
T20 World Cup 2024 Team India Squad Hardik Pandya : जून महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघाची निवड येत्या काही दिवसांत करावी लागणार आहे. दुसरा यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलने संजू सॅमसनवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याचे अपयश निवड समितीला दखल घ्यायला लावणारे आहे.
१ मे ही आयसीसीला संघ कळवण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत संघ निवड कधीही केली जाऊ शकते. ही स्पर्धा होणाऱ्या वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथील खेळपट्ट्यांची स्थितीही प्रामुख्याने गोलंदाज निवडताना लक्षात घेतली जाईल.
फिरकी गोलंदाजीत अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांच्यात चुरस असेल, मात्र अतिरिक्त वेगवान गोलंदाज निवडण्याचा विचार झाला तर आवेश खानला संधी मिळू शकते. संघ निवडीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी चर्चा करणार हे निश्चित आहे.
आयपीएल सुरू होण्याअगोदर हार्दिक पंड्याचे नाव जवळपास निश्चित होते. आयपीएलमधून त्याची तंदुरुस्ती तपासली जाणार होती; परंतु तो फलंदाज तसेच गोलंदाज म्हणूनही अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यांतून त्याने १७ षटकेच गोलंदाजी केली आहे.
|
|
एरवी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिकला केवळ सातच षटकार मारता आलेले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १४२ एवढाच आहे. याच वेळी चेन्नई संघातून खेळणारा शिवम दुबे कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आठ सामन्यांतून २२ षटकार मारलेले आहेत. त्याला प्राधान्य मिळू शकते, मात्र गोलंदाज म्हणून त्याचा वापर आयपीएलमध्ये झालेला नाही. त्यामुळे निवड समिती त्याच्या गोलंदाजीबाबत अनभिज्ञ आहे.
प्रमुख यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड निश्चित आहे. या आयपीएलमध्ये तो ३४२ धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट १६१ एवढा आहे. दुसरा यष्टीरक्षक निवडण्यासाठी केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात चुरस असेल, पण त्यात राहुल सध्या तरी आघाडीवर आहे.
गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची निवड निश्चित आहे. त्यामुळे अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि आवेश खान यापैकी एकाची निवड होऊ शकते. अक्षर फलंदाजीतही उजवा असल्यामुळे त्याचे पारडे जड आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




