नेपाळ क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा जबरदस्त असा शेवट केला आहे. नेपाळने स्कॉटलंडवर दणदणीत असा विजय साकारला आहे. नेपाळला या स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील पहिल्या 3 सामन्यांत सलग पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे चाहत्यांना विजयाची प्रतिक्षा कायम होती. नेपाळ टीमने चाहत्यांची ही प्रतिक्षा साखळी फेरीत आपल्या शेवटच्या सामन्यात पूर्ण केली. नेपाळ यासह अपेक्षेप्रमाणे शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. दीपेंद्र सिह ऐरी आणि कुशल भुर्टेल या जोडीने नेपाळच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. या सामन्यात नक्की काय झालं? हे सविस्तर जाणनू घेऊयात.
नेपाळने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाला या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात चांगलंच झुंजवलं होतं. मात्र नेपाळचा इंग्लंड विरुद्ध निसटता पराभव झाला. नेपाळला अवघ्या 4 धावांनी सामना गमवावा लागला होता. इंग्लंड या विजयामुळे मोठ्या उलटफेरपासून वाचली. मात्र इंग्लंडच्या विजयापेक्षा नेपाळच्या पराभवाची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळाली. अवघ्या काही धावांनी हा सामना गमावल्याने नेपाळ टीमला आणि चाहत्यांना हा पराभव जिव्हारी लागला होता. मात्र नेपाळने इंग्लंड विरुद्ध आपली कामगिरी दाखवून क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं.
नेपाळला त्यानंतर इटली आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांकडून मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना टीमने साखळी फेरीतील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करावा अशी इच्छा होती. नेपाळ टीमने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि जबरदस्त असा विजय मिळवला. नेपाळने मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियममध्ये स्कॉटलंडला पराभूत केलं. नेपाळने यासह वर्ल्ड कप स्पर्धेत 12 वर्षांची विजयाची प्रतिक्षा संपवली. नेपाळने स्कॉटलंडला पराभूत करुन 12 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. नेपाळने याआधी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 2014 साली शेवटचा विजय मिळवला होता.
सामन्याचा झटपट आढावा
मायकल जॉन्स याने केलेल्या 71 धावांच्या जोरावर स्कॉटलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमवून 170 धावा केल्या. नेपाळने प्रत्युत्तरात 171 धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात केली. कुशल भुर्टेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने नेपाळला झंझावाती सुरुवात करुन दिली. दोघांनी आलेला प्रत्येक बॉल मारला आणि नेपाळला वेगवान सुरुवात करुन देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 बॉलमध्ये 74 रन्सची पार्टनरशीप केली. कुशल आऊट झाल्याने नेपाळला पहिला झटका लागला. कुशलने 43 धावा केल्या. त्यानंतर स्कॉटलंडने आसिफ शेख आणि कॅप्टन रोहित पौडेल या दोघांना ठराविक अंतराने आऊट केलं. आसिफने 33 तर रोहितने 16 धावा केल्या. त्यामुळे नेपाळची 13.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 98 अशी स्थिती झाली होती.
गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरीची विजयी भागीदारी
त्यानंतर गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरी या जोडीने कमाल केली. गुलशन आणि दीपेंद्र या दोघांनी फक्त 36 चेंडूत नाबाद 73 धावांची भागीदारी केली. दीपेंद्रने या भागीदारीत सर्वाधिक योगदान दिलं. दींपेंद्रने स्कॉलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. दीपेंद्रने मोठे फटके मारले. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. तसेच गुलशननेही दीपेंद्रला चांगली साथ दिली. दीपेंद्र आणि गुलशन या दोघांनी फटेकबाजी करुन नेपाळला सुरक्षित असा विजय मिळवून दिला. नेपाळने 4 बॉलआधी 7 विकेट्स राखून हा सामना आपल्या नावावर केला. नेपाळने 19.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 171 रन्स केल्या. गुलशनने 24 आणि दीपेंद्रने नाबाद 50 धावा केल्या. दीपेंद्रला त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



