ठाणे: मुंब्रा रेल्वे दुर्घटनेला वर्ष पूर्ण 'भाऊ रात्री नक्की येईल', आजही बहिणींच्या नजरा दरवाजाकडे; राहुल गुप्ताच्या आठवणीने कुटुंब सुन्न


Redevelopment Project to Follow Singapore and Hong Kong Model; First Phase by 2028
ठाणे: सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाणारा भाऊ रात्री कामावरून नक्की घरी येईल, या आशेने आजही राहुलच्या बहिणींच्या नजरा रात्रीच्या वेळी घराच्या दरवाजाकडे खिळतात. मात्र, ९ जून २०२५ रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातात राहुल गुप्ता याने आपला जीव गमावल्याने, तो आता कधीच घरी परतणार नाही, या कटू सत्याने गुप्ता कुटुंब आजही दुःखाच्या छायेत आहे.

काय होती घटना?
९ जून २०२५ रोजी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील एका तीव्र वळणावर दोन जलद लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यात अनेकांना दुखापतही झाली होती. या दुर्घटनेत दिवा, साबेगाव येथील चाळीत राहणारा २८ वर्षांचा राहुल गुप्ता याचाही मृत्यू झाला होता. राहुल आपल्या आई-वडील आणि दोन बहिणींसोबत राहत होता.

बहिणींची वेदनादायक साक्ष
राहुलची बहीण पूजाने दिलेल्या माहितीनुसार, राहुल वयाच्या १३-१४ व्या वर्षापासूनच कष्ट करत होता. मुंबईत एका दुकानात काम करून तो आपल्या कुटुंबाचा आधार झाला होता. "भाऊ आमच्यात नाही, यावर आजही विश्वास बसत नाही," असे म्हणताना पूजाला हुंदके अनावर झाले. राहुल स्वतःसाठी कधीही काही खरेदी करत नव्हता, मात्र आपल्या बहिणींची प्रत्येक हौस तो पूर्ण करत होता. त्याच्या लग्नाचे स्वप्न आणि गावात घर बांधण्याचे त्याचे ध्येय अर्धवटच राहिले आहे.

कुटुंबाचा आधार हरपला
राहुलच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाला एक वर्ष उलटूनही आईच्या डोळ्यांतील अश्रू थांबलेले नाहीत. राहुल गेल्यापासून या कुटुंबाने रेल्वेने प्रवास करणेही जवळपास बंद केले आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब अद्यापही या धक्क्यातून सावरू शकलेले नाही.

 



गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *