पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये वारंवार होणारे गैरप्रकार, अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा वेळापत्रकातील गोंधळ आणि निकालांमधील त्रुटी यांच्या निषेधार्थ पुण्यात आज हजारो विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले. राज्यभरातून आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान एक प्रचंड आणि आक्रमक 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा' काढला. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या या रोषाने राज्य सरकारचेही लक्ष वेधले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आणि तीव्र रोष:
गेल्या काही महिन्यांत एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये आणि भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप खदखदत होता. या मोर्चानरम्यान विद्यार्थ्यांनी MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांनी तातडीने आपल्या पदाचा राжыनामा द्यावा, अशी ठाम मागणी केली. तसेच, ज्या अधिकाऱ्यांच्या काळात किंवा कार्यकाळात पेपरफुटीसारखे गंभीर प्रकार घडले आहेत, त्या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून संशयित व दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. याशिवाय, गट-ब (Group B) परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध आक्षेपांवर आयोगाने तात्काळ आणि पारदर्शक भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी करण्यात आली.
राजकीय नेत्यांचा सहभाग व पाठिंबा:
विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आणि हक्काच्या लढाऊ आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी या आक्रोश मोर्चानध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला.
पोलिसांचा बंदोबस्त आणि प्रशासकीय हालचाली:
हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो युवकांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या गंभीर समस्येवर शासन तातडीने काय पावले उचलणार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय ठोस तोडगा काढणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
शहर
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




