
नारायणगाव - लाल झालेली टोमॅटो खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी टाळाटाळ केल्यामुळे जुन्नर, पारनेर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली टोमॅटो आज दुपारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबजारात टाकून निषेध केला. यामुळे उपबजार आवारात टोमॅटोचा लाल सडा पडला होता. काही वेळ व्यापारी व शेतकरी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे यांच्या मध्यस्थी नंतर टोमॅटो लिलाव पुन्हा सुरू झाले.
तापमानात वाढ झाल्याने टोमॅटो लाल व खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील पंधरा दिवसां पासून टोमॅटोची आवक वाढली असून भाव मातीमोल झाले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे.
टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत असल्याने तोटा टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी लाल टोमॅटो खरेदी बंद केली आहे. येथील उपबजारात आज सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी चांगल्या गजरा टोमॅटो प्रतवारी नुसार ५० रुपये ते १०० रुपये भाव देऊन खरेदी केली. लाल टोमॅटोची खरेदी करण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांची मनधरणी करत होते.
मात्र टोमॅटोची खरेदी व्यापाऱ्यांनी बंद केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुमारे तीनशे क्रेट लाल टोमॅटो उपबजार आवारात टाकून निषेध केला. या मुळे उपबजार आवारात वातावरण तप्त झाले. या बाबतची माहिती समजल्या नंतर बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, माजी संचालक विपुल फुलसुंदर, प्रसन्ना डोके, बाबा परदेशी, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे उपबजार आवारात दाखल झाले. त्यांनी शेतकरी प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. या वेळी टोमॅटो टाकून देण्यावरून संचालक खंडागळे, पाटे व शेतकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपसचिव शरद घोंगडे यांनी शिल्लक टोमॅटो खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर दुपारी तीन नंतर टोमॅटोचे लिलाव पुन्हा सुरळीत सुरू झाले.
गोविंद काशीद शेतकरी (शेतकरी पोखरी कण्हेर, ता. पारनेर), अनिल ढोले (शेतकरी येणेरे, ता. जुन्नर) - एकरी एक लाख रुपये खर्च करून ऐन उन्हाळ्यात घाम गाळून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. तापमान वाढल्यामुळे टोमॅटो लाल होण्याचे प्रमाण वाढल्याने एक तोड्याला एकरी १०० क्रेट उत्पादन निघत आहे. तोडणी, मजुरी वाहतूक भाडे या साठी प्रति क्रेट सत्तर रुपये खर्च झाला आहे. उपबजारात आल्या नंतर टोमॅटो खरेदी करण्यास व्यापारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दत्ता शिंगोटे, योगेश घोलप (टोमॅटो व्यापारी) - राज्यातील टोमॅटोची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक बाजार समितीत सुद्धा चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी उपबजार आवारात टोमॅटो क्रेट टाकून दिले आहेत. आवक वाढल्याने व मागणी नसल्यामुळे राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. तापमान वाढीमुळे फळावर तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, लाल टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत आहे. मागील आठ दिवसात व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले आहेत. व्यापाऱ्याची बाजू कोणी समजून घेत नाही.
शरद घोंगडे (उपसचिव बाजार समिती) - टोमॅटोची आवक वाढली आहे.तापमान वाढीमुळे लाल टोमॅटो इतर राज्यात विक्रीसाठी पाठविल्यास खराब होतात. राज्यातील सर्व भागात टोमॅटोचे भाव मातीमोल झाले आहेत. आज सकाळी लिलाव सुरळीत सुरू होते. मात्र काही शेतकऱ्यांनी टोमॅटो आवारात टाकून दिल्याने तणाव वाढला. बाजार सुरू राहण्यासाठी व्यापारी व शेतकरी हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



