
Raj Thackeray : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठी- हिंदीच्या वादामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी मारली होती. या निशिकांत दुबे यांना राज ठाकरे यांनी ऑपन चॅलेंज दिले होते. मीरारोड येथे झालेल्या त्यांना राज ठाकरे यांनी थेट धमकीच दिली. 'दुबे तू आम्हाला पटक पटक के मारणार.. दुबेलाच सांगतो.. दुबे, तू मुंबईत ये...मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुबे यांना प्रत्युत्तर दिले होते. आता मराठी-हिंदी भाषेच्या वादात केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांनी उडी मारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनाच चॅलेंज केले आहे. '...तर राज ठाकरे यांनी मंचावरून हिंदी भाषिक जनतेची माफी मागावी.', असे विधान त्यांनी केले आहे.
सतीश दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी त्यांना थेट चॅलेंज केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'राज ठाकरे जेव्हा व्यासपीठावर येतात, तेव्हा अचानक त्यांना मराठी धोक्यात वाटू लागते. हिंदी बोलणारा एखादा दुकानदार, रिक्षावाला किंवा प्रवासी दिसला, तर लगेच तो “महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर” हल्ला ठरतो. काय गमतीशीर विडंबना आहे ना… ज्या हिंदीवर त्यांना एवढा आक्षेप आहे, त्याच हिंदीत पत्रकार परिषद घेतल्या जातात, मुलाखती दिल्या जातात आणि Netflix वर एखादी वेब सीरिज बघायची झाली, तर सबटायटल्सही हिंदीतच असतात.'
सतीश दुबे यांनी राज ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शितात या मुद्द्यावरून देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असे लिहिले की, 'आता एक नजर त्यांच्या कुटुंबाकडेही टाकूया. मुलगा इंग्लिश मिडियम शाळेत शिकत होता.पण सार्वजनिक मंचावर आले की लगेच “मराठी अस्मिता” ची चादर ओढली जाते. असे का? कारण खऱ्या प्रश्नांवर बोलणं कठीण असतं. रोजगार, आरोग्य, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षण व्यवस्था. यावर बोलण्यासाठी अभ्यास हवा असतो, जमिनीवर काम पाहिजे, आणि जरा जबाबदारीही. आणि ज्यांना भाषणाच्या नावाखाली फक्त गोंगाट करता येतो, त्यांच्यासाठी “भाषा” हेच सर्वात सोपं लक्ष्य. कारण भाषा बोलत नाही, ती प्रश्न विचारत नाही.'
|
|
सतीश दुबे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुढे लिहिले की, 'उध्दव ठाकरे यांची राजकारणाची दिशा आता इतकी वाहती झाली आहे की पुढचे वळण कुठे असेल हे सांगणं अवघड झालंय. कधी शिवसेनेचा हिंदुत्वाचा झेंडा, कधी राहुल गांधींसोबत सेक्युलर कवच, कधी बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणं आणि कधी त्याच बाळासाहेबांच्या विचारांना दुर्लक्षित करणं. राजकारणात मतं बदलणं चूक नाही, पण वारंवार आत्माच बदलणं संशयास्पद नक्कीच ठरतं.'
सतीश दुबे यांनी राज ठाकरेंच्या मराठी अस्मितेवर देखील आक्षेप घेतला आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'आणि हो, जे गुंड पूर्वी रस्त्यावर हिंदी बोर्ड फाडत होते, ते आजही बेरोजगारच आहेत... कारण भाषा नोकरी देत नाही, सन्मानही देत नाही… तो मिळतो कामाने आणि विचारांनी. म्हणून राज ठाकरे साहेब, खरंच जर तुम्ही “महाराष्ट्राच्या अस्मितेचे” खरे रक्षक असाल, तर एक दिवस मंचावरून हिंदी भाषिक जनतेची माफी मागा.'
सतीश दुबे यांनी पुढे सांगितले की, 'ज्यांचा कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता, फक्त पोटाची भूक आणि रोजगाराची आस होती. आणि उध्दवजी, जर तुम्ही खरोखर बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवत असाल, तर ते “संदर्भानुसार” बदलणं थांबवा. कारण खरा नेता तोच असतो जो भाषांमध्ये भिंती उभ्या करत नाही, पूल बांधतो. मंचावर मराठीत बोलणं चांगली गोष्ट आहे, पण जमिनीवर माणुसकीची भाषा बोलणं त्याहून मोठी आहे.'
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



