
Mumbai-Pune Expressway : देशात सध्या नवे नवे महामार्ग आणि द्रुतगती बांधले जात आहेत, त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होत आहे. मागील ७० वर्षांमध्ये देशात अनेक एक्सप्रेस वे बांधण्यात आले. मोठ्या शहरांना जोडण्यासाठी आणि दळणवळण अतिशय वेगात होण्यासाठी या एक्स्प्रेस वेचा फायदा होतो. पण देशातील सर्वात महागडा आणि पहिला एक्स्प्रेस वे महाराष्ट्रात आहे. होय.. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतामधील पहिला एक्सप्रेस वे आहे. २००२ मध्ये हा एक्सप्रेस वे लोकांसाठी खुला करण्यात आला होता. २५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या या एक्सप्रेस वे वरून सर्वाधिक वाहतूक होतेय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेची वैशिष्ट्य आणि टोल टॅक्सबद्दल जाणून घेऊयात.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या बांधकामासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 94.5 किलोमीटरच्या या एक्स्प्रेस वेसाठी अंदाजे 1,630 कोटी रुपये खर्च आलाय. MSRDC ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) बांधलेला हा एक्सप्रेस वे नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होतो अन् पुण्यातील किवळे येथे संपतो. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे मुळे दोन शहरे जवळ आली. एक्सप्रेस वे वरील टोल वर्षाला सहा टक्के वाढवण्यात येतो. पण तीन वर्षांनी एकत्रपणे १८ टक्के लागू करण्यात येतो.
|
Santosh Deshmukh Case : राज्यातील ग्रामपंचायती ९ जानेवारीला बंद, सरकारकडे काय केल्या मागण्या? |
एक्सप्रेस वेवर टोल किती?
एक्स्प्रेस वेची डागडुजी एप्रिल २०२३ मध्ये अखेरची करण्यात आली. त्यानंतर टोलच्या किंमती वाढवण्यात आल्या. साध्या वाहनांसाठी २७० रूपयांवरून ३२० रूपये इतका टोल करण्यात आला. मिनीबस आणि टेम्पो यासारख्या वाहनांसाठी 495 रुपये करण्यात येत आहेत. १६ चाकी ट्रकचा टोल 585 रुपयांवरून ६८५ रुपये इतका करण्यात आला. बसेससाठी सध्या ९४० रूपये इतका टोल आकारण्यात येतो. 2030 पर्यंत टोलचे दर (Mumbai-Pune Expressway Toll Hike: Key Highlights and Future Plans Until 2030) हेच राहणार आहेत, त्यामध्ये कोणतीही सुधारणा केली जाणार नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबद्दल या गोष्टी माहित आहेत का? Here are some of the interesting facts about the Mumbai-Pune Expressway
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एसएसआरडीसीने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बांधला आहे.
१९९९ मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा काही भाग लोकांसाठी खुला करण्यात आला होता. २००२ मध्ये पूर्ण एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या एक्स्प्रेस वेचे एक टोक राज्याची राजधानी मुंबईला आहे, तर दुसरे टोक सांस्कृतिक राजधानी पुण्याला आहे.
या एक्स्प्रेस वेसाठी अंदाजे १६३० कोटी रूपयांचा खर्च आला.
कळंबोली (नवी मुंबई) ते कळवे (पुणे) यादरम्यान 94.5 किमी लांब एक्स्प्रेस वे आहे.
या एक्स्प्रेस वे मुळे मुंबई आणि पुण्यातील प्रवासाचे अंतर दोन ते तीन तासांनी कमी झाले.
प्रत्येकवर्षी सहा टक्क्यांनी टोलच्या किंमती वाढवण्यात येतात, पण प्रत्येक तीन वर्षानंतर १८ टक्क्यांनी अंमलात येतात.
एप्रिल २०२३ मध्ये एक्स्प्रेस वेवरील डागडुजीचे काम करण्यात आले. त्यानंतर २०३० नंतरच टोल वाढणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




