नेपाळ क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा जबरदस्त असा शेवट केला आहे. नेपाळने स्कॉटलंडवर दणदणीत असा विजय साकारला आहे. नेपाळला या स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील पहिल्या 3 सामन्यांत सलग पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे चाहत्यांना विजयाची प्रतिक्षा कायम होती. नेपाळ टीमने चाहत्यांची ही प्रतिक्षा साखळी फेरीत आपल्या शेवटच्या सामन्यात पूर्ण केली. नेपाळ यासह अपेक्षेप्रमाणे शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. दीपेंद्र सिह ऐरी आणि कुशल भुर्टेल या जोडीने नेपाळच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. या सामन्यात नक्की काय झालं? हे सविस्तर जाणनू घेऊयात.
नेपाळने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाला या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात चांगलंच झुंजवलं होतं. मात्र नेपाळचा इंग्लंड विरुद्ध निसटता पराभव झाला. नेपाळला अवघ्या 4 धावांनी सामना गमवावा लागला होता. इंग्लंड या विजयामुळे मोठ्या उलटफेरपासून वाचली. मात्र इंग्लंडच्या विजयापेक्षा नेपाळच्या पराभवाची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळाली. अवघ्या काही धावांनी हा सामना गमावल्याने नेपाळ टीमला आणि चाहत्यांना हा पराभव जिव्हारी लागला होता. मात्र नेपाळने इंग्लंड विरुद्ध आपली कामगिरी दाखवून क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं.
नेपाळला त्यानंतर इटली आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांकडून मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना टीमने साखळी फेरीतील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करावा अशी इच्छा होती. नेपाळ टीमने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि जबरदस्त असा विजय मिळवला. नेपाळने मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियममध्ये स्कॉटलंडला पराभूत केलं. नेपाळने यासह वर्ल्ड कप स्पर्धेत 12 वर्षांची विजयाची प्रतिक्षा संपवली. नेपाळने स्कॉटलंडला पराभूत करुन 12 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. नेपाळने याआधी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 2014 साली शेवटचा विजय मिळवला होता.
सामन्याचा झटपट आढावा
मायकल जॉन्स याने केलेल्या 71 धावांच्या जोरावर स्कॉटलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमवून 170 धावा केल्या. नेपाळने प्रत्युत्तरात 171 धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात केली. कुशल भुर्टेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने नेपाळला झंझावाती सुरुवात करुन दिली. दोघांनी आलेला प्रत्येक बॉल मारला आणि नेपाळला वेगवान सुरुवात करुन देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 बॉलमध्ये 74 रन्सची पार्टनरशीप केली. कुशल आऊट झाल्याने नेपाळला पहिला झटका लागला. कुशलने 43 धावा केल्या. त्यानंतर स्कॉटलंडने आसिफ शेख आणि कॅप्टन रोहित पौडेल या दोघांना ठराविक अंतराने आऊट केलं. आसिफने 33 तर रोहितने 16 धावा केल्या. त्यामुळे नेपाळची 13.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 98 अशी स्थिती झाली होती.
गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरीची विजयी भागीदारी
त्यानंतर गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरी या जोडीने कमाल केली. गुलशन आणि दीपेंद्र या दोघांनी फक्त 36 चेंडूत नाबाद 73 धावांची भागीदारी केली. दीपेंद्रने या भागीदारीत सर्वाधिक योगदान दिलं. दींपेंद्रने स्कॉलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. दीपेंद्रने मोठे फटके मारले. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. तसेच गुलशननेही दीपेंद्रला चांगली साथ दिली. दीपेंद्र आणि गुलशन या दोघांनी फटेकबाजी करुन नेपाळला सुरक्षित असा विजय मिळवून दिला. नेपाळने 4 बॉलआधी 7 विकेट्स राखून हा सामना आपल्या नावावर केला. नेपाळने 19.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 171 रन्स केल्या. गुलशनने 24 आणि दीपेंद्रने नाबाद 50 धावा केल्या. दीपेंद्रला त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



