
Maharashtra Rain : राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने चांगला हाहाकार उडावल्याचं दिसतंय. हवामान विभागाने ७२ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. नांदेड, लातून, जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने दाणादाण केलीय. यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती आल्याची माहिती मिळतेय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पळालाय, कारण शेतपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येतंय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमधील सोना नदीला पूर आला. काल दुपारपासूनच संततधार पाऊस या परिसरात सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील सगळ्याच भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातला या पावसाळ्यातला हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होणार अशी शक्यता दिसते आहे.
|
Pune : रोडरोमियोंना आता सुट्टी नाही, छेड काढाल तर चौकात झळकणार बॅनर; पुणे पोलिसांची नवी शक्कल! |
सोलापूर शहर आणि परिसरात मागच्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस आहे. काल सोलापुरात २१ मिमी पावसाची नोंद झालीय. सोलापुरात हवामान विभागाने काल येलो अलर्ट जारी केला होता. बार्शी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस (Rain Update) झालाय. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे हिंगणी आणि ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओसांडून वाहू लागलाय. सलग दोन दिवस सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे भोगावती आणि निलकंठा नदीला पूर आलाय. नदीकाठाच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
जालन्यातील परतूर तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आलाय. दरम्यान आष्टी ते सावरगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना देखील सावरगाव येथील नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळालाय. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसला (Rain News) आहे. जिल्ह्यातील किनवट,माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. पुराचे पाणी शेती शिवारात शिरले आहे. शेती पिकांसह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान पावसाळ्यातील चार महिन्याच्या सरासरीच्या जवळ हा दोन दिवसातील पाऊस झाला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ४० टक्के इतका पाणीसाठा आहे. आज लातूर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अकोलखेड गावात नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. त्यात सातपुडा पर्वतरांगात देखील संततधार पाऊस सुरू आहे.
परभणीच्या सेलू शहरात देखील दमदार पावसाने हाहाकार माजवला. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना दमदार पाऊस आणि वीज पुरवठा खंडित अश्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. बीड जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस होत असून परळीसह परिसरात अनेक नद्यांना पाणी आले आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय.परळी महामार्गावर असणारा तात्पुरता पूल वाहून गेलाय.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा


























Subscribe to my channel


