
Pune Nagpur Vande Bharat Express Train : नागपूर आणि पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि नागपूर या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे या दोन शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस याच महिन्यात धावणार आहे. रेल्वे बोर्डामधील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी मोजक्याच ट्रेन उपलब्ध आहेत. त्याशिवाय रस्ते मार्गे अनावशक वेळ जातो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, या मागणीने जोर धारला होता. नागपूरमधील अजनी येथून वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतरही खूप कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ वंदे भारत एक्सप्रेसमुळे जवळ येणार आहे. नागपूर (अजनी)- पुणे या मार्गावर वंदे भारत धावणार असल्याचे रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका अधिकाऱ्याने दिली.
पुणे-नागपूर किती वेळ वाचणार?
पुणे ते नागपूर यादरम्यान सध्या रेल्वने १२ ते १३ तासांचे अंतर लागते. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास नागपूर ते पुणे फक्त १० तासांत पोहचणं शक्य होणार आहे. दोन ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. पुणे आणि नागपूर या मार्गावर सध्या हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे धावतेय. या ट्रेनला जवळपास १३ तास वेळ लागतो. वंदे भारतमुळे हा वेळ आणखी कमी होणार आहे.
कधी धावणार नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ?-
पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी या मार्गावर वंदे भारत धावण्याची शक्यता हे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाने पीएम कार्यालयाशी संपर्क साधलाय.
कोण कोणत्या स्थानकावर थांबणार ?
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?
A
रिपोर्ट्सनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे किती वेळ वाचवेल?
A
सुमारे २ ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. सध्याचा १३ तासांचा प्रवास १० तासांमध्ये पूर्ण होईल.
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे कोणकोणत्या स्थानकांवर थांबे असतील?
A
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत कोणत्या स्टेशनवरून सुरू होईल?
A
नागपूरजवळील अजनी स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सुरू होईल
Q
नागपूर-पुणे वंदे भारत या गाडीचे उद्घाटन कोण करणार आहे?
A
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Q
पुणे ते नागपूर पर्यंतच्या वंदे भारतची संख्या किती आहे?
A
नागपूर-पुणे यादरम्यान दोन वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. सकाळी वंदे भारत धावेल, तर सायंकाळी वंदे भारत स्लीपर धावण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या मार्गावर एकही डायरेक्ट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही.
Q
नागपूरहून किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात?
A
नागपूरहून सध्या ४ वंदे भारत एक्सप्रेस धावतात.
नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



