
Jharkhand News : लग्न म्हटलं की प्रत्येक तरुण-तरुणींच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. पण बऱ्याचदा काही कारणास्तव लग्न मोडल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. लग्न मोडण्यामागं अनेक कारणं असतील पण थंडीमुळे लग्न मोडलं असं कारण तुम्ही कधी ऐकले नसेल. तर झारखंडमध्ये एका तरुण-तरुणीचं लग्न थंडीमुळे मोडल्याची घटना समोर आली आहे. लग्न मंडपातून नवरीला न घेता नवरदेव तसाच घरी परत गेला. लग्नाच्या वेळी नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत...
तरुण-तरुणीचे कुटुंब लग्नाच्या ठिकाणी पोहचले. दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विधीला देखील सुरूवात झाली. गार्डनमध्ये लग्न असल्यामुळे स्टेज गार्डनच्या मध्यभागी बांधण्यात आला होता. तरुण-तरुणींनी एकमेकांना वरमाला घातल्या त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सातफेरे घेण्यासाठी नवरा-नवरी मंडपात आले. पंडितांनी विवाह विधीला सुरूवात केली. विधी सुरू असतानाच अचानक नवरदेव बेशुद्ध पडला.
|
Uddhav Thackeray : निकष बाजूला ठेवा, लाडक्या बहिणींना तात्काळ २१०० रूपये द्या - ठाकरेंची मागणी |
नवरदेवाचे अंग थंडीमुळे थरथर कापत होते. नवरदेवाच्या कुटुंबीयांना ताबडतोब त्याला एका खोलीमध्ये नेले आणि त्याचे हातपाय चोळले. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्याला इंजेक्शन देऊन सलाईन लावण्यात आली. एक ते दीड तासानंतर नवरदेवाची प्रकृती ठिक झाल्यानंतर तो पुन्हा मंडपात आला. पण नवरीने लग्न करण्यास नकार दिला.
नवरीने सांगितले की, तरुणाला काही तरी आजार आहे. त्यामुळे मी त्याच्याशी लग्न करणार नाही. नवरीला संशय आला कारण नवरदेवाच्या लग्नाची मिरवणूक त्यांच्या घरातून नवरीच्या घरी येते पण या लग्नात नवरीच्या कुटुंबीयांना नवरदेवाच्या घरी बोलावण्यात आले होते आणि एका गार्डनमध्ये लग्न ठेवण्यात आले होते. नवरीने नकार दिल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाले. पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांचा वाद सुरू होता.
दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाला तेव्हा याची माहिती मोहनपूर पोलिस ठाण्यात देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच मोहनपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही कुटुंबीयांना समजावून सांगितले. मात्र नवरीने लग्नाला नकार दिला. ती लग्न करायला तयार होत नव्हती त्यामुळे अखेर सकाळी ८ वाजता नवरदेव नवरीला न घेता असाच निघून गेला आणि नवरी आपल्या कुटुंबीयांसोबत बिहारला निघून गेली.
शहर
- नाशिक: गणपती विसर्जनावेळी मोठा अनर्थ; सटाण्यात खासगी क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू, गावात शोककळा!
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
महाराष्ट्र
- नाशिक: गणपती विसर्जनावेळी मोठा अनर्थ; सटाण्यात खासगी क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू, गावात शोककळा!
- गोवा: गणेशोत्सवाला 'ओमकार' हत्तीच्या त्रासाचे ग्रहण; गणपतीची आरती करायची की पिके वाचवायची? शेतकरी आक्रमक
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!




























Subscribe to my channel




