
Mumbai : एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी गट) या गटाची परीक्षेला ९ एप्रिलपासून सुरुवात होत असून, यासाठी अर्ज भरलेल्या ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांपैकी ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. तसेच ३.६८ टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा पीसीबी गटासाठी राज्यभरातून ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिनी असून १ लाख २५ हजार ७५१ विद्यार्थी आहेत. तसेच ११ तृतीयपंथीय विद्यार्थी आहेत.
या विद्यार्थ्यांना गुरुवारीपासून ऑनलाईन लॉगीन आयडीमध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार ३ लाख १ हजार ३७ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८९ हजार २८६ म्हणजेच ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. तर ९ हजार २९ म्हणजेच ३ टक्क विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असून, तर २ हजार ५८ म्हणजे ०.६८ टक्के विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे.
|
|
मात्र पहिल्या पसंतीचे केंद्र हे विद्यार्थी राहत असलेल्या जिल्ह्यातील असून, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र हे अन्य जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र
पीसीबी परीक्षेसाठी ११ हजार ८७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असले तरी या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी मुलींना दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करावा लागू नये याची काळजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेतल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या ११ तृतीयपंथींयापैकी १० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे.
सामाईक प्रवेश परीक्षा ही संगणक आधारित असल्याने जिल्हानिहाय केंद्रे तयार करावी लागतात. प्रत्येक तालुक्यामध्ये पुरेशी केंद्र उपलब्ध करणे शक्य नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांसंदर्भात अन्य पर्याय भरून घेतले जातात. मात्र विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचेच केंद्र मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




