
Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्टला बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले. यावेळी रस्तारोको आणि रेलरोको आंदोलन करत आंदोलनकर्त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या घटनेवरून आता राजकारण देखील चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. २४ ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवारी महाराष्ट्र बंद असणार आहे. या महाराष्ट्र बंदला आता महायुतीतल्या आरपीआय आठवले गटाने पाठिंबा दिला आहे.
बदलापुरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या बंदला महायुतीकडून टीका होत असताना चक्क महायुतीतील रिपाई आठवले गटाने पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी या बंदमध्ये सहभागी होत आरपीआय आठवले गट बदलापुरातील घटनेचा तीव्र निषेध करेल असे सांगितलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने हा बंद करण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये १२ ऑगास्टला सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना १६ ऑगस्टला उघड झाली. या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेची नोंद करून घेताना पोलिसांनी दिरंगाई आणि हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे ४ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर शाळेच्या मख्याध्यापकासह ४ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. या घटनेमुळे बदलापूरमध्ये संतापाची लाट आहे.
|
|
बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले. सकाळी सहा वाजल्यापासून शाळेच्या गेटवर बदलापूरकरांनी आंदोलन केले. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी शाळेमध्ये घुसून तोडफोड केली. यानंतर आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन आंदोलन केले. रेल्वे रूळावर उतरून त्यांनी तब्बल ९ तास रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना लाठीमार केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेप्रकरणी आतापर्यंत ३१ आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तर रेलरोको आंदोलन करणाऱ्या ३०० आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




