पुणे- लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री.राहुल गांधी यांच्या विरोधातील बदनामीच्या खटल्याची सुनावणी पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयात विशेष न्यायाधीश श्री.अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर चालू आहे. या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलट तपास राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार हे घेत आहेत.
उलट तपासा दरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मान्य केले की, विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होते, मात्र नंतर ते निर्दोष सुटले. तसेच सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे पाच वेळा 'दया याचना' अर्ज केल्याचेही त्यांनी मान्य केले.
उलट तपासामध्ये सावरकरांच्या विचारसरणी विषयी विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. द्विराष्ट्रवाद, 'गाय ही देवता नसून उपयुक्त पशू आहे' असे गायी विषयी सावरकरांनी केलेले भाष्य, तसेच “गांधी ही श्रद्धा तर सावरकर ही अंधश्रद्धा”, “कोण हा सावरकर”, “स्वातंत्र्यवीर सावरकर की स्वातंत्र्यविरोधी सावरकर” अशा विविध टीका ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
त्याच प्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करत असल्याची टीका केल्याचा संदर्भही देण्यात आला. तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “सावरकरांनी इंग्रजांची चाकरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहे” अशा आशयाची टीका केल्याचे माहिती नसल्याचे फिर्यादींनी सांगितले.
तसेच माजी केंद्रीय मंत्रि श्री.अरूण शौरी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सावरकरांनी तत्कालीन परिस्थितीत सरदार पटेल यांच्या विरोधात चिथावणीखोर भूमिका घेतल्याचा उल्लेख केल्याचे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणावरही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे फिर्यादींनी न्यायालयात मान्य केले.
उलट तपासा दरम्यान सावरकर कुटुंबीयांनी स्वतः कधीही सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केलेली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र इतर काही विशिष्ट विचारधारेवर चालणार्या संघटनांनी अशी मागणी केली असेल, तर त्याबाबत ठोस माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, अशफाक उल्लाखान, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त आणि इतर क्रांतिकारक यांचेही मोठे योगदान असल्याचे फिर्यादींनी मान्य केले.
तसेच संसदेमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले असून तो राष्ट्रीय गौरव मानला जातो, असेही त्यांनी सांगितले. मात्र भगतसिंग, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त किंवा अशफाक उल्ला खान यांना तशा प्रकारचा गौरव का मिळाला नाही, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले.
अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये कठोर शिक्षा, फाशी किंवा अमानुष छळ सहन करणारे सर्व क्रांतीकारक भारतरत्नास पात्र आहेत का, या प्रश्नावर “सर्व क्रांतीकारकांचा योग्य सन्मान झाला पाहिजे” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
तसेच “स्वातंत्र्यलढ्यात फाशी जाणे आणि शिक्षेमध्ये सवलत मिळवणे यामध्ये नैतिक फरक आहे का?” असा प्रश्न ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी विचारला असता, “कोणाला फाशी द्यायची आणि कोणाला सवलत द्यायची हा निर्णय ब्रिटिश सरकारचा होता. त्यामुळे नैतिक फरकाबाबत मी काही भाष्य करू शकत नाही,” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
या खटल्यात ॲड. ज्ञानेश्वरी भानुदास जाधव, ॲड.अजिंक्य भालगरे व ॲड. सुयोग गायकवाड हे मदत करित आहेत.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे उलट तपास अपूर्ण राहिला असून पुढील सुनावणी दिनांक २५ मे २०२६ रोजी होणार आहे.
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel



https://shorturl.fm/eRsC1