
Mumbai : मुंबईला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या धरणातून पावसाळ्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्याचे नियोजन महापालिका करत आहे.
मध्य वैतरणा आणि मोडक सागरदरम्यान धरणालगतच बंधारा बांधण्याचा पर्याय विचाराधीन असून त्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरीकडे, विहार तलावाजवळच उभारण्यात येणाऱ्या जादा क्षमतेच्या पम्पिंग स्टेशनच्या कामालादेखील गती दिली जाणार आहे. विहार तलावातून विसर्ग होणारे पाणी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात वळवून ते पिण्यासाठी वापरण्यात येणार असून या कामाला याच महिन्यात सुरुवात होत आहे.
मुंबईला विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर व त्यापेक्षाही लांब अंतरावर आहेत. सातही तलावांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता ही २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर आहे. या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास धरणे तुडुंब भरतात. परिणामी त्यातून जादा पाण्याचा विसर्ग करावा लागतो. या पाण्याचाही पिण्यासाठी वापर करता येईल, अशी योजना पालिकेने तयार केली आहे.
|
Pune : पुणे स्टेशन परिसरातील दुकानाला आग, दुकानाच्या परिसरातील लॉजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका |
विहार तलावाच्या काठावर २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे पम्पिंग स्टेशन बांधण्यात येत आहे. अतिरिक्त साठवलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात शहराच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यात भर पडेल, अशी आशा महापालिकेला आहे. यासाठी ९८ कोटी रुपये खर्च आहे. विहार तलावातून बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये वळवले जाईल, जे पुढे भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाणार आहे. त्यानंतर शुद्ध केलेले पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यातून उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पास महिन्यापासून असल्याची चालू सुरुवात होत माहिती मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) सौरभ देशपांडे यांनी दिली.
हे पम्पिंग स्टेशन प्रतिदिन दोनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे असले तरीही सुरुवातीला त्यात ९० दशलक्ष लिटर एवढ्याच क्षमतेचा पाणीसाठा केला जाणार असल्याचे, देशपांडे म्हणाले. या प्रकल्पाबरोबरच मोडकसागर आणि मध्य वैतरणातूनही विसर्ग होणाऱ्या पाण्याचा वापर मुंबईकरांसाठी केला जाणार आहे. या दोन धरणांदरम्यान लहानसा बंधारा बांधण्याची योजना आहे. यातून मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे.
पावसाळ्यात विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्यास ते पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे काही वेळा मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढते. परिणामी, त्याचा फटका आणूबाजूच्या परिसरांना बसतो. विहार तलावाजळील प्रकल्प झाल्यास विसर्ग पाणी मिठी नदीत सोडले जाणार नाही. त्यामुळे येथील स्थानिकांनाही दिलासा मिळेल.
मध्य वैतरणाची साठवणक्षमता अधिक
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणे आहेत. त्यापैकी अप्पर वैतरणातून मध्य वैतरणाला पाणी मिळते आणि तेथून मोडकसागर धरणात पाणी जाते. मध्य वैतरणा आणि मोडकसागर दरम्यान बंधारा बांधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मोडकसागर धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ही १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर, तर मध्य वैतरणाची पाणीसाठवण क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर आहे.
शहर
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
महाराष्ट्र
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- पुणेकर कुटुंबावर काळाचा घाला! कोल्हापुराजवळ भीषण अपघात; आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत
गुन्हा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
- बिहार हादरलं! शिक्षकाच्या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुष छळवणूक; शाळेकडून बळजबरीने थामवला दाखला (TC)
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम






















Subscribe to my channel




