पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय’ “राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तीने वाचल्याशिवाय त्यावर बोलू नये” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पार्थ पवारला तुम्ही डिफेंड केलं होतं? त्यावर त्या म्हणाल्या की, “हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मी पार्थला फोन केला होता. तेव्हा त्याने मला सांगितलेलं आत्या मी काही चुकीचं केलेलं नाही. मी नंतर तुला समजावून सांगतो. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला वाटतं चौकशीचा कागद येईपर्यंत थांबलं पाहिजे”
“हा विषय कोर्टात आहे. कोर्ट काय निर्णय देतं? यावर कसं बोलणार. या देशात कोर्टाने दिलेले निर्णय मान्य करायचे असतात. तो अहवाल, कोर्टाची फायनल ऑर्डर येईपर्यंत बोलणं योग्य होणार नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “पार्थ पवारांवर माझा विश्वास आहे. काही चुकीचं केल नाही असं पार्थ म्हणाला होता” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर त्या म्हणाल्या की, “दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले. माझा भाऊ राहिला नाही, आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नाही”
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली आहे
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा होता, या काळात अल्पसंख्यांक विभागाकडून प्रमाणपत्र जारी करण्यात आली. या प्रकरणावर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारलं. “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली आहे. आज सकाळीच मी या विषयी वर्तमानपत्रात वाचलं. तुमच्या तत्परतेमुळे मीडियाचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही हा सर्व घोटाळा उघड केला. त्यावर चौकशी लावण्यात आली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर स्टेटमेंट दिलं पाहिजे. नक्की काय झालं, याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राची बाहेर बदनामी होते
प्रशासनावरचा वचक कमी झालाय. मलिदा खाण्याची वृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढतेय यावर सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्या बोलल्या की, “दुर्देवी घटना आहे. महाराष्ट्राच प्रशासन देशात उत्तम राहिलेलं आहे. महाराष्ट्राची बाहेर बदनामी होते. अलीकडे सगळा मिडिया अलर्ट झालाय. सगळ्या भाषेत बातम्या पोहोचतात. महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या प्रशासनाची बदनामी होते”
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




