अरबी समुद्राच्या लाटांबरोबर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वाहून येणारे काळे, चिकट आणि दुर्गंधीयुक्त 'टार बॉल्स' (Tar Balls) केवळ डोळ्यांना खटकणाराकचरा राहिलेला नाही; तर ते सागरी पर्यावरणावर घोंगावणाऱ्या एका अतिशय गंभीर संकटाचे प्रतीक बनले आहेत.
मुंबई, नवी मुंबईसह पालघर, उरण, अलिबाग आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अधून-मधून दिसणारी ही समस्या आता दरवर्षीची झाली असून, पर्यावरणवाद्यांनी याला समुद्राचे 'काळे अश्रू' अशी उपमा दिली आहे.
समुद्रातील वाढत्या प्रदुषणामुळे किनाऱ्यांचे सौंदर्य तर नष्ट होत आहेच, पण मानवी आरोग्य आणि सागरी जीवसृष्टीलाही याचा मोठा फटका बसत आहे. 'टार बॉल्स' म्हणजे नेमकं काय?'टार बॉल्स' म्हणजे समुद्रात जहाजांमधून सांडलेल्या किंवा सोडलेल्या खनिज तेलाचे घट्ट झालेले छोटे-मोठे गोळे.
समुद्रातील तेलगळती, जहाजांमधून केला जाणारा बेकायदेशीर तेल विसर्ग (Oil Dumping), ऑफ-शोअर ड्रिलिंगमधील (समुद्रातील तेल विहिरी) त्रुटी आणि समुद्री अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल पाण्यात मिसळते.
हे तेल समुद्राच्या वाऱ्यामुळे आणि लाटांमुळे एकत्र येऊन त्याचे घट्ट, चिकट गोळे बनतात, ज्यांना 'टार बॉल्स' म्हटले जाते. मान्सूनच्या काळात समुद्राला येणाऱ्या भरतीसोबत हे गोळे प्रचंड प्रमाणावर किनाऱ्यावर वाहून येतात. कोकण ते मुंबई किनारपट्टीला मोठा फटका:या समस्येचा सर्वाधिक फटका मुंबईतील जुहू,
गिरगाव चौपाटी, वर्सोवा तसेच अलिबाग, उरण, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या किनारपट्ट्यांना बसत आहे. सध्या आखाती देशांमधील संघर्ष आणि समुद्री मार्गावरील वाढती जहाजांची वाहतूक यामुळे समुद्रात होणारी तेलगळती आणखी वाढली असून, भविष्यात हा धोका अधिक तीव्र होण्याची भीती वर्तवली जात आहे.
हे टार बॉल्स अत्यंत विषारी असतात. ते किनाऱ्यावरील वाळूत मिसळल्यामुळे पर्यटकांच्या पायाला चिकटतात, ज्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. तसेच मासे आणि इतर समुद्री जीव हे रासायनिक गोळे अन्न समजून गिळतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू होत आहे.
प्रशासकीय उदासीनता आणि 'आवाज' फाउंडेशनचा आक्षेप:पर्यावरण क्षेत्रातील नामांकित संस्था 'आवाज' (Awaaz Foundation) च्या मते, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्या सरकारी यंत्रणांची भूमिका केवळ 'किनाऱ्यावर कचरा आला की तो साफ करा' इतकीच मर्यादित आहे.
दरवर्षी हजारो स्वयंसेवक आणि स्वच्छता कर्मचारी किनाऱ्यावरून टनवारी टार बॉल्स गोळा करतात; परंतु ही समस्या मुळापासून रोखण्यासाठी समुद्रात गस्त घालणे किंवा तेल सोडणाऱ्या जहाजांवर कठोर कारवाई करणे, अशी कोणतीही ठोस केंद्रीय यंत्रणा दिसत नाही. जोपर्यंत समुद्रात तेल सोडणाऱ्या जहाजांवर
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कडक गुन्हे दाखल केले जात नाहीत, तोपर्यंत कोकण आणि मुंबईच्या किनाऱ्यांना या 'काळ्या अश्रूंच्या' संकटातून मुक्त करणे अशक्य आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

