुणींनी एकमेकांना वरमाला घातल्या त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सातफेरे घेण्यासाठी नवरा-नवरी मंडपात आले. पंडितांनी विवाह विधीला सुरूवात केली. विधी सुरू असतानाच अचानक नवरदेव बेशुद्ध पडला.
|
Uddhav Thackeray : निकष बाजूला ठेवा, लाडक्या बहिणींना तात्काळ २१०० रूपये द्या - ठाकरेंची मागणी |
नवरदेवाचे अंग थंडीमुळे थरथर कापत होते. नवरदेवाच्या कुटुंबीयांना ताबडतोब त्याला एका खोलीमध्ये नेले आणि त्याचे हातपाय चोळले. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्याला इंजेक्शन देऊन सलाईन लावण्यात आली. एक ते दीड तासानंतर नवरदेवाची प्रकृती ठिक झाल्यानंतर तो पुन्हा मंडपात आला. पण नवरीने लग्न करण्यास नकार दिला.
नवरीने सांगितले की, तरुणाला काही तरी आजार आहे. त्यामुळे मी त्याच्याशी लग्न करणार नाही. नवरीला संशय आला कारण नवरदेवाच्या लग्नाची मिरवणूक त्यांच्या घरातून नवरीच्या घरी येते पण या लग्नात नवरीच्या कुटुंबीयांना नवरदेवाच्या घरी बोलावण्यात आले होते आणि एका गार्डनमध्ये लग्न ठेवण्यात आले होते. नवरीने नकार दिल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाले. पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांचा वाद सुरू होता.
दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाला तेव्हा याची माहिती मोहनपूर पोलिस ठाण्यात देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच मोहनपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही कुटुंबीयांना समजावून सांगितले. मात्र नवरीने लग्नाला नकार दिला. ती लग्न करायला तयार होत नव्हती त्यामुळे अखेर सकाळी ८ वाजता नवरदेव नवरीला न घेता असाच निघून गेला आणि नवरी आपल्या कुटुंबीयांसोबत बिहारला निघून गेली.
शहर
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
- पुणे: पोलिसांची मोठी कारवाई! मोबाइल दुकान मालकाच्या हत्येच्या प्रयत्नातील 'घायवळ गँग'चा प्रवीण गुंड प्रशांत धुमाळ मुंबईतून जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: जिल्हा परिषद निवासी क्रीडा शाळेत चार विद्यार्थ्यांना उंदरांचा चावा; स्वच्छतेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
गुन्हा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या



























Subscribe to my channel


