छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत संतापजनक आणि थरारक घटना समोर आली आहे. वाळूचे कमिशन न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाचे रिक्षातून जात असताना फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास फकीरचंद उर्फ मनीष शामसिंग महेर हा तरुण सिडको उड्डाणपुलाखाली एका रिक्षातून प्रवास करत होता. यादरम्यान, काही जणांनी त्याची रिक्षा अडवली. आरोपींनी त्याला बळजबरीने रिक्षातून बाहेर काढले आणि 'गुड्डू भैय्या'च्या नावाच्या एका काळ्या रंगाच्या थार गाडीत (Thar) जबरदस्तीने डांबून त्याचे अपहरण केले.

 

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत कारवाई केली आहे. युवकाचे अपहरण करणारे जाफर उर्फ गुड्डू अय्युब शेख, जावेद अमीन शेख आणि अनस अय्युब शेख या तिन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. वाळूच्या व्यवहारातील कमिशनच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *