
Udayanraje Bhosale : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहित रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली. यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी ३१ मे पर्यंतची मुदत देखील दिली. दरम्यान, यानंतर धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध दर्शविला. यानंतर यासंदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. आता याबाबत भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची एक समिती नेमण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच इतिहासात अशी कोणतीही नोंद नाही, असंही उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
खासदार उदयनराजे भोसले काय म्हणाले?
“आपण सर्वजन राहत असलेल्या स्वराज्याची संकल्पना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली. सर्वधर्मातील लोकांना एकत्र केलं, एवढंच नव्हे तर राज्यकारभारत लोकांचा सहभाग असावा यासाठी त्यांनी संकल्पना मांडली. खरं तर देव आपण कधी पाहिला नाही, मी तरी आजपर्यंत पाहिला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने त्या काळातील लोकांना देव पाहायला मिळाला. मात्र, आज दुर्देव आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले जातात”, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
“आज खरंच समाज एवढा विकृत झाला आहे का? आपण हा अपमान किती काळ सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत विशेष कायदा करण्याची मागणी केली आहे. मी याआधीच सांगितलं होतं की विशेष कायदा पारित करा. सर्व राजकीय पक्षांना सांगून देखील कायदा पारित केला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच असं वाटतं का की अशा प्रकारे अवमान झाला पाहिजे? लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यपद्धतीमधून सिद्ध करून दाखवलं पाहिजे. कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
‘शासन मान्य इतिहास का प्रकाशित झाला नाही?’
“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही आधारस्तंभ मानता ना? मग अजून त्यांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित का झाला नाही? अनेक महापुरुषांचा शासन मान्य इतिहास मान्य झाला. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाच विसरलात?”, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला. “तसेच मराठ्यांच्या ज्या राजधान्या होत्या, राजगड असेल किंवा रायगड असेल किंवा सातारा, यासाठी एक शिव स्वराज्य सर्केट स्थापन केलं पाहिजे”, अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली.
‘तात्काळ कायदा पारित करावा…’
“सर्व पक्षातील लोकांनी एकदा ठरवावं आणि एक विशेष अधिवेशन बोलवून तात्काळ कायदा पारित करावा. तरच विकृत लोकांवर आळा बसेल. मला सांगा हा कायदा जर बनवला गेला तर प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूर असेल, हे अशा प्रकारे काही बोलण्याचं धाडस करतील का? पण कायदा बनवला जात नाही म्हणून हे लोक बोलतात”, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत मांडली भूमिका
वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातील तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार उदयनराजे भोसले यांना विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, “वाघ्या, वाघ्या, कोण वाघ्या? येथे एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत एक इतिहासकारांची समिती नेमली पाहिजे. मग ती समाधी तिथे कधी आली? का आली? इतिहासात तर अशी नोंद नाही. काहीका असेना. पण त्या माध्यमातून योग्य तो निर्णय घ्यावा”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

