15 Feb 2026 09:36 AM (IST)
दहावी-बारावी परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त होणार, शिक्षण मंडळाचे कडक पाऊल
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अत्यंत कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परीक्षेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर आता थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा सुरू झाली असून, येत्या २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून, त्यात शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस आणि महसूल विभागाची स्वतंत्र पथकेही संवेदनशील केंद्रांवर लक्ष ठेवणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याची तरतूदही यंदा करण्यात आली आहे.
15 Feb 2026 09:28 AM (IST)
त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीचा महापूर, ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल
नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या विशेष दिनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रभू त्र्यंबकेश्वराचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. पहाटेपासूनच देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनी सुरक्षेचे तसेच दर्शनाचे चोख नियोजन केले आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण त्र्यंबक नगरी भक्तिमय झाली असून, भाविकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
15 Feb 2026 09:20 AM (IST)
परळीचे वैद्यनाथ मंदिर रोषणाईने उजळले, आकर्षक सजावटीने वेधले लक्ष
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा आणि विशेष सजावटीमुळे हे पवित्र क्षेत्र अधिकच तेजस्वी दिसत आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला आहे. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मंदिर प्रशासनाने भक्तांच्या सुलभ दर्शनासाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. सात दिवसांच्या या यात्रेनिमित्त विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
15 Feb 2026 09:14 AM (IST)
कल्याणमध्ये MIDC ची जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाणी वाया
कल्याण ग्रामीण परिसरातील हेदुटणे गावाजवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) १६०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे तब्बल ३० ते ४० फूट उंचीचे पाण्याचे फवारे हवेत उडत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ही जलवाहिनी मुख्य असल्याने ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या धक्कादायक दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
15 Feb 2026 09:08 AM (IST)
भीमाशंकर नगरी रोषणाईने उजळली, पण भाविकांविना पार पडला सोहळा
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आणि महादेव नगरी विद्युत रोषणाईने लखलखली आहे. मात्र, सध्या मंदिरात सुरू असलेल्या विकास आराखड्यांतर्गत दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामांमुळे यंदाचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची शासकीय महापूजा परंपरेनुसार पार पडली. श्रावण महिन्यापर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण करून भाविकांसाठी भव्य मंदिर खुले करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, भाविकांनी या बदलांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.
15 Feb 2026 09:03 AM (IST)
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांची मोठी गर्दी
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अंबरनाथ येथील ऐतिहासिक आणि प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यंदा सुरक्षेच्या आणि गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनाने भाविकांना गाभाऱ्यात न सोडता बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था केली आहे. आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



