
Women Health : महिलांसाठी धोरण... महिलांसाठी सुरक्षा... अशा कितीही व्यापक योजना सरकारने आखल्या तरीही आज महिलाच्या आरोग्याबाबत सरकार खरंच त्याची अंमलबावणी करतं का? असा सवाल विचारला जात आहे. महिलांची सुरक्षा समाजातील नाही तर आरोग्याच्या चौकटीत आखली गेली पाहिजे. आजही अनेक महिला जीवन-मरणाच्या दारात उभ्या आहेत. हे जळजळीत वास्तव आहे. पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...
समाजात सुशिक्षित महिलांचे वाढते प्रस्त लक्षात घेता आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे पहायला मिळत आहेत. महिलांचे समाजातील स्थान आणखी बळकट करण्यासाठी आरोग्यापासून सुरक्षेपर्यंत सर्वच बाबींवर विशेष प्रकाश टाकला जातो. इतकाच काय तर महिला आर्थिक विवंचनेच्या कचाट्यात सापडून तिला हतबल करु नये, यासाठी अनेक योजनांचा पाऊसही पाडला जातो.
पण इतक्या सर्व गोष्टींच्या गराड्यात महिला आरोग्य सुरक्षेच्या बाबत मात्र डोळेझाक कायम होत आल्याचे निदर्शनात आलं आहे. आता आम्ही हे का म्हणतोय याचे उत्तर म्हणजे नुकताच सुलभ स्वच्छता मिशन फाउंडेशनने केलेला सर्वे. हा सर्वे त्यांनी महाराष्ट्रातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात केलाय. यामधून काय वास्तव समोर आलंय पाहा...
|
|
कसं केलं सर्वेक्षण?
- बीड आणि धाराशिव येथील जिल्ह्यातील १० गावांमध्ये खेत्री संशोधन केले.
- बीडमधील ३५१ आणि धाराशिव येथील २२६ महिलांसह एकूण ५७७ महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
- बीड येथील १९.१ टक्के महिलांना मासिक पाळीशी कोणते अवयव संबंधित आहेत हे माहित नव्हतं.
- बीड येथील २६.५ टक्के महिलांना मासिक पाळीची कारणे माहिती नव्हती.
- बीड येथील २४.५ टक्के महिला आणि धाराशिव येथील १६.८ टक्के महिला मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या अभावाचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगू शकल्या नाहीत.
महिलांना आपल्या मासिक पाळीबाबत माहिती नाही अथवा त्यांना आपल्या अवयवाचे ज्ञान नाही फक्त इतकंच नाही तर आर्थिक परिस्थिती बिकट आणि सरकारच्या योजनांचा अभाव या गोष्टी पण त्यांच्या आरोग्याची हेळसांड करतात की काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
आर्थिक परिस्थिती आणि सरकारी योजनांचा अभाव यामुळे असलेली परिस्थिती -
- बीडमधील ७०.३ टक्के आणि धाराशिव येथील ६६.२ टक्के महिला कापडव्यतिरिक्त मासिक पाळी उत्पादनांचा वापर करतात. तर ६२.२ टक्के महिला आर्थिक अडचणींमुळे कापड आणि पॅड दोन्ही खर्च वाचवण्यासाठी वापरतात.
- बीड आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या महिला सुती कापड वापरतात. याचे प्रमाण ६२.२ टक्के आहे.
- पाळीच्या वेळी वापरलेले कापड हे विहीर नाहीतर हॅन्ड पम्पजवळ धुतले जाते. त्यावेळी एकच साबण वापरला जातो असे सांगणाऱ्या महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे.
- तर ८३.७ टक्के महिलांनी ते कापड सूर्यप्रकाशात न वाळवता बंद खोलीत वाळवले आणि ते वापरताना केवळ अर्ध्याच महिलांनी ते कोरडे असल्याची खात्री केली.
- मासिक पाळीवेळी गंभीर समस्या असूनही केवळ १४.३ टक्के महिलांनी वैद्यकीय सल्ला घेतला. पण प्रत्यक्षात फक्त ७.१ टक्के महिला डॉक्टरांना जाऊन भेटल्या.
- धाराशिव येथील १४.८ टक्के महिलांनी त्यांच्याकडे डॉक्टरकडे जायला पैसे नसल्याचे मान्य केले
- महिला डॉक्टरच्या अभावामुळे ४४.९ टक्के महिलांनी वैद्यकीय सल्ला टाळला.
'महाराष्ट्र पुरोगामी आहे पण मराठवाडा अजूनही प्रचंड मागासलेला आहे. ऊसतोड कामगार, वीट भट्टी महिला कामगार यांच्याबाबत त्यांचे मुकादम का नाही पाऊला उचलत? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत सरकारने आता एक पाऊल पुढे टाकणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाण्याची समस्या आहे त्याकडे विशेष लक्ष दिलं तर आरोग्याचेही अनेक प्रश्न सुटतील.', असे सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय संचालिका नीरजा भटनागर यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र हे सर्वात प्रगत राज्य आहे असे कितीही म्हटले तरी सत्य परिस्थिती ग्राउंडवर उतरल्याशिवाय नाही कळणार. महाराष्ट्राला जर आणखीन पुढे न्यायचे असेल तर महाराष्ट्राच्या महिलांना आर्थिक, सामाजिकसोबत आरोग्याच्या वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी मिशन उचलणं गरजेचं आहे.
दरम्यान, महिलांना बहिणीचे स्थान देणाऱ्या सरकारने एकीकडे आपली पाठ थोपटून घेतली आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने बहिणींनाही आरोग्याच्या जटील समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी सरकारच्या मदतीच्या हाताची गरज आहे. आर्थिक, वैद्यकीय आणि पाण्याच्या समस्यांनी ग्रासलेल्या मराठवाड्यातील महिलांसाठी सरकार काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




