
What did the Supreme Court say on 2006 Mumbai blasts verdict? : 2006 च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. बॉम्बे हायकोर्टाने 21 जुलै 2025 रोजी या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केली होती. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने 24 जुलै 2025 रोजी या याचिकेवर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
आज झालेली ही जजमेंट दुसऱ्या मकोका केसमधे वापरली जाईल, त्यामुळं या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने SG तुषार मेहता यांनी कोर्टाला केली होती. न्यायमूर्ती सुंद्रेश यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हाय कोर्टाच्या निर्णायाला स्थगिती दिली आहे. हायकोर्टाने अभियोजन पक्ष पुरावे सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आणि साक्षीदारांचे जबाब विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले होते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने युक्तिवाद केला.
आरोपींना दिलासा कायम ?
कोर्टाने स्थगिती दिली असली तरी आरोपींना मात्र मोठा दिलासा मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असली तरी आरोपींना मात्र पुन्हा जेलमध्ये जावं लागणार नाही. सुप्रीम कोर्टाकडून उच्च न्यायालयाच्या जजमेंटला स्थगिती दिली आहे.
कोर्टाने आरोपींना नोटीस इशू केली असून त्यांना त्यांचं म्हणणं मांडावं लागणार आहे. पुढील सुनावणीत काय होत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
|
|
साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती
11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 189 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 824 हून अधिक जण जखमी झाले होते. संध्याकाळी 6:24 ते 6:35 या 11 मिनिटांच्या कालावधीत सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. हे स्फोट प्रेशर कुकरमध्ये ठेवलेल्या RDX-आधारित आयईडी (Improvised Explosive Devices) वापरून झाले. माटुंगा रोड, बांद्रा, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली, भाईंदर आणि विरार येथील ट्रेनचा समावेश होता.
Q
मुंबई साखळी बॉम्बस्फोट कधी आणि कुठे घडले?
A
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये सायंकाळी ६:२४ ते ६:३५ या ११ मिनिटांच्या कालावधीत सात साखळी बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट माटुंगा, खार, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरीवली, मीरा रोड आणि भाईंदर येथे झाले.
Q
मुंबई बॉम्बस्फोटात किती जीवितहानी झाली आणि किती जण जखमी झाले?
A
या हल्ल्यात १८९ ते २०९ लोक मृत्यूमुखी पडले आणि ७०० हून अधिक जण जखमी झाले.
Q
या हल्ल्यामागील कारण काय होते?
A
तपासात समोर आले की, हा हल्ला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने आयएसआयच्या मदतीने घडवला होता. काही अहवालांनुसार, २००२ च्या गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी हा कट रचला गेला.
Q
या हल्ल्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला?
A
दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये आरडीएक्स ठेवून बॉम्ब तयार केले होते, जे पश्चिम रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये ठेवले गेले.
Q
या प्रकरणातील आरोपींचे काय झाले?
A
२००७ मध्ये विशेष न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले, पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
Q
सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय का स्थगित केला?
A
महाराष्ट्र सरकारच्या मागणीवर, ही केस दुसऱ्या मकोका खटल्यात वापरली जाऊ शकते म्हणून स्थगिती देण्यात आली.
Q
आरोपी पुन्हा तुरुंगात जातील का?
A
सध्या नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय स्थगित केला असला तरी आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवलेले नाही.
Q
हायकोर्टाने आरोपींना निर्दोष का ठरवलं होतं?
A
हायकोर्टाने नमूद केलं की पुरावे अपुरे होते आणि साक्षीदारांचे जबाब विश्वासार्ह नव्हते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




