Two Families Shattered; Six Dead in Collision Involving Car, Bike, and Bus.

जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.


Two Families Shattered; Six Dead in Collision Involving Car, Bike, and Bus.
जळगाव: जिल्ह्यातील अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळनजीक मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

नेमके काय घडले?
व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन, त्यांच्या पत्नी अनिता महाजन, चुलत भाऊ नंदलाल महाजन आणि भावजय निर्मला महाजन हे सर्वजण एका कारने अमळनेरकडे निघाले होते. त्यांच्या मुलाचे १९ जून रोजी लग्न ठरले होते, तर भाच्याचा अमळनेर येथे साखरपुडा होता. या दुहेरी आनंदात नातेवाइकांना लग्नाची पहिली पत्रिका देण्यासाठी ते प्रवास करत होते. याच दरम्यान हॉटेल वृंदावनजवळ समोरून येणाऱ्या अमळनेर-चाळीसगाव एसटी बस आणि दुचाकीला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील सुरेश, अनिता, नंदलाल आणि निर्मला या चौघांचाही दुर्दैवी अंत झाला. कारमधील त्यांचा पुतण्या गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वार युगुलाचा करुण अंत
कार ज्या दुचाकीला धडकली, त्यावर पशुवैद्य नीलेश सुकदेव तावडे (वय २५) आणि सोनल एकनाथ जावरे (वय २४) हे दोघे प्रवास करत होते. त्यांचे लग्न ठरले होते आणि दोघेही सुखाची स्वप्ने रंगवत धुळ्याच्या दिशेने निघाले होते. मात्र, या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा होऊन या होणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

 

एका बाजूला लग्नाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला ठरलेल्या लग्नाचे स्वप्न, या अपघाताने दोन लग्नघरांचे आयुष्य क्षणात उध्वस्त केले.

 



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *