
Pakistan : किरकोळ वादातून खून झाल्याच्या अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. तसेच सोशल मीडियाच्या वापरावरून वाद घडून अनेक गंभीर घटना देखील याआधी अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना पाकिस्तानमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पद्धतीची जीवनशैली जगत असल्यामुळे आणि सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे एका तरुणाने त्याच्याच कुटुंबातील चार महिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तानच्या कराचीमध्ये घडला आहे. यामध्ये त्या तरुणाच्या आईसह बहिणीचाही समावेश आहे.
या तरुणाला त्याच्या कुटुंबातील महिलांनी सोशल मीडिया वापरण्यावर आक्षेप होता. त्यामधून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. वृत्तानुसार, कराचीमधील लियारी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये या चार महिलांचे मृतदेह आढळून आले होते. त्यांच्या शरीरावर जखमाही आढळून आल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीचे नाव बिलाल अहमद असं असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
|
|
दरम्यान, आरोपी अहमदने या घटनेबाबत न्यायालयाला सांगितलं की, त्याची आई, बहीण, भाची आणि मेहुणीचा त्याने गळा चिरला. कारण त्याला सध्याच्या नव्या जीवनशैलीच्या पद्धतीवर आक्षेप होता. तसेच आई, बहीण, भाची आणि मेहुणी यांचे आरोपीशी कायम काहीतरी कारणांवरून कायम भांडण करत होत्या. त्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊन हे कृत्य केल्याचं आरोपी अहमदने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
बिलाल हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि अतिपरंपरावादी होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. तपासादरम्यान, अशीही माहिती समोर आली आहे की, आरोपी बिलाल अहमदचे त्याच्या कुटुंबातील महिलांशी दररोज भांडणे होत असत. तो त्यांना त्यांच्या जीवनशैलीच्या पद्धतीवर आणि सोशल मीडियाच्या वापरावरून सातत्याने रागवत असे. त्याची पत्नीही त्याला तो अतिपरंपरावादी असल्याच्या कारणातून सोडून गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर केल्याने बिलाल हा त्याची आई, बहीण, भाची आणि मेहुणीवर नाराज होता, अशी माहिती त्याने पोलिसांना चौकशीवेळी दिली. तसेच सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे तो बहीण आणि भाचीवर नाराज होता, अशीही माहिती समोर आली आहे.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.


























Subscribe to my channel



