
Manoj Jarange : 'आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. मात्र, आता प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली असून त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. मात्र 'सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी बळीची अपेक्षा आहे का? असा सवाल उपस्थित करत 'त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल, असा सूचक इशारा मराठा आंदोलनाचे नेतेमनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर हून मुंबईला जात असतांना मनोज जरांगे पाटील हे मध्यरात्री 2 वाजता नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वीच जरांगे यांनी छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात सभा घेतली होती, या सभेदरम्यान स्वागतावेळी जेसीबीवरून पुष्पवृष्टी करतांना खाली पडून गंभीर जखमी झालेल्या विलास गाढे यांची त्यांनी रुग्णालयात भेट घेत डॉक्टरांशी देखीलल गाढेंच्या तब्येतीबाबत विचारपूस केली, मराठा समाज बांधव यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रस्थापित मराठा नेत्यांमुळेच आमच्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांना देखील व्यक्तिगत विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे.
|
|
मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, येवल्यातील घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती बरी आहे. आरक्षणाबाबत सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार? हे मात्र समजायला तयार नाही. आरक्षण जर या अगोदर दिलं असतं, तर आमच्यावर ही वेळ नसती. सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी देखील बळीची अपेक्षा आहे का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. 'त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल. आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली. त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही दिला नाही, आरक्षण द्यावं लागेल आणि मुख्यमंत्री साहेब नक्की देतील, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही...
दरम्यान चाळीस दिवसानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. समाजाला आवाहन करतो की जास्त वेळ उन्हात थांबू नका. मात्र ही खदखद अनेक वर्षांपासूनची आहे. आता लाट बाहेर पडत आहे. ज्यांना आम्ही प्रतिष्ठित समजत होतो, ते चिल्लरपणा करायला लागले. पैसे कमवण्यासाठी आंदोलन नाही, न्याय देण्यासाठी आंदोलन आहे. त्यांना वाटलं, आम्ही जमीनच विकत घेतली. आमचे कपडे प्रस्थापित लोकांमुळेच फाटले. भुजबळ साहेब यांना व्यक्तिगत विरोध नाही. आम्हाला टीका करायची, म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. पण आरक्षणाला विरोध केला तर कुणालाच सोडणार नाही. ग्राउंड लेव्हलवर मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधव एकत्र आहोत. काही आमचे आणि काही त्यांचे दोन तीन जण जमून देत नसल्याचे ते म्हणाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज





























Subscribe to my channel




