
नारायणगाव - लाल झालेली टोमॅटो खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी टाळाटाळ केल्यामुळे जुन्नर, पारनेर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली टोमॅटो आज दुपारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबजारात टाकून निषेध केला. यामुळे उपबजार आवारात टोमॅटोचा लाल सडा पडला होता. काही वेळ व्यापारी व शेतकरी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे यांच्या मध्यस्थी नंतर टोमॅटो लिलाव पुन्हा सुरू झाले.
तापमानात वाढ झाल्याने टोमॅटो लाल व खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील पंधरा दिवसां पासून टोमॅटोची आवक वाढली असून भाव मातीमोल झाले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे.
टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत असल्याने तोटा टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी लाल टोमॅटो खरेदी बंद केली आहे. येथील उपबजारात आज सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी चांगल्या गजरा टोमॅटो प्रतवारी नुसार ५० रुपये ते १०० रुपये भाव देऊन खरेदी केली. लाल टोमॅटोची खरेदी करण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांची मनधरणी करत होते.
मात्र टोमॅटोची खरेदी व्यापाऱ्यांनी बंद केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुमारे तीनशे क्रेट लाल टोमॅटो उपबजार आवारात टाकून निषेध केला. या मुळे उपबजार आवारात वातावरण तप्त झाले. या बाबतची माहिती समजल्या नंतर बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, माजी संचालक विपुल फुलसुंदर, प्रसन्ना डोके, बाबा परदेशी, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे उपबजार आवारात दाखल झाले. त्यांनी शेतकरी प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. या वेळी टोमॅटो टाकून देण्यावरून संचालक खंडागळे, पाटे व शेतकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपसचिव शरद घोंगडे यांनी शिल्लक टोमॅटो खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर दुपारी तीन नंतर टोमॅटोचे लिलाव पुन्हा सुरळीत सुरू झाले.
गोविंद काशीद शेतकरी (शेतकरी पोखरी कण्हेर, ता. पारनेर), अनिल ढोले (शेतकरी येणेरे, ता. जुन्नर) - एकरी एक लाख रुपये खर्च करून ऐन उन्हाळ्यात घाम गाळून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. तापमान वाढल्यामुळे टोमॅटो लाल होण्याचे प्रमाण वाढल्याने एक तोड्याला एकरी १०० क्रेट उत्पादन निघत आहे. तोडणी, मजुरी वाहतूक भाडे या साठी प्रति क्रेट सत्तर रुपये खर्च झाला आहे. उपबजारात आल्या नंतर टोमॅटो खरेदी करण्यास व्यापारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दत्ता शिंगोटे, योगेश घोलप (टोमॅटो व्यापारी) - राज्यातील टोमॅटोची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक बाजार समितीत सुद्धा चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी उपबजार आवारात टोमॅटो क्रेट टाकून दिले आहेत. आवक वाढल्याने व मागणी नसल्यामुळे राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. तापमान वाढीमुळे फळावर तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, लाल टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत आहे. मागील आठ दिवसात व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले आहेत. व्यापाऱ्याची बाजू कोणी समजून घेत नाही.
शरद घोंगडे (उपसचिव बाजार समिती) - टोमॅटोची आवक वाढली आहे.तापमान वाढीमुळे लाल टोमॅटो इतर राज्यात विक्रीसाठी पाठविल्यास खराब होतात. राज्यातील सर्व भागात टोमॅटोचे भाव मातीमोल झाले आहेत. आज सकाळी लिलाव सुरळीत सुरू होते. मात्र काही शेतकऱ्यांनी टोमॅटो आवारात टाकून दिल्याने तणाव वाढला. बाजार सुरू राहण्यासाठी व्यापारी व शेतकरी हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




