
Mumbai : मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधितांसाठी बांधलेली माहुल येथील घरे कर्मचाऱ्याना स्वस्तात देण्याचे ठरवलेले आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून या घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. माहुल येथील १३ हजार घरांपैकी ९,०९८ घरे मुंबई महापालिकेने विक्रीला काढली आहेत. त्याकरीता कर्मचाऱ्यांना कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र या घरांसाठी अद्याप केवळ दीडशे कामगारांनी अर्ज केले आहेत. पालिका प्रशासनाने या घरांच्या योजनेची सर्वत्र जाहिरातही सुरू केली आहे. मात्र कर्मचारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरातील माहुल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. यापैकी काही घरांमध्ये प्रकल्पबाधित राहतात. तर बहुतांशी घरे रिकामी आहेत. या घरांच्या देखभालीसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही घरे महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांना स्वस्तात विकत देण्याचे ठरवले आहे.
या योजनेअंतर्गत एक घर १२ लाख ६० हजार रुपयांत, तर दोन घरे २५ लाख २० हजार रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. त्यासाठी म्युनिसिपल बँकेकडून ८.५० टक्के व्याज दराने ९० टक्के कर्जही दिले जाणार आहे. १७ मार्चपासून या घरांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. १५ एप्रिलपर्यंत कामगारांना अर्ज करता येणार आहे. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ दीडशे अर्ज आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
|
|
मुंबई महापालिकेत हजारो स्वच्छता कर्मचारी कामाला असून ते मुंबई, ठाणे, विरार, वसई तसेच मुंबईपासून दूरवरच्या परिसरातून पहाटेच्या पाळीत काम करण्यासाठी येतात. या कर्मचाऱ्यांना मुंबईतच घरे मिळावी यासाठी महापालिकेने ही घरे तृतीय व चतुर्थ श्रेणी कामगारांकरीता विकायला काढली आहे. मात्र माहुलच्या घरांना कामगारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालिकेने आता या घरांच्या विक्रीसंदर्भात विविध ठिकाणी जाहिरात झळकवली आहे. घनकचरा विभागाच्या चौक्या, पालिकेची कार्यालये येथे या योजनेची जाहिरात लावण्यात आली आहे.
वार्षित सात कोटी देखभाल खर्च
सफाई कर्मचाऱ्यांसाठी माहुलमध्ये उभारण्यात आलेल्या घरांच्या देखभालीसाठी महापालिकेला वर्षाकाठी ७ कोटी रुपये खर्च येतो. ही घरे रिकामी राहिली तर त्याचा तोटा पालिकेलाच होणार आहे. त्यामुळे प्रशासन मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांबरोबर चर्चा करून यातून मार्ग काढणार आहे.
त्याचबरोबर निवृत्त सफाई कर्मचारी ही घरे घेण्यास इच्छुक असतील तर त्यांनाही ती देण्याबद्दल विचार केला जाणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. १) एवर स्माईल पी. ए. पी. संकुल, माहुल आंबा पाडा, आणिक गाव, येथील सदनिका खरेदीतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २) ही योजना केवळ पालिकेच्या तृतीय व चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी आहे. ३) अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल आहे. ४) २० एप्रिल रोजी आलेल्या अर्जदारांमधून सोडत काढण्यात येणार आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




