
Maharashtra Rain Update : सकाळपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. नाशिक शहरात सुरू आलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. हवामनाच्या अंदाजानुसार, वरुणराजा धो-धो बरसलाय.
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरू असून नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. धरणांच्या पाणी पातळतीही मोठी वाढ झालीय. खडकवासला धरणातूनही २३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून मुळा मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. यामुळे पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेलाय.
|
|
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरू असून नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. धरणांच्या पाणी पातळतीही मोठी वाढ झालीय. खडकवासला धरणातूनही २३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून मुळा मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. यामुळे पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेलाय.
भारतीय हवामान खात्यातील हवामानतज्ञ के एस. होसाळीकर यांनी आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. हवामान विभागानुसार, आज राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. आज मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
नाशिक जिल्ह्यातील दमदार पाऊस झाला. धरण उगम क्षेत्रात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. त्र्यंबकेश्वर भागात दिवसभर अतिजोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 106 मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलीय. यामुळे अंजनेरी गडावरून असे पाण्याचे लोंढे वाहू लागलेत. तर गंगापूर धरणातून 7000 क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलाय. पुरामुळे गोदा घाटावरचे छोटे-मोठे मंदिर गेले पाण्याखाली गेलेत. पावसाचा जोर कायम राहिलास गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने गोदावरी नदीत वाढवणार पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून 6870 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास चणकापूर धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांना मालेगाव पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय. याकाळात कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. पुण्यातील पेठांच्या भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. मुळा मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय.
नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित झालेत. अंकलेश्वर ब्रहानपूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहणारी वरखेडी नदी धोक्याची पातळी ओलांडली असून दुथडी भरून वाहत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस होत असल्याने देवगोई घाटात दरड कोसळलीय. अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात कोसळली दरड कोसळलीय.
बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात मुसळधार पाऊस झालाय. आगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदणी नदी काठच्या गावांचा संपर्क तुटला. चांदणी नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मांडेगाव, देवळाली, आरसोली गावांचा संपर्क तुटला,गावाकऱ्यांची झाली गैरसोय झालीय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोरच्या अंजनासागर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. आज दिवसभर मुसळधार पावसामुळे अंजना नदीला पूर आलाय. यामुळे पळशी व देवपुळ गावाजवळील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला होता. तीन दिवसांच्या जोरदार पावसाने पावसाची तूट भरून निघाली.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



