पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय’ “राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तीने वाचल्याशिवाय त्यावर बोलू नये” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पार्थ पवारला तुम्ही डिफेंड केलं होतं? त्यावर त्या म्हणाल्या की, “हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मी पार्थला फोन केला होता. तेव्हा त्याने मला सांगितलेलं आत्या मी काही चुकीचं केलेलं नाही. मी नंतर तुला समजावून सांगतो. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला वाटतं चौकशीचा कागद येईपर्यंत थांबलं पाहिजे”
“हा विषय कोर्टात आहे. कोर्ट काय निर्णय देतं? यावर कसं बोलणार. या देशात कोर्टाने दिलेले निर्णय मान्य करायचे असतात. तो अहवाल, कोर्टाची फायनल ऑर्डर येईपर्यंत बोलणं योग्य होणार नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “पार्थ पवारांवर माझा विश्वास आहे. काही चुकीचं केल नाही असं पार्थ म्हणाला होता” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर त्या म्हणाल्या की, “दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले. माझा भाऊ राहिला नाही, आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नाही”
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली आहे
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा होता, या काळात अल्पसंख्यांक विभागाकडून प्रमाणपत्र जारी करण्यात आली. या प्रकरणावर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारलं. “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली आहे. आज सकाळीच मी या विषयी वर्तमानपत्रात वाचलं. तुमच्या तत्परतेमुळे मीडियाचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही हा सर्व घोटाळा उघड केला. त्यावर चौकशी लावण्यात आली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर स्टेटमेंट दिलं पाहिजे. नक्की काय झालं, याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राची बाहेर बदनामी होते
प्रशासनावरचा वचक कमी झालाय. मलिदा खाण्याची वृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढतेय यावर सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्या बोलल्या की, “दुर्देवी घटना आहे. महाराष्ट्राच प्रशासन देशात उत्तम राहिलेलं आहे. महाराष्ट्राची बाहेर बदनामी होते. अलीकडे सगळा मिडिया अलर्ट झालाय. सगळ्या भाषेत बातम्या पोहोचतात. महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या प्रशासनाची बदनामी होते”
शहर
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- गोव्यात जन्म-मृत्यू नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाइन; १ जुलैपासून केंद्रीय CRS पोर्टलवरूनच होणार सर्व प्रक्रिया!
महाराष्ट्र
- शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार महा-धरणे आंदोलन!
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका! माहिती अधिकार नियमांतील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांचे पत्र
- पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रोडवर १५ दिवसांपासून वाहतेय मुतारीचे पाणी; प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर!
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- कोकणात पावसाचा हाहाकार; ५ जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' कायम! केरळ ते महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय.



























Subscribe to my channel

