
Mumbai : मुंबईला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या धरणातून पावसाळ्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्याचे नियोजन महापालिका करत आहे.
मध्य वैतरणा आणि मोडक सागरदरम्यान धरणालगतच बंधारा बांधण्याचा पर्याय विचाराधीन असून त्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरीकडे, विहार तलावाजवळच उभारण्यात येणाऱ्या जादा क्षमतेच्या पम्पिंग स्टेशनच्या कामालादेखील गती दिली जाणार आहे. विहार तलावातून विसर्ग होणारे पाणी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात वळवून ते पिण्यासाठी वापरण्यात येणार असून या कामाला याच महिन्यात सुरुवात होत आहे.
मुंबईला विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर व त्यापेक्षाही लांब अंतरावर आहेत. सातही तलावांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता ही २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर आहे. या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास धरणे तुडुंब भरतात. परिणामी त्यातून जादा पाण्याचा विसर्ग करावा लागतो. या पाण्याचाही पिण्यासाठी वापर करता येईल, अशी योजना पालिकेने तयार केली आहे.
|
Pune : पुणे स्टेशन परिसरातील दुकानाला आग, दुकानाच्या परिसरातील लॉजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका |
विहार तलावाच्या काठावर २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे पम्पिंग स्टेशन बांधण्यात येत आहे. अतिरिक्त साठवलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात शहराच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यात भर पडेल, अशी आशा महापालिकेला आहे. यासाठी ९८ कोटी रुपये खर्च आहे. विहार तलावातून बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये वळवले जाईल, जे पुढे भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाणार आहे. त्यानंतर शुद्ध केलेले पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यातून उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पास महिन्यापासून असल्याची चालू सुरुवात होत माहिती मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) सौरभ देशपांडे यांनी दिली.
हे पम्पिंग स्टेशन प्रतिदिन दोनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे असले तरीही सुरुवातीला त्यात ९० दशलक्ष लिटर एवढ्याच क्षमतेचा पाणीसाठा केला जाणार असल्याचे, देशपांडे म्हणाले. या प्रकल्पाबरोबरच मोडकसागर आणि मध्य वैतरणातूनही विसर्ग होणाऱ्या पाण्याचा वापर मुंबईकरांसाठी केला जाणार आहे. या दोन धरणांदरम्यान लहानसा बंधारा बांधण्याची योजना आहे. यातून मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे.
पावसाळ्यात विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्यास ते पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे काही वेळा मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढते. परिणामी, त्याचा फटका आणूबाजूच्या परिसरांना बसतो. विहार तलावाजळील प्रकल्प झाल्यास विसर्ग पाणी मिठी नदीत सोडले जाणार नाही. त्यामुळे येथील स्थानिकांनाही दिलासा मिळेल.
मध्य वैतरणाची साठवणक्षमता अधिक
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणे आहेत. त्यापैकी अप्पर वैतरणातून मध्य वैतरणाला पाणी मिळते आणि तेथून मोडकसागर धरणात पाणी जाते. मध्य वैतरणा आणि मोडकसागर दरम्यान बंधारा बांधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मोडकसागर धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ही १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर, तर मध्य वैतरणाची पाणीसाठवण क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




