अरबी समुद्राच्या लाटांबरोबर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वाहून येणारे काळे, चिकट आणि दुर्गंधीयुक्त 'टार बॉल्स' (Tar Balls) केवळ डोळ्यांना खटकणाराकचरा राहिलेला नाही; तर ते सागरी पर्यावरणावर घोंगावणाऱ्या एका अतिशय गंभीर संकटाचे प्रतीक बनले आहेत.
मुंबई, नवी मुंबईसह पालघर, उरण, अलिबाग आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अधून-मधून दिसणारी ही समस्या आता दरवर्षीची झाली असून, पर्यावरणवाद्यांनी याला समुद्राचे 'काळे अश्रू' अशी उपमा दिली आहे.
समुद्रातील वाढत्या प्रदुषणामुळे किनाऱ्यांचे सौंदर्य तर नष्ट होत आहेच, पण मानवी आरोग्य आणि सागरी जीवसृष्टीलाही याचा मोठा फटका बसत आहे. 'टार बॉल्स' म्हणजे नेमकं काय?'टार बॉल्स' म्हणजे समुद्रात जहाजांमधून सांडलेल्या किंवा सोडलेल्या खनिज तेलाचे घट्ट झालेले छोटे-मोठे गोळे.
समुद्रातील तेलगळती, जहाजांमधून केला जाणारा बेकायदेशीर तेल विसर्ग (Oil Dumping), ऑफ-शोअर ड्रिलिंगमधील (समुद्रातील तेल विहिरी) त्रुटी आणि समुद्री अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल पाण्यात मिसळते.
हे तेल समुद्राच्या वाऱ्यामुळे आणि लाटांमुळे एकत्र येऊन त्याचे घट्ट, चिकट गोळे बनतात, ज्यांना 'टार बॉल्स' म्हटले जाते. मान्सूनच्या काळात समुद्राला येणाऱ्या भरतीसोबत हे गोळे प्रचंड प्रमाणावर किनाऱ्यावर वाहून येतात. कोकण ते मुंबई किनारपट्टीला मोठा फटका:या समस्येचा सर्वाधिक फटका मुंबईतील जुहू,
गिरगाव चौपाटी, वर्सोवा तसेच अलिबाग, उरण, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या किनारपट्ट्यांना बसत आहे. सध्या आखाती देशांमधील संघर्ष आणि समुद्री मार्गावरील वाढती जहाजांची वाहतूक यामुळे समुद्रात होणारी तेलगळती आणखी वाढली असून, भविष्यात हा धोका अधिक तीव्र होण्याची भीती वर्तवली जात आहे.
हे टार बॉल्स अत्यंत विषारी असतात. ते किनाऱ्यावरील वाळूत मिसळल्यामुळे पर्यटकांच्या पायाला चिकटतात, ज्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. तसेच मासे आणि इतर समुद्री जीव हे रासायनिक गोळे अन्न समजून गिळतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू होत आहे.
प्रशासकीय उदासीनता आणि 'आवाज' फाउंडेशनचा आक्षेप:पर्यावरण क्षेत्रातील नामांकित संस्था 'आवाज' (Awaaz Foundation) च्या मते, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्या सरकारी यंत्रणांची भूमिका केवळ 'किनाऱ्यावर कचरा आला की तो साफ करा' इतकीच मर्यादित आहे.
दरवर्षी हजारो स्वयंसेवक आणि स्वच्छता कर्मचारी किनाऱ्यावरून टनवारी टार बॉल्स गोळा करतात; परंतु ही समस्या मुळापासून रोखण्यासाठी समुद्रात गस्त घालणे किंवा तेल सोडणाऱ्या जहाजांवर कठोर कारवाई करणे, अशी कोणतीही ठोस केंद्रीय यंत्रणा दिसत नाही. जोपर्यंत समुद्रात तेल सोडणाऱ्या जहाजांवर
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कडक गुन्हे दाखल केले जात नाहीत, तोपर्यंत कोकण आणि मुंबईच्या किनाऱ्यांना या 'काळ्या अश्रूंच्या' संकटातून मुक्त करणे अशक्य आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



