
Pune : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे चार महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते. उद्घाटनानंतर आता अखेरीस त्यावरून प्रत्यक्ष सेवा सुरू झाली आहे. या टर्मिनलवरून पहिल्या विमानाचे उड्डाण रविवारी झाले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते टर्मिनलवरील पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास देऊन या टर्मिनलची सेवा सुरू करण्यात आली.
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांची सेवा नवीन टर्मिनलवरून पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियाचे पुणे ते दिल्ली आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे पुणे ते भुवनेश्वर या विमानांचे उड्डाण सर्वप्रथम नवीन टर्मिनलवरून झाले. नवीन टर्मिनलवर रविवारी ९ विमानांचे उड्डाण होणार असून, ९ विमाने उतरणार आहेत. या टर्मिनलवर सोमवारपासून १६ विमानांचे उड्डाण होणार असून, १६ विमाने उतरणार आहेत. नवीन टर्मिनलवरून टप्प्याटप्प्याने विमानांची संख्या वाढविली जाणार आहे.
|
|
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, नवीन टर्मिनलचे उद्घाटन मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. टर्मिनलची काही कामे राहिलेली असल्याने ते सेवेसाठी खुले करण्यात आले नव्हते. आता सगळी कामे पूर्ण झाल्यानंतर टर्मिनल प्रवाशांसाठी खुले झाले आहे. नवीन टर्मिनल हे अतिशय सुंदर असून, त्यातून महाराष्ट्राची संस्कृती दर्शविण्यात आली आहे. याचबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या १० वर्षांत ७५ नवीन विमानतळे आणि ४६९ हवाई मार्ग सुरू झाले आहेत. देशातील नागरी हवाई क्षेत्र हे जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. आगामी काळात २० ते २५ नवीन विमानतळे कार्यान्वित होणार आहेत.
पुणेकर प्रवाशांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. नवीन टर्मिनलवरील पहिली प्रवासी ठरणे हे माझ्यासाठी अतिशय गौरस्वापद आहे. हवाई प्रवाशांसाठी उभारलेल्या टर्मिनलमुळे हवाई प्रवास आणखी सुकर होण्यास मदत होईल. पुणे विमानतळाची प्रवासी क्षमताही यामुळे वाढणार आहे, असे नवीन टर्मिनलवरील पहिल्या प्रवासी लेफ्टनन्ट कर्नल मनिषा यांनी सांगितले.
पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठीही प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारकडूनही यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच धावपट्टी विस्ताराचा प्रश्न मार्गी लागेल. यामुळे पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
असे आहे नवीन टर्मिनल…
एकूण क्षेत्रफळ : ५२ हजार चौरस मीटर
तासाला प्रवासी क्षमता : ३ हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : ९० लाख
प्रवासी लिफ्ट : १५
सरकते जिने : ८
चेक-इन काऊंटर : ३४
एकूण खर्च : ४७५ कोटी रुपये
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



