
Pune : कन्हेरी येथील ऐतिहासिक मारुती राय मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नारळ फोडून महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी रणनीतीवर स्पष्ट भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या जुन्या भावनेला पूर्णविराम देण्यात येईल. प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम आणि कार्यक्षम युवकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेत त्यांना जबाबदारी आणि संधी उपलब्ध करून दिली जाईल.”
बारामतीची पोटनिवडणूक ही केवळ निवडणूक नसून ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “ही जबाबदारी माझ्यावर आणि संपूर्ण बारामतीकरांवर आहे. दोन महिन्यांपूर्वी नियतीने क्रूर खेळ केला. दादा आपल्याला सोडून गेले. त्यांच्या निधनानंतर अलोट जनसागराने श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण देशाला दादा काय चीज होते, हे समजले. विमान अपघातात विखुरलेले कागदपत्रे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत असलेल्या कार्यमग्नतेची साक्ष देत होते.”
दादांच्या नंतर महिला म्हणून जबाबदारी पार पाडता येईल का, याबाबत अनेकांना संशय होता, असे सांगताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मात्र दादांच्या आशीर्वादाने ही जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि लढण्याचे बळ दिले. मी राज्याला पहिले महिला धोरण देणाऱ्या परिवाराची सून आहे. तरीही कोणीही माझ्या कामाचे मूल्यांकन केवळ महिला म्हणून करू नये, असे मला वाटते.”
दादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील यात्रा, जत्रा आणि उरुस अतिशय साधेपणाने साजरे झाल्याचे सांगताना त्यांनी बारामतीकरांच्या नेत्यांविषयीच्या अपार प्रेम आणि श्रद्धेचे दर्शन घडले असे म्हटले. “बारामतीकरांच्या या विश्वासाला पात्र ठरून दादांच्या स्वप्नातील सुंदर आणि विकसित बारामती घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी काम करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सभेचे वातावरण भावुक झाले होते.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले, “संकट अंगावर घेणारा आणि कामाचा धडाका लावणारा नेता आपल्यात नाही, याची सर्वांना जाणीव आहे. मतदारांचा आवाज मुंबईत नव्हे तर दिल्लीत पोहोचला पाहिजे, असे मतदान करा. कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवावेत. पवार कुटुंबाचे विचार मनात न आणता आपण सर्वजण पवार कुटुंबाचे देणे लागतो, हे मतदानातून सिद्ध करा.”
मंत्री आदिती तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींनी भारावून जाऊन भाषण केले. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. यावेळी आमदार सुनील शेळके, दिलीप वळसे पाटील, सना मलिक, विश्वास देवकाते, भाजपचे अविनाश मोटे आदींनीही आपले विचार मांडले.
उपस्थित मान्यवर: जय पवार, रुतुजा पवार, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पृथ्वीराज जाचक, वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, सचिन सातव, किरण गुजर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि बारामतीकर उपस्थित होते.
शहर
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
महाराष्ट्र
- कोल्हापुर: लपंडाव खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- ठाणे: भिवंडीत इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, तर डोंबिवलीतील गुन्हेगारी आणि नवी मुंबईतील ड्रग्स कारवाईमुळे खळबळ
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली



























Subscribe to my channel




