'दुनियादारी' दिग्दर्शक संजय जाधव यांचा मोठा खुलासा; चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ऑफिस कसं रिकामं झालं, याचा सांगितला रंजक किस्सामराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील एका अत्यंत कठीण आणि कटू आठवणीचा खुलासा केला आहे.
२०१३ मध्ये आलेल्या 'दुनियादारी' (Duniyadari) या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आपल्यात कसा अहंकार (माज) आला होता आणि त्यानंतर आलेल्या 'प्यारवाली लव्हस्टोरी' (Pyaar Vali Love Story) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाने आपल्याला जमिनीवर कसे आणले, याबद्दल त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे भाष्य केले आहे. "दुनियादारी हिट झाली आणि मी हवेत गेलो"संजय जाधव यांनी सांगितले की, 'दुनियादारी' या चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.
या अफाट यशानंतर मी प्रचंड धुंदीत आणि हवेत होतो. मला असे वाटू लागले होते की, आता मला पुढे किंवा मागे वळून बघायची गरजच नाहीये, आता माझ्याकडे फक्त कामच काम असणार.
हा यशाचा काळ किमान १० वर्षे तरी असाच टिकून राहील, असा गैरसमज माझ्या मनात निर्माण झाला होता. त्या काळात माझ्या ऑफिसमध्ये दररोज २४ ते २५ जण केवळ माझ्यासोबत काम मिळवण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी जेवायला असायचे. कित्येक जण 'इथून चाललो होतो म्हणून चहा प्यायला आलो' असे म्हणून ऑफिसमध्ये गर्दी करायचे.
'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाली अन् धक्का बसला:याच धुंदीत संजय जाधव यांनी स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांना घेऊन 'प्यारवाली लव्हस्टोरी' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला होता.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मॅनेजरने त्यांना फोन करून सांगितले की, "सर, थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे आणि कमाईमध्ये मोठा ड्रॉप (घसरण) झाला आहे.
"सुरुवातीला संजय जाधव यांना वाटले की, एखादा दिवस असा असू शकतो, शनिवार-रविवार चित्रपट नक्कीच चांगली कमाई करेल. मात्र, शनिवार आणि रविवारही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला.अख्खं ऑफिस एका रात्रीत रिकामं झालं:चित्रपट फ्लॉप झाल्याचा धक्का तर मोठा होताच, पण त्याहूनही मोठा धक्का संजय जाधव यांना लोकांच्या बदललेल्या वर्तनामुळे बसला. त्यांनी सांगितले की, जो चित्रपट फ्लॉप झाला, त्याच्या पुढच्याच दिवसापासून त्यांच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या २५ लोकांची गर्दी गायब झाली.
"अख्खं ऑफिस एका रात्रीत रिकामं झालं होतं. कालपर्यंत जे लोक कौतुक करत होते, ते अचानक दिसेनासे झाले. या अपयशाने आणि रिकाम्या झालेल्या ऑफिसने मला सर्वात मोठा धडा शिकवला की, इंडस्ट्रीमध्ये उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. यशाच्या हवेत कधीही वाहून जाऊ नये," अशी भावुक आणि कटू आठवण संजय जाधव यांनी व्यक्त केली.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




