'दुनियादारी' दिग्दर्शक संजय जाधव यांचा मोठा खुलासा; चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ऑफिस कसं रिकामं झालं, याचा सांगितला रंजक किस्सामराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील एका अत्यंत कठीण आणि कटू आठवणीचा खुलासा केला आहे.
२०१३ मध्ये आलेल्या 'दुनियादारी' (Duniyadari) या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आपल्यात कसा अहंकार (माज) आला होता आणि त्यानंतर आलेल्या 'प्यारवाली लव्हस्टोरी' (Pyaar Vali Love Story) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाने आपल्याला जमिनीवर कसे आणले, याबद्दल त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे भाष्य केले आहे. "दुनियादारी हिट झाली आणि मी हवेत गेलो"संजय जाधव यांनी सांगितले की, 'दुनियादारी' या चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.
या अफाट यशानंतर मी प्रचंड धुंदीत आणि हवेत होतो. मला असे वाटू लागले होते की, आता मला पुढे किंवा मागे वळून बघायची गरजच नाहीये, आता माझ्याकडे फक्त कामच काम असणार.
हा यशाचा काळ किमान १० वर्षे तरी असाच टिकून राहील, असा गैरसमज माझ्या मनात निर्माण झाला होता. त्या काळात माझ्या ऑफिसमध्ये दररोज २४ ते २५ जण केवळ माझ्यासोबत काम मिळवण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी जेवायला असायचे. कित्येक जण 'इथून चाललो होतो म्हणून चहा प्यायला आलो' असे म्हणून ऑफिसमध्ये गर्दी करायचे.
'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाली अन् धक्का बसला:याच धुंदीत संजय जाधव यांनी स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांना घेऊन 'प्यारवाली लव्हस्टोरी' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला होता.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मॅनेजरने त्यांना फोन करून सांगितले की, "सर, थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे आणि कमाईमध्ये मोठा ड्रॉप (घसरण) झाला आहे.
"सुरुवातीला संजय जाधव यांना वाटले की, एखादा दिवस असा असू शकतो, शनिवार-रविवार चित्रपट नक्कीच चांगली कमाई करेल. मात्र, शनिवार आणि रविवारही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला.अख्खं ऑफिस एका रात्रीत रिकामं झालं:चित्रपट फ्लॉप झाल्याचा धक्का तर मोठा होताच, पण त्याहूनही मोठा धक्का संजय जाधव यांना लोकांच्या बदललेल्या वर्तनामुळे बसला. त्यांनी सांगितले की, जो चित्रपट फ्लॉप झाला, त्याच्या पुढच्याच दिवसापासून त्यांच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या २५ लोकांची गर्दी गायब झाली.
"अख्खं ऑफिस एका रात्रीत रिकामं झालं होतं. कालपर्यंत जे लोक कौतुक करत होते, ते अचानक दिसेनासे झाले. या अपयशाने आणि रिकाम्या झालेल्या ऑफिसने मला सर्वात मोठा धडा शिकवला की, इंडस्ट्रीमध्ये उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. यशाच्या हवेत कधीही वाहून जाऊ नये," अशी भावुक आणि कटू आठवण संजय जाधव यांनी व्यक्त केली.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




