
Mumbai : टाटा रुग्णालयामध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने अधिकाधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी टाटा रुग्णालयाने त्यांच्या खारघर येथील ॲक्ट्रॅक रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी विशेष विभाग सुरू केला. या विभागाने अवघ्या ५९ दिवसांमध्ये ५१ शस्त्रक्रिया करत कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा मान मिळवला आहे.
दरवर्षी, टाटा रुग्णालयात सुमारे ५० ते ६० हजार रुग्णांची नोंदणी होते. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम अहवाल २०२० मध्ये दिलेल्या अंदाजानुसार २०२० च्या तुलनेत २०२५ मध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत १२.८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, कर्करोगाचे लवकर निदान करून त्यावर रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे, केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि टाटा मेमोरियल केंद्राने त्यांच्या खारघर येथील ॲक्ट्रॅकमधील सेवासुविधांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ॲक्ट्रॅकमध्ये १३ शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले. यामध्ये रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करता याव्यात यासाठी विशेष विभाग तयार केला गेला. यामध्ये जागतिक स्तरावर असलेल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
|
Pune : आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार ! |
रोबोटच्या सहाय्याने जलद, सहज व विनात्रास शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांकडून रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याबाबत मागणी होत आहे. रुग्णांच्या मागणीमुळेच ॲक्ट्रॅकमध्ये अवघ्या ५९ दिवसांमध्ये ५१ रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सर्वात कमी कालावधीत रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे ॲक्ट्रॅक हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे, अशी माहिती ॲक्ट्रॅकचे संचालक व प्रख्यात कर्करोग शल्यविशारद डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.
प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सकांना अधिक अचूकतेने शस्त्रक्रिया करण्यास मदत होत आहे. तसेच, रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करताना लहान चीरांमुळे पेशींचे कमी नुकसान होत असल्याने रुग्णही लवकर बरे होतात. शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना, रक्त कमी होणे आणि रुग्णालयात कमी वास्तव्य, यामुळे अनेक रुग्ण पारंपरिक पद्धतींपेक्षा रोबोटिक सहाय्याने करणाऱ्या शस्त्रक्रियांना प्राधान्य देत असल्याचे ॲक्ट्रॅकमधील प्राध्यापक डॉ. सुधीर नायर यांनी सांगितले.
प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत
ॲक्ट्रॅकमधील ५०० खाटांपैकी १३० खाटा या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात येत असल्यामुळे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी असलेली प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. डोके आणि मान, आतड्यांसंबंधी, मूत्रविज्ञान, स्त्रीरोग इत्यादीसाठी रुग्णांना चांगले उपचार मिळण्यास मदत होत असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




