
Pune Nagpur Vande Bharat Express Train : नागपूर आणि पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि नागपूर या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे या दोन शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस याच महिन्यात धावणार आहे. रेल्वे बोर्डामधील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी मोजक्याच ट्रेन उपलब्ध आहेत. त्याशिवाय रस्ते मार्गे अनावशक वेळ जातो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, या मागणीने जोर धारला होता. नागपूरमधील अजनी येथून वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतरही खूप कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ वंदे भारत एक्सप्रेसमुळे जवळ येणार आहे. नागपूर (अजनी)- पुणे या मार्गावर वंदे भारत धावणार असल्याचे रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका अधिकाऱ्याने दिली.
पुणे-नागपूर किती वेळ वाचणार?
पुणे ते नागपूर यादरम्यान सध्या रेल्वने १२ ते १३ तासांचे अंतर लागते. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास नागपूर ते पुणे फक्त १० तासांत पोहचणं शक्य होणार आहे. दोन ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. पुणे आणि नागपूर या मार्गावर सध्या हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे धावतेय. या ट्रेनला जवळपास १३ तास वेळ लागतो. वंदे भारतमुळे हा वेळ आणखी कमी होणार आहे.
कधी धावणार नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ?-
पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी या मार्गावर वंदे भारत धावण्याची शक्यता हे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाने पीएम कार्यालयाशी संपर्क साधलाय.
कोण कोणत्या स्थानकावर थांबणार ?
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?
A
रिपोर्ट्सनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे किती वेळ वाचवेल?
A
सुमारे २ ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. सध्याचा १३ तासांचा प्रवास १० तासांमध्ये पूर्ण होईल.
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे कोणकोणत्या स्थानकांवर थांबे असतील?
A
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत कोणत्या स्टेशनवरून सुरू होईल?
A
नागपूरजवळील अजनी स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सुरू होईल
Q
नागपूर-पुणे वंदे भारत या गाडीचे उद्घाटन कोण करणार आहे?
A
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Q
पुणे ते नागपूर पर्यंतच्या वंदे भारतची संख्या किती आहे?
A
नागपूर-पुणे यादरम्यान दोन वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. सकाळी वंदे भारत धावेल, तर सायंकाळी वंदे भारत स्लीपर धावण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या मार्गावर एकही डायरेक्ट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही.
Q
नागपूरहून किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात?
A
नागपूरहून सध्या ४ वंदे भारत एक्सप्रेस धावतात.
नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


