Minority Development Department Maharashtra: अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. त्याचदिवशी त्यांच्या अखत्यारीत येणार्या अल्पसंख्याक विभागाने घाईघाईत 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा दिला. 2 फेब्रुवारीपर्यंत हा प्रकार झाला. ही बाब समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चौकशी करून कडक कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान याप्रकरणी स्वाक्षरी केलेले उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी करण्यात येणार आहे. तर आता या सर्व घडामोडीत अल्पसंख्यांक विभागानं बाजू मांडली आहे.
काय आहे प्रकरण?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अल्पसंख्याक विभागाने केवळ चार दिवसात 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिला. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी याप्रकरणी मोठा आरोप केला. त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली. पैशासाठी हापलेले संधीसाधू अधिकारी आणि दोषींना मकोका लावून त्यांची थेट कारागृहात रवानगीची मागणी त्यांनी केली.
या 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्याने प्रवेश प्रक्रियेत 25 टक्के राखीव जागा तसेच शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य नसते. यामुळे मोठा आर्थिक लाभ मिळवता येतो. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून हे प्रमाणपत्र वाटप रोखून धरलेले असताना एकाच वेळी इतक्या प्रमाणात हे प्रमाणपत्र वाटप झाल्याने अर्थपूर्ण व्यवहाराचा संशय बळावला. आता याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.
दोन दिवसात चौकशीला सुरुवात
अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शोक पाळला जात असतानाच अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करत अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाचा धडाका लावला. या प्रमाणपत्रावर अल्पसंख्याक खात्याचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची स्वाक्षरी आहे. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तर ज्या संस्थांना प्रमाणपत्र वाटप झाले. ती प्रक्रिया पण संशयाच्या भोवर्यात आहे. याप्रकरणी शेणॉय यांच्या चौकशीला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे.
ही तांत्रिक चूक
दरम्यान अल्पसंख्यांक दर्जा देणार्या अल्पसंख्यांक विभागाने याप्रकरणी सारवासारव केली आहे. ही तांत्रिक चूक असल्याचे उत्तर विभागाने दिले आहे. तर 28 जानेवारी रोजी एकही प्रमाणपत्र वाटप झाले नसल्याचा दावा अल्पसंख्यांक विभागाने केला. 29 जानेवारीपासून अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र देण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. पण अशी तांत्रिक चूक होते कशी यावर मात्र विभाग मूग गिळून आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




