
Mumbai Local Accident Mumbra diva station : आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या मुंबईकरांवर काळाने घाला घातला. कसाऱ्याहून सीएसएमटी लोकल आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे निघालेल्या लोकलचा दिवा-मुंब्रा स्थनकादरम्यान अपघात घडला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. लोकलच्या दारात उभे असणारे प्रवासी खाली पडले, त्यामुळे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये तीन महिला आणि तीन पुरूषांचा मृत्यू झाला आहे.
लोकलच्या दारात लटकत उभं असणारे प्रवासी खाली पडले. दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्याने, दारात उभे असलेले प्रवासी रूळावर पडले अन् जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तर ८ त १० जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कसारा सीएसएमटी लोकलमधून दररोज शेकडो प्रवासी कामावर जात असतात, त्यात आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे मोठी गर्दी होती. मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल एकमेंकाना घासल्या गेल्या, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली, त्यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. लोकल जवळून गेल्यामुळे दारात लटकत उभे असणारे प्रवाशी एकमेकांना घासले गेले अन् त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते प्रवाशी रूळावर पडले. दोन्ही लोकलच्या दारात उभे असणारे १० ते १२ प्रवाशी रेल्वे रूळावर पडले. काही जणांची पाट सोलली गेली होती. डोक्याला जबर मार लागला. रूळावर जिकडे तिकडे मृतदेह अन् रक्तच होते.
|
|
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेकडून सर्व मदत करण्यात आली आहे. रेल्वेकडून तात्काळ रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. दोन्ही लोकलच्या फूटबोर्डवर प्रवासी उभे होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सकाळी साडे नऊ वाजता मुंब्रा-दिवा स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. मुंबईकडून कल्याणकडे निघालेली लोकल आणि कसाराहून सीएसएमटीकडे लोकल या एकमेकांना घासल्या गेल्या. सकाळच्या गजबजलेल्या वेळी लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालये सुरू होत असल्याने प्रवाशांची संख्या जास्त होती. अनेक प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करत होते, दोन्ही लोकल जोरात घासल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, ही घटना रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये दरवर्षी सुमारे २,५०० ते ३,००० मृत्यू होतात, ज्यापैकी बहुतांश मृत्यू हे ट्रेनमधून पडणे किंवा रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे होतात.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




