
Sangli : सांगली कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारागृहाच्या आवारातच दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये भीषण राडा झाला असून, १६ जणांच्या टोळीने दोन गुंडांना विटांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वर्चस्ववादातून झालेल्या हाणामारीमुळे कारागृह प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून परिसरात खळबळ माजली आहे.
नेमकी घटना काय?
सांगली कारागृहातील खुल्या मैदानात कैद्यांना सोडण्यात आले असताना हा प्रकार घडला. जखमी झालेला पवन साळुंखे हा एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्याचा साथीदार मेघशाम ऊर्फ मोठ्या जाधव हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने या दोघांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले होते.
दुसरीकडे, त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आदित्य पवार आणि त्याचे १६ साथीदार वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली याच कारागृहात दुसऱ्या बरॅकमध्ये बंदिस्त आहेत. शनिवारी जेव्हा या दोन्ही टोळ्यांतील सदस्य कारागृहाच्या खुल्या मैदानात समोरासमोर आले, तेव्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य पवारच्या टोळीने पवन साळुंखे आणि मेघशामला उद्देशून डिवचण्यास सुरुवात केली. "तुम्हाला वेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे, म्हणून तुम्ही स्वतःला जास्त शहाणे समजता का?" असा सवाल करत १६ जणांच्या टोळीने त्यांना घेरले. यातून वादावादी वाढली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आदित्य पवारने आपल्या साथीदारांना ललकारत "यांना मारून टाका" असे आदेश दिले.
विटांनी केला थरारक पाठलाग
जिवाच्या भीतीने पवन आणि मेघशाम यांनी मैदानातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संख्येने जास्त असलेल्या १६ जणांच्या टोळीने त्यांचा पाठलाग केला. कारागृहाच्या आवारात पडलेल्या विटा उचलून या टोळीने दोघांवरही बेदम हल्ला चढवला. या हल्ल्यात पवन साळुंखे आणि मेघशाम ऊर्फ मोठ्या जाधव हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या राड्यामुळे कारागृहात एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून, हल्लेखोर १६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कारागृहासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारे टोळीयुद्ध भडकल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहर
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
महाराष्ट्र
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel



