
Mumbai-Pune Expressway : देशात सध्या नवे नवे महामार्ग आणि द्रुतगती बांधले जात आहेत, त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होत आहे. मागील ७० वर्षांमध्ये देशात अनेक एक्सप्रेस वे बांधण्यात आले. मोठ्या शहरांना जोडण्यासाठी आणि दळणवळण अतिशय वेगात होण्यासाठी या एक्स्प्रेस वेचा फायदा होतो. पण देशातील सर्वात महागडा आणि पहिला एक्स्प्रेस वे महाराष्ट्रात आहे. होय.. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतामधील पहिला एक्सप्रेस वे आहे. २००२ मध्ये हा एक्सप्रेस वे लोकांसाठी खुला करण्यात आला होता. २५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या या एक्सप्रेस वे वरून सर्वाधिक वाहतूक होतेय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेची वैशिष्ट्य आणि टोल टॅक्सबद्दल जाणून घेऊयात.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या बांधकामासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 94.5 किलोमीटरच्या या एक्स्प्रेस वेसाठी अंदाजे 1,630 कोटी रुपये खर्च आलाय. MSRDC ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) बांधलेला हा एक्सप्रेस वे नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होतो अन् पुण्यातील किवळे येथे संपतो. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे मुळे दोन शहरे जवळ आली. एक्सप्रेस वे वरील टोल वर्षाला सहा टक्के वाढवण्यात येतो. पण तीन वर्षांनी एकत्रपणे १८ टक्के लागू करण्यात येतो.
|
Santosh Deshmukh Case : राज्यातील ग्रामपंचायती ९ जानेवारीला बंद, सरकारकडे काय केल्या मागण्या? |
एक्सप्रेस वेवर टोल किती?
एक्स्प्रेस वेची डागडुजी एप्रिल २०२३ मध्ये अखेरची करण्यात आली. त्यानंतर टोलच्या किंमती वाढवण्यात आल्या. साध्या वाहनांसाठी २७० रूपयांवरून ३२० रूपये इतका टोल करण्यात आला. मिनीबस आणि टेम्पो यासारख्या वाहनांसाठी 495 रुपये करण्यात येत आहेत. १६ चाकी ट्रकचा टोल 585 रुपयांवरून ६८५ रुपये इतका करण्यात आला. बसेससाठी सध्या ९४० रूपये इतका टोल आकारण्यात येतो. 2030 पर्यंत टोलचे दर (Mumbai-Pune Expressway Toll Hike: Key Highlights and Future Plans Until 2030) हेच राहणार आहेत, त्यामध्ये कोणतीही सुधारणा केली जाणार नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबद्दल या गोष्टी माहित आहेत का? Here are some of the interesting facts about the Mumbai-Pune Expressway
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एसएसआरडीसीने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बांधला आहे.
१९९९ मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा काही भाग लोकांसाठी खुला करण्यात आला होता. २००२ मध्ये पूर्ण एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या एक्स्प्रेस वेचे एक टोक राज्याची राजधानी मुंबईला आहे, तर दुसरे टोक सांस्कृतिक राजधानी पुण्याला आहे.
या एक्स्प्रेस वेसाठी अंदाजे १६३० कोटी रूपयांचा खर्च आला.
कळंबोली (नवी मुंबई) ते कळवे (पुणे) यादरम्यान 94.5 किमी लांब एक्स्प्रेस वे आहे.
या एक्स्प्रेस वे मुळे मुंबई आणि पुण्यातील प्रवासाचे अंतर दोन ते तीन तासांनी कमी झाले.
प्रत्येकवर्षी सहा टक्क्यांनी टोलच्या किंमती वाढवण्यात येतात, पण प्रत्येक तीन वर्षानंतर १८ टक्क्यांनी अंमलात येतात.
एप्रिल २०२३ मध्ये एक्स्प्रेस वेवरील डागडुजीचे काम करण्यात आले. त्यानंतर २०३० नंतरच टोल वाढणार आहे.
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."





























Subscribe to my channel




