पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि पोषण आहाराशी खेळणाऱ्या शाळा किंवा यंत्रणेवर आता राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या दर्जात कोणतीही हलगर्जीपणा किंवा कसूर अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार शिक्षण विभागाने शाळांना एकूण ११ मुद्द्यांच्या सविस्तर व महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजन (मिड-डे मील) आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
मागील काही काळापासून राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत पालकांकडून व विविध स्तरांतून तक्रारी समोर येत होत्या. या गंभीर प्रकारची दखल घेत शिक्षण विभागाने आता अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. जारी करण्यात आलेल्या ११ कलमी निर्देशामध्ये प्रामुख्याने आहाराची गुणवत्ता, अन्न शिजवण्याची जागा आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता, धान्याची साठवणूक, पिण्याच्या पाण्याची शुद्धता, आणि आहाराची चव व पौष्टिक मूल्ये तपासणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असणार नाही याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची राहणार आहे.
शिक्षण विभातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रमुख ११ मुद्द्यांमधील निर्देशानुसार, प्रत्येक शाळेने अन्न शिजवण्यापूर्वी धान्याची आणि साहित्याची कसून तपासणी करावी. आहाराची चव घेण्यासाठी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी आधी स्वतः जेवण करून खात्री करावी आणि त्यानंतरच ते विद्यार्थ्यांना वाढण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, स्वयंपाक करणाऱ्या मदतनीसांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची नियमित वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आहाराच्या वितरणात कोणतीही अनियमितता आढळल्या संबंधित शाळा प्रशासनावर आणि ठेकेदारावर शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
या सर्व धोरणात्मक निर्णयामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य निकोप राहावे आणि त्यांना दर्जेदार व पौष्टिक आहार मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण विभागाच्या या धडक कारवाईमुळे शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले असून, पोषण आहाराच्या व्यवस्थेत मोठा बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
- मुंबई: राज्याची मंत्रिमंडळ बैठक सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत रवाना; बैठकीला पाठ देण्यामागचे हे आहे खास कारण
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




