
Pune Nagpur Vande Bharat Express Train : नागपूर आणि पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि नागपूर या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे या दोन शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस याच महिन्यात धावणार आहे. रेल्वे बोर्डामधील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी मोजक्याच ट्रेन उपलब्ध आहेत. त्याशिवाय रस्ते मार्गे अनावशक वेळ जातो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, या मागणीने जोर धारला होता. नागपूरमधील अजनी येथून वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतरही खूप कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ वंदे भारत एक्सप्रेसमुळे जवळ येणार आहे. नागपूर (अजनी)- पुणे या मार्गावर वंदे भारत धावणार असल्याचे रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका अधिकाऱ्याने दिली.
पुणे-नागपूर किती वेळ वाचणार?
पुणे ते नागपूर यादरम्यान सध्या रेल्वने १२ ते १३ तासांचे अंतर लागते. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास नागपूर ते पुणे फक्त १० तासांत पोहचणं शक्य होणार आहे. दोन ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. पुणे आणि नागपूर या मार्गावर सध्या हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे धावतेय. या ट्रेनला जवळपास १३ तास वेळ लागतो. वंदे भारतमुळे हा वेळ आणखी कमी होणार आहे.
कधी धावणार नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ?-
पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी या मार्गावर वंदे भारत धावण्याची शक्यता हे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाने पीएम कार्यालयाशी संपर्क साधलाय.
कोण कोणत्या स्थानकावर थांबणार ?
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?
A
रिपोर्ट्सनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे किती वेळ वाचवेल?
A
सुमारे २ ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. सध्याचा १३ तासांचा प्रवास १० तासांमध्ये पूर्ण होईल.
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे कोणकोणत्या स्थानकांवर थांबे असतील?
A
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत कोणत्या स्टेशनवरून सुरू होईल?
A
नागपूरजवळील अजनी स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सुरू होईल
Q
नागपूर-पुणे वंदे भारत या गाडीचे उद्घाटन कोण करणार आहे?
A
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Q
पुणे ते नागपूर पर्यंतच्या वंदे भारतची संख्या किती आहे?
A
नागपूर-पुणे यादरम्यान दोन वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. सकाळी वंदे भारत धावेल, तर सायंकाळी वंदे भारत स्लीपर धावण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या मार्गावर एकही डायरेक्ट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही.
Q
नागपूरहून किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात?
A
नागपूरहून सध्या ४ वंदे भारत एक्सप्रेस धावतात.
नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


