
Pune to Rewa direct train with full schedule and stops : पुणेकरांना रेल्वे मंत्रालयाकडून खुशखबर देण्यात आला आहे. रिवा आणि पुणे या दरम्यान रविवार, ३ ऑगस्टपासून नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. महत्त्वाचे म्हणजे, रिवा आणि पुणे दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी ही पहिली ट्रेन आहे. पुणे-रिवा असा प्रवास करणाऱ्यांना आता आरामदायी प्रवास करता येणार आहे. या नव्या एक्सप्रेसचा नागपूरकरांना फायदा होणार आहे. पुणे-रिवा यादरम्यान धावणारी एक्सप्रेस नागपूरमध्ये थांबणार आहे. त्यामुळे पुणे-नागपूर असा प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.भारतीय रेल्वे नवीन पुणे -रिवा -पुणे एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे.
या दोन शहरांना जोडणारी ही (कनेक्टिव्हिटी) पहिली ट्रेन असेल. सध्या या दोन ठिकाणांदरम्यान अप्रत्यक्ष जोडणी उपलब्ध आहे. पण ह्या नव्या ट्रेननमुळे प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होईल. पुणे हे एक ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र आहे आणि महाराष्ट्रातील आळंदी, पंढरपूर, अक्कलकोट इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारे ठिकाण आहे. रिवा देखील ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र असून केओटी व बहुती धबधबे, व्हाइट टायगर सफारी यांसारख्या आकर्षणांसह एक पर्यटनस्थळ देखील आहे. ही ट्रेन महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा प्रदान करणार आहे.
या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट,नैनपुर, जबलपुर, कटनी, सतना ,रीवा ही शहरे परस्पर जोडली जातील. ही ट्रेन आरक्षित आणि अनारक्षित प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात येत आहे. ह्या ट्रेनमुळे नियमित प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच सुट्टीमध्ये प्रवासाला जाणारे प्रवासी यांच्यासाठीही उपयुक्त ठरेल. यामुळे पर्यटन आणि तीर्थयात्रेला चालना मिळेल तसेच व्यापार आणि उद्योगासाठी नव्या संधी निर्माण होतील.
पुणे-रिवा एक्सप्रेसची वेळ काय?
ट्रेन क्र. 20151 पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल.
ट्रेन क्र. 20152 रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
कोणकोणत्या स्थानकावर ही ट्रेन थांबणार -
दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना.
एक्सप्रेसची रचना कशी असेल?
२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन, असे सरंचना असेल.
Q
पुणे–रीवा एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?
A
पुणे–रीवा ही एक्सप्रेस रविवार, ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
Q
पुणे–रीवा ही ट्रेन कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार आहे?
A
दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी, सतना.
Q
पुणे–रीवा ही ट्रेन कोणत्या दिवशी धावेल?
A
पुणे–रीवा (गुरुवारी), रीवा–पुणे (बुधवारी) हे दोन फेऱ्या आठवड्यातून असतील.
Q
पुणे–रीवा या ट्रेनचे वैशिष्ट्य काय आहे?
A
ही ट्रेन पुणे–रीवा दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी पहिली ट्रेन आहे, ती वेगवान, आरामदायक असून पर्यटक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




