
Mumbai : एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी गट) या गटाची परीक्षेला ९ एप्रिलपासून सुरुवात होत असून, यासाठी अर्ज भरलेल्या ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांपैकी ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. तसेच ३.६८ टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा पीसीबी गटासाठी राज्यभरातून ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिनी असून १ लाख २५ हजार ७५१ विद्यार्थी आहेत. तसेच ११ तृतीयपंथीय विद्यार्थी आहेत.
या विद्यार्थ्यांना गुरुवारीपासून ऑनलाईन लॉगीन आयडीमध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार ३ लाख १ हजार ३७ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८९ हजार २८६ म्हणजेच ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. तर ९ हजार २९ म्हणजेच ३ टक्क विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असून, तर २ हजार ५८ म्हणजे ०.६८ टक्के विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे.
|
|
मात्र पहिल्या पसंतीचे केंद्र हे विद्यार्थी राहत असलेल्या जिल्ह्यातील असून, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र हे अन्य जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र
पीसीबी परीक्षेसाठी ११ हजार ८७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असले तरी या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी मुलींना दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करावा लागू नये याची काळजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेतल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या ११ तृतीयपंथींयापैकी १० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे.
सामाईक प्रवेश परीक्षा ही संगणक आधारित असल्याने जिल्हानिहाय केंद्रे तयार करावी लागतात. प्रत्येक तालुक्यामध्ये पुरेशी केंद्र उपलब्ध करणे शक्य नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांसंदर्भात अन्य पर्याय भरून घेतले जातात. मात्र विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचेच केंद्र मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



