
Raj thackeray : राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने मराठी भाषा विजय दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. या मराठी विजय सोहळ्यामध्ये भाषण करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. 'आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको. महाराष्ट्राला आणि मुंबईला हात लावूनच दाखवा.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी थेट मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारला इशारा दिला.
राज ठाकरे यांनी सांगितले की, 'खरं तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिले असतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं पण पाऊस असल्यामुळे जागा मिळत नाही. मी माझ्या मुलाखतीत सांगितले होते की कोणत्याही वादापेक्षा कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत.'
जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. 'मोर्चाला मी हिच घोषणा होती की कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचे नाही. खरं तर हा प्रश्न यायला नव्हता पाहिजे होता. पण कुठून हिंदीचा विषय आला माहिती नाही. पण कशासाठी हिंदी, कुणासाठी हिंदी लहान मुलांवर जबरदस्ती करत आहेत. कुणाला विचारायचे नाही शिक्षण तज्ज्ञांना विचारायचे नाही. पण आमच्याकडे सत्ता आहे बहुमत आहे आम्ही लादणार असे त्यांना वाटते. तुमच्याकडे सत्ता असेल तर विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला.
|
|
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा पुढे करून यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते हा त्यासाठी आगोदर भाषेला डिवचून पाहिले. कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा. काय मस्करी वाटली का?. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काही अंगावर लादायचा प्रयत्न करू नका. मग वेगळीकडे वळवा प्रकरण. मग काय ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडिअममध्ये शिकले. दादा भुसे मराठी शाळेत शिकून शिक्षणमंत्री झाले. देंवेंद्र फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. अरे कुणाकुणाली मुलं परदेशात शिकतात याची यादी आहे आमच्याकडे. मंत्रिमंडळातील मंत्र्याची हिंदी ऐकाल तर फेफरे येईल.'
हिंदी भाषा सक्तीनंतर राज ठाकरे यांनी सरकारला काही पत्र पाठवले होते. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, 'एक पत्र लिहिले, दोन पत्र लिहिले नंतर ते दादा भुसे आमच्याकडे आले. ते म्हणाले आम्ही बोलतो ते समजून घ्या. पण मी त्यांना सांगितले मी ऐकून घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र कुठून आणले. ते सूत्र आले ते केंद्राकडून. केंद्र सरकार आणि राज्य सरकरामधील दुव्यासाठी हे त्रिभाषा सूत्र आणले होते. केंद्रीय शिक्षण धोरणातही असं काही नाही. इतर राज्यातही असं काही नाही. त्यांनी महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणकडची राज्यांत बघा. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांना कळाले. त्याशिवाय त्यांनी माघार नाही घेतली.'
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा


























Subscribe to my channel


