
Sharad Pawar Press Conference : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावरून उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाकडून तोंडसुख घेतलं जात असताना आता खुद्द शरद पवार यांनीच राज ठाकरेंना टोला लगावला आहे. शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंना लगावला टोला!
शरद पवारांनी यावेळी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत विचारणा केली. ‘राज ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना सत्तेत बसवल्याशिवाय थांबणार नाही’, असं म्हटल्याचं शरद पवारांना माध्यम प्रतिनिधींनी सांगितलं. त्यावर शरद पवारांनी सूचक हास्य करत मिश्किल टिप्पणी केली.
|
|
“राज ठाकरे असं बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वेळीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती. पण दुर्दैवाने लोकांनी राज ठाकरेंसारखी भूमिका घेतली नाही. लोकांनी त्यांना एकच जागा दिली”, असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राजू पाटील हे एकमेव उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे.
अजित पवारांना केलं लक्ष्य
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी अजित पवारांवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार व इतर ४० आमदारांनी सत्ताधारी भाजपा व शिंदे गटासोबत युती केली होती. मात्र, त्यातील काहीजण स्वगृही परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “अनेक लोकांना असं वाटतंय की एकत्रित काम करावं. आपला रस्ता चुकला. योग्य रस्त्याने जावं. योग्य रस्त्याने जाण्याची मानसिकता कुणाची असेल तर त्यांचं स्वागत आहे”, असं शरद पवार म्हणाले.
मात्र, अशी भूमिका सरसकट सगळ्यांच्या बाबतीत घेण्यास पक्षाची तयारी नसल्याचं शरद पवार म्हणाले. “काही लोकांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यावर सरसकट निर्णय घेण्याची आमची मनस्थिती नाही. जे लोक विचाराने आमच्यासोबत होते, एकत्र काम करण्याची ज्यांची मानसिकता आहे त्यांना कुणाचा फारसा विरोध असण्याचं कारण नाही. पण आमच्या काही घटकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा, यावर आमची पक्षांतर्गत चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं त्यांनी नमूद केलं.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




