
Women Health : महिलांसाठी धोरण... महिलांसाठी सुरक्षा... अशा कितीही व्यापक योजना सरकारने आखल्या तरीही आज महिलाच्या आरोग्याबाबत सरकार खरंच त्याची अंमलबावणी करतं का? असा सवाल विचारला जात आहे. महिलांची सुरक्षा समाजातील नाही तर आरोग्याच्या चौकटीत आखली गेली पाहिजे. आजही अनेक महिला जीवन-मरणाच्या दारात उभ्या आहेत. हे जळजळीत वास्तव आहे. पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...
समाजात सुशिक्षित महिलांचे वाढते प्रस्त लक्षात घेता आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे पहायला मिळत आहेत. महिलांचे समाजातील स्थान आणखी बळकट करण्यासाठी आरोग्यापासून सुरक्षेपर्यंत सर्वच बाबींवर विशेष प्रकाश टाकला जातो. इतकाच काय तर महिला आर्थिक विवंचनेच्या कचाट्यात सापडून तिला हतबल करु नये, यासाठी अनेक योजनांचा पाऊसही पाडला जातो.
पण इतक्या सर्व गोष्टींच्या गराड्यात महिला आरोग्य सुरक्षेच्या बाबत मात्र डोळेझाक कायम होत आल्याचे निदर्शनात आलं आहे. आता आम्ही हे का म्हणतोय याचे उत्तर म्हणजे नुकताच सुलभ स्वच्छता मिशन फाउंडेशनने केलेला सर्वे. हा सर्वे त्यांनी महाराष्ट्रातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात केलाय. यामधून काय वास्तव समोर आलंय पाहा...
|
|
कसं केलं सर्वेक्षण?
- बीड आणि धाराशिव येथील जिल्ह्यातील १० गावांमध्ये खेत्री संशोधन केले.
- बीडमधील ३५१ आणि धाराशिव येथील २२६ महिलांसह एकूण ५७७ महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
- बीड येथील १९.१ टक्के महिलांना मासिक पाळीशी कोणते अवयव संबंधित आहेत हे माहित नव्हतं.
- बीड येथील २६.५ टक्के महिलांना मासिक पाळीची कारणे माहिती नव्हती.
- बीड येथील २४.५ टक्के महिला आणि धाराशिव येथील १६.८ टक्के महिला मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या अभावाचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगू शकल्या नाहीत.
महिलांना आपल्या मासिक पाळीबाबत माहिती नाही अथवा त्यांना आपल्या अवयवाचे ज्ञान नाही फक्त इतकंच नाही तर आर्थिक परिस्थिती बिकट आणि सरकारच्या योजनांचा अभाव या गोष्टी पण त्यांच्या आरोग्याची हेळसांड करतात की काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
आर्थिक परिस्थिती आणि सरकारी योजनांचा अभाव यामुळे असलेली परिस्थिती -
- बीडमधील ७०.३ टक्के आणि धाराशिव येथील ६६.२ टक्के महिला कापडव्यतिरिक्त मासिक पाळी उत्पादनांचा वापर करतात. तर ६२.२ टक्के महिला आर्थिक अडचणींमुळे कापड आणि पॅड दोन्ही खर्च वाचवण्यासाठी वापरतात.
- बीड आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या महिला सुती कापड वापरतात. याचे प्रमाण ६२.२ टक्के आहे.
- पाळीच्या वेळी वापरलेले कापड हे विहीर नाहीतर हॅन्ड पम्पजवळ धुतले जाते. त्यावेळी एकच साबण वापरला जातो असे सांगणाऱ्या महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे.
- तर ८३.७ टक्के महिलांनी ते कापड सूर्यप्रकाशात न वाळवता बंद खोलीत वाळवले आणि ते वापरताना केवळ अर्ध्याच महिलांनी ते कोरडे असल्याची खात्री केली.
- मासिक पाळीवेळी गंभीर समस्या असूनही केवळ १४.३ टक्के महिलांनी वैद्यकीय सल्ला घेतला. पण प्रत्यक्षात फक्त ७.१ टक्के महिला डॉक्टरांना जाऊन भेटल्या.
- धाराशिव येथील १४.८ टक्के महिलांनी त्यांच्याकडे डॉक्टरकडे जायला पैसे नसल्याचे मान्य केले
- महिला डॉक्टरच्या अभावामुळे ४४.९ टक्के महिलांनी वैद्यकीय सल्ला टाळला.
'महाराष्ट्र पुरोगामी आहे पण मराठवाडा अजूनही प्रचंड मागासलेला आहे. ऊसतोड कामगार, वीट भट्टी महिला कामगार यांच्याबाबत त्यांचे मुकादम का नाही पाऊला उचलत? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत सरकारने आता एक पाऊल पुढे टाकणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाण्याची समस्या आहे त्याकडे विशेष लक्ष दिलं तर आरोग्याचेही अनेक प्रश्न सुटतील.', असे सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय संचालिका नीरजा भटनागर यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र हे सर्वात प्रगत राज्य आहे असे कितीही म्हटले तरी सत्य परिस्थिती ग्राउंडवर उतरल्याशिवाय नाही कळणार. महाराष्ट्राला जर आणखीन पुढे न्यायचे असेल तर महाराष्ट्राच्या महिलांना आर्थिक, सामाजिकसोबत आरोग्याच्या वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी मिशन उचलणं गरजेचं आहे.
दरम्यान, महिलांना बहिणीचे स्थान देणाऱ्या सरकारने एकीकडे आपली पाठ थोपटून घेतली आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने बहिणींनाही आरोग्याच्या जटील समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी सरकारच्या मदतीच्या हाताची गरज आहे. आर्थिक, वैद्यकीय आणि पाण्याच्या समस्यांनी ग्रासलेल्या मराठवाड्यातील महिलांसाठी सरकार काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



